बेनजीरशी लग्न करून चमकला आहेस; हिंदूंना ज्ञान देणाऱ्या झरदारीला जावेद अख्तर यांचे सडेतोड उत्तर
पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी दावा केला की पाकिस्तान ४% हिंदू लोकसंख्येला "सहन करतो". प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी पाकिस्तानी राष्ट्राध्यक्षांवर तीव्र टीका करत त्यांना अल्पसंख्याकांप्रती असंवेदनशील म्हटले. गीतकारासोबतच सोशल मीडिया वापरकर्त्यांनीही आसिफ अली झरदारी यांच्यावर टीका केली.

पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांच्या दाव्यानंतर नवा वाद सुरू झाला आहे. त्यांनी आपल्या एका निवेदनात म्हटले की पाकिस्तान आपल्याकडील हिंदूंना सहन करतो. ते पाकिस्तानमध्ये आपला धर्म पाळण्यासाठी स्वतंत्र आहेत आणि भारतात जाण्यापेक्षा पाकिस्तानमध्येच राहणे पसंत करतील. आसिफ अली झरदारी यांनी असाही दावा केला की पाकिस्तानमध्ये ४ टक्के हिंदू लोकसंख्या आहे. आता यावर प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी प्रतिक्रिया देत झरदारी यांना चांगलेच सुनावले आहे.
आसिफ अली झरदारी यांच्या निवेदनावर जावेद अख्तर यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. ‘पाकिस्तानचे मिस्टर झरदारी बेनजीर भुट्टोशी लग्न केल्यानंतर चर्चेत आले होते. ते म्हणतात की ते आपल्या देशात ३-४ टक्के हिंदू लोकसंख्येला सहन करतात. मला जेवढं माहिती आहे त्यापैकी मिस्टर झरदारी तुम्ही १०% पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या कोणत्याही समुदायाबाबत नेहमीच असंवेदनशील राहिले आहात’ या आशयाची पोस्ट जावेद अख्तर यांनी केली आहे.
Mr Zardari of Pakistan who had come into the limelight after Benazeer Bhutto had married says that they tolerate the 3-4 percent Hindu population Lin their country . I understand Mr Zardari you have always being insensitive to all under the sun which is less than 10 % .
— Javed Akhtar (@Javedakhtarjadu) August 15, 2026
जावेद अख्तरच्या निवेदनावर लोकांच्या प्रतिक्रिया
जावेद अख्तर यांच्या सोशल मीडिया पोस्टनंतर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. एक युजर म्हणटले की, ‘कसे कोणी एक व्यक्ती असंवेदनशील होऊ शकते? पाकिस्तानच्या कायद्यानुसार एक हिंदू पाकिस्तानचा पंतप्रधान होऊ शकतो का?’ तर दुसरा एक युजर म्हणतो की, ‘किमान त्यांनी इतर हिंदूंबद्दलच्या आपल्या भावना आणि द्वेषाबद्दल सत्य तरी सांगितले आहे. त्यांना ना कोणत्या वोट बँकेला खुश करण्याची गरज आहे ना कोणत्या हिंदू आत्मघातकी हल्लेखोराच्या हातून मारले जाण्याची भीती. हीच त्यांची विचारसरणी आहे आणि आपण हे स्वीकारून त्यांच्याशी त्याचप्रमाणे वागावे.’
चुकीचे आहे आसिफ अली झरदारी यांचे निवेदन
आसिफ अली झरदारी यांनी १४ ऑगस्टला इस्लामाबादमध्ये म्हटले की भारतीय ‘अखंड भारत’वर विश्वास ठेवतात. फर्स्ट पोस्टच्या अहवालानुसार, पाकिस्तानच्या राष्ट्रपतींनी आपल्या निवेदनात जे दावे केले आहेत, ते जनगणनेच्या आकडेवारीने चुकीचे ठरवतात. पाकिस्तानच्या २०२३ च्या जनगणनेनुसार, देशात हिंदूंची लोकसंख्या सुमारे ५२ लाख (५.२ मिलियन) आहे, जी एकूण लोकसंख्येच्या २.१७ टक्के आहे. हा आकडा आसिफ अली झरदारी यांनी सांगितलेल्या ४ टक्के आकड्यापेक्षा खूपच कमी आहे.