AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bollywood : जया बच्चन यांच्यामुळे उद्ध्वस्त झाला कपूर कुटुंबाच्या लेकीचा संसार!

Bollywood : जया बच्चन यांच्या एका अटीमुळे उद्ध्वस्त झाला कपूर कुटुंबाच्या लेकीचा संसार! तेव्हा नक्की झालं तरी काय होतं. त्यानंतर कपूर कुटुंबाच्या लेकीच्या आयुष्यात आल्या अनेक अडचणी... सध्या सर्वत्र बच्चन आणि कपूर कुटुंबाची चर्चा...

Bollywood : जया बच्चन यांच्यामुळे उद्ध्वस्त झाला कपूर कुटुंबाच्या लेकीचा संसार!
Image Credit source: Twitter
| Updated on: Oct 15, 2023 | 1:38 PM
Share

मुंबई | 15 ऑक्टोबर 2023 : महानायक अमिताभ बच्चन यांच्या पत्नी आणि अभिनेत्री जया बच्चन कायम त्यांच्या स्वभावामुळे चर्चेत असतात. सोशल मीडियावर त्यांचे अनेक व्हिडीओ आणि फोटो देखील तुफान व्हायरल होत असतात. एक काळ असा होता, जेव्हा कपूर कुटुंबातील मुलीचा साखरपुडा मोडल्यामुळे जया बच्चन चर्चेत आल्या होत्या. बच्चन कुटुंबाचा मुलगा अभिषेक बच्चन आणि कपूर कुटुंबाची लेक करिश्मा कपूर यांचा साखरपुडा झाला होता. खुद्द जया बच्चन यांनी करिश्मा कपूर हिला सून म्हणून घोषित केलं होतं. पण साखरपुडा होवून करिश्मा आणि अभिषेक यांचे मार्ग वेगळे झाले. आज दोघे देखील त्यांच्या खासगी आयुष्यात पुढे गेले आहेत. पण तरी देखील त्यांच्या खासगी आयुष्याची चर्चा कायम रंगलेल्या असतात.

महानायक अमिताभ बच्चन यांच्या ६० व्या वाढदिवसाच्या मुहुर्तावर करिश्मा आणि अभिषेक यांचा साखरपुडा झाला होता. साखपुड्यानंतर दोघांच्या लग्नाची इंडस्ट्रीमधील प्रत्येकाला प्रतीक्षा होती. कारण बॉलिवूडमधील दोन प्रसिद्ध कुटुंब एका खास नात्यात बांधली जाणार होती. पण तसं काही झालं नाही. नातं साखरपुड्यापर्यंत पोहोचल्यानंतर करिश्मा आणि अभिषेक यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

मीडिया रिपोर्टनुसार, करिश्मा कपूर हिची आई बबिता कपूर यांनी बच्चन कुटुंबियांपुढे काही अटी ठेवल्या. त्यामधील एक अट म्हणजे बच्चन कुटुंबाने लग्नाआधी संपत्तीचा काही भाग अभिषेक याच्या नावावर करायचा… बच्चन कुटुंबीयांनी बबिता यांच्या अटीवर आक्षेप घेतला, असं सांगण्यात येतं. बबिता यांच्या अटीमुळे बच्चन आणि कपूर कुटुंबातील नात्यात दुरावा निर्माण झाला होता. परिणामी करिश्मा आणि अभिषेत यांना विभक्त होण्याचा निर्णय घ्यावा लागला.

फक्त बबिता कपूर यांनीच नाही तर, जया बच्चन यांनी देखील करिश्मा हिच्या पुढे एक घट घातली होती. लग्नानंतर करिश्मा सिनेमांमध्ये काम करणार नाही… अशी जया बच्चन यांनी अट होती. रिपोर्टनुसार, करिश्मा आणि तिच्या आईला ही अट मान्य नव्हती. ज्यामुळे करिश्मा – अभिषेक यांचं चं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही..

अभिषेक याच्यासोबत साखरपुडा तुटल्यानंतर करिश्मा कपूर हिने श्रीमंत उद्योजक संजय कपूर याच्यासोबत लग्न केलं. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. करिश्मा – संजय यांनी घटस्फोटादरम्यान एकमेकांवर गंभीर आरोप केलं. करिश्मा संजय याची दुसरी पत्नी होती. आज अभिनेत्री दोन मुलांसोबत आनंदी आयुष्य जगत आहे.

तर अभिषेक बच्चन याने अभिनेत्री ऐश्वर्या राय हिच्यासोबत लग्न केलं. फार कमी लोकांच्या उपस्थितीत दोघांचा विवाहसोहळा पार पडला. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ आजही सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. अभिषेक आणि ऐश्वर्या यांना एक मुलगी देखील आहे. त्यांच्या मुलीचं नाव आराध्या बच्चन असं आहे…

Follow Us
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दरवाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दरवाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.
शहरातही आता चुलींना मागणी वाढली, गॅस सिलिंडर टंचाईवर शोधला उपाय
शहरातही आता चुलींना मागणी वाढली, गॅस सिलिंडर टंचाईवर शोधला उपाय.