AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jaya Kishori | ‘द केरळ स्टोरी’वर जया किशोरी यांची मोठी प्रतिक्रिया; हिंदू राष्ट्राबाबतही मांडलं मत

'द केरळ स्टोरी' या चित्रपटाने आतापर्यंत 180 कोटी रुपयांपेक्षा जास्त गल्ला जमवला आहे. 5 मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन सुदिप्तो सेन यांनी केलं आहे. तर चित्रपटात अदा शर्मा, सोनिया बलानी, सिद्धी इदनानी आणि योगिता बिहानी यांच्या भूमिका आहेत.

Jaya Kishori | 'द केरळ स्टोरी'वर जया किशोरी यांची मोठी प्रतिक्रिया; हिंदू राष्ट्राबाबतही मांडलं मत
Jaya Kishori on The Kerala StoryImage Credit source: Twitter
| Updated on: May 22, 2023 | 8:28 AM
Share

इंदौर : प्रसिद्ध कथाकार जया किशोरी यांचं भाषण आणि विविध मुद्द्यांवर त्यांनी मांडलेली मतं अनेकदा श्रोत्यांना प्रेरणा देतात. त्यांच्या भजनांना आणि प्रेरणादायी भाषणांना युट्यूबवर लाखो व्ह्यूज मिळतात. समाज, लग्न, धर्म अशा विविध विषयांवर जेव्हा त्या भाष्य करतात, तेव्हा त्याची चर्चा होते. नुकताच त्यांनी इंदौर दौरा केला. यावेळी त्यांनी वादग्रस्त ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाविषयी आपलं मत व्यक्त केलं. त्याचसोबत त्यांनी हिंदू राष्ट्र आणि राजकारण यांसारख्या मुद्द्यांवरही खुलेपणाने भाष्य केलं.

“प्रत्येक सनातनी व्यक्तीला हिंदू राष्ट्र हवा आहे”

हिंदू राष्ट्रबाबत जया किशोरी म्हणाल्या, “मी सनातनी असल्याने हिंदू राष्ट्र झाल्यास मला खूप आनंद होईल. सरकार याबाबत काय ते करेल, पण कायदा आणि सुव्यवस्था राखून गोष्टी झाल्या पाहिजेत. हिंदू राष्ट्र ही प्रत्येक सनातनीची इच्छा आहे.”

राजकारणाबाबत काय म्हणाल्या जया किशोरी?

राजकारण आणि धर्माविषयीच्या प्रश्नावर त्या म्हणाल्या की “धर्मात राजकारण आलं नाही पाहिजे. जर तुम्ही महाभारत पाहिलंत तर श्रीकृष्णने संपूर्ण महाभारतात फक्त राजकारणच केलं आहे. ते स्वत: लढू शकले असते. पण त्यांनी बसल्या-बसल्या सर्व कामं केली, राजकारण केलं. राजकारण वाईट नाही, जर ते श्रीकृष्णासारखं केलं तर. दुर्योधन यांनीसुद्धा राजकारण केलं होतं. कोणासारखं राजकारण करायचं, हे तुम्हाला ठरवायचं आहे.”

‘द केरळ स्टोरी’वरील प्रतिक्रिया

‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटावरून देशभरात वाद सुरू आहे. केरळमधल्या हिंदू आणि ख्रिश्चन मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांचं कशा पद्धतीने धर्मांतर केलं जातं, त्यांना ISIS या दहशतवादी संघटनेत कसं सामील केलं जातं याविषयीची कथा चित्रपटात दाखवण्यात आली आहे. या चित्रपटाविषयी जया किशोरी म्हणाल्या, “माझ्या मते नेहमीच ठराविक संदेश घेऊन चित्रपट बनवले जातात. मात्र तुम्हाला समजलं पाहिजे की कोणती गोष्ट मनोरंजन आहे आणि कोणती नाही. चित्रपट फक्त मनोरंजनासाठी पहावी. कोणत्या चित्रपटातील शिकवण आपण आपल्या जीवनात आत्मसात करावी एवढी बुद्धी आणि समज प्रत्येक व्यक्तीला असते. आपल्याला त्याचाच वापर करायचा आहे. मी नेहमीच म्हणते की तुम्ही चांगल्या गोष्टींकडे लक्ष द्या. मी चित्रपट पाहिला आहे. तुम्ही चांगल्या गोष्टी आत्मसात करायला पाहिजे.”

‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाने आतापर्यंत 180 कोटी रुपयांपेक्षा जास्त गल्ला जमवला आहे. 5 मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन सुदिप्तो सेन यांनी केलं आहे. तर चित्रपटात अदा शर्मा, सोनिया बलानी, सिद्धी इदनानी आणि योगिता बिहानी यांच्या भूमिका आहेत.

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.