AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आंबेडकर-गांधी यांच्यातील चर्चेविषयी काय म्हणाली जान्हवी? पहिल्यांदाच मांडलं मोकळं मत

अभिनेत्री जान्हवी कपूर नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. त्याचप्रमाणे जात या विषयावर कधीच शाळेत किंवा घरात चर्चा झाली नाही, असंही तिने सांगितलं आहे.

आंबेडकर-गांधी यांच्यातील चर्चेविषयी काय म्हणाली जान्हवी? पहिल्यांदाच मांडलं मोकळं मत
डॉ. बाबासाहेब आंबेडकर, जान्हवी कपूर, महात्मा गांधीImage Credit source: Instagram
| Updated on: May 26, 2024 | 10:24 AM
Share

अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या तिच्या आगामी ‘मिस्टर अँड मिसेस माही’ या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करतेय. या प्रमोशननिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत जान्हवी इतिहास या विषयाबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली. इतिहासातील असा कोणता काळ तुला पुन्हा पहायला आवडेल, असा प्रश्न तिला विचारण्यात आला होता. त्यावर तिने सांगितलं की तिला भारताच्या संविधानाचा मसुदा तयार करणाऱ्या समितीचे नेतृत्त्व करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यातील चर्चा पहायला आवडले.

‘द लल्लनटॉप’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत जान्हवीला विचारलं गेलं, “इतिहासातील असा कोणता काळ आहे, जो तुला पुन्हा पहायला आवडेल?” याचं उत्तर देताना जान्हवी म्हणाली, “मला इतिहास या विषयाची आधीपासूनच खूप आवड आहे. तुम्हाला खरंच सत्य जाणून घ्यायचं आहे का? पण मी उत्तर दिल्यावर तुम्ही त्यावरून मला प्रतिप्रश्न करू नका. कारण माझी मतं प्रेक्षकांपर्यंत कोणत्या उद्देशाने पोहोचतील, याचा अंदाज बांधता येत नाही. मला असं वाटतं की डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यातील चर्चा पाहणं खूप महत्त्वाचं ठरेल. कोणत्या मूल्यांसाठी ते लढले आणि त्यांची मतं काळानुसार कशी बदलत गेली, त्याचा लोकांवर कसा प्रभाव पडला याबद्दलची केवळ चर्चा ऐकायची आहे. या दोघांनीही आपल्या समाजाला खूप काही दिलं. त्यामुळे मला असं वाटतं की ती चर्चा खरीच ऐकण्यासारखी असेल.”

जान्हवी पुढे म्हणाली, “सुरुवातीपासूनच आंबेडकर यांची मतं (जातीच्या बाबतीत) फार कठोर होती. तर गांधींची मतं वेळेनुसार विकसित होत गेली. आपल्या समाजातील जातीची समस्या.. एका तिसऱ्या व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्याबाबत जाणून घेणं आणि ते आयुष्य जगणं यात खूप मोठा फरत आहे.” यानंतर जान्हवीला विचारलं गेलं की तिच्या शाळेत कधी जातीच्या विषयावरून चर्चा झाली का? त्यावर तिने सांगितलं, “माझ्या शाळेत आणि घरात कधीच जात या विषयावरून चर्चा झाली नाही.”

जान्हवीच्या चित्रपटांविषयी बोलायचं झाल्यास, ती ‘मिस्टर अँड मिसेस माही’ या चित्रपटात ती राजकुमार रावसोबत मुख्य भूमिका साकारतेय. शरन शर्मा यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटाचं शूटिंग अवघ्या 30 दिवसांत पूर्ण झालं. तर जान्हवीने तिच्या भूमिकेसाठी 150 दिवस प्रशिक्षण घेतलं होतं.

Follow Us
उदय सामंत: 'एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य'
उदय सामंत: एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य
मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे
'मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे', रिक्षाचालकांच्या मराठी सक्तीवरून शिंदेंची प्रतिक्रिया
मराठी न बोलल्यास परवाना रद्द करण्याच्या धमक्यांवरचा दुबेंचा इशारा
संजय दुबे यांचा प्रताप सरनाईक यांच्या मराठी भाषेच्या सक्तीला थेट विरोध
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल:
शरद पवार एनडीएमध्ये जाणार नाहीत, विरोधातच राहणार
पवारांकडून एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चा फेटाळल्या; पक्ष कार्यकर्त्यांना दिले स्पष्ट निर्देश
देशमुखांचं कारागृह महानिरीक्षकांना पत्र; गैरप्रकारांच्या चौकशीची मागणी
धनंजय देशमुखांचे बीड कारागृह महानिरीक्षकांना पत्र: गैरप्रकार चौकशी आणि आरोपी स्थलांतराची मागणी
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर? ठाण्यातील कार्यक्रमात भाजप नेत्यांची अनुपस्थिती
बेस्ट कामगारांचा बेमुदत संप; प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
बेस्ट कामगारांचा मंगळवारपासून बेमुदत संप: प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
पालकमंत्री महाजनांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना मदत
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना अवयव प्रत्यारोपणासाठी मदत