AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kapil Sharma ने अखेर कबूल केली चूक; सुनील ग्रोव्हरसोबतच्या भांडणामागचं सांगितलं कारण

सप्टेंबर 2018 मध्ये सुनीलने 'द कपिल शर्मा शो' सोडला होता. त्यापूर्वी विमानातील एका प्रवासादरम्यान कपिलने सुनीलवर हात उचलला अशी चर्चा होती.

Kapil Sharma ने अखेर कबूल केली चूक; सुनील ग्रोव्हरसोबतच्या भांडणामागचं सांगितलं कारण
Kapil Sharma and Sunil GroverImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 17, 2023 | 8:04 AM
Share

मुंबई : कॉमेडियन कपिल शर्मा लवकरच ‘ज्विगाटो’ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटानिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत कॉमेडियन सुनील ग्रोव्हर सोबतच्या वादावर कपिल मोकळेपणे व्यक्त झाला. जवळपास पाच वर्षांनंतर कपिल त्या वादावर खुलेपणाने बोलला आणि यावेळी त्याने आपली चूक सुद्धा मान्य केली. सुनीलसोबत झालेल्या वादासाठी त्याने स्वतःच्या रागाला कारणीभूत ठरवलं. इतकंच नव्हे तर चंदन प्रभाकर, कृष्णा अभिषेक आणि अली असगर यांनी ‘ द कपिल शर्मा शो ‘ का सोडला, यामागचं कारणही त्याने सांगितलं.

सप्टेंबर 2018 मध्ये सुनीलने सोडला होता शो

कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर हे एकेकाळी एकमेकांचे खास मित्र होते. मात्र एके दिवशी असं काही घडलं ज्यामुळे सुनीलने कपिलचा शो सोडला आणि त्याच्यासोबतची मैत्रीही तोडली. सप्टेंबर 2018 मध्ये सुनीलने ‘द कपिल शर्मा शो’ सोडला होता. त्यापूर्वी विमानातील एका प्रवासादरम्यान कपिलने सुनीलवर हात उचलला अशी चर्चा होती. या घटनेनंतर कपिलने अनेकदा सुनीलची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात त्याला यश मिळालं नाही. आता नुकत्याच दिलेल्या मुलखतीत कपिलने त्याची चूक मान्य केली आहे.

कपिलने मान्य केली चूक

कपिलने पहिल्यांदाच एखाद्या मुलाखतीत ही गोष्ट मान्य केली की त्याचं विमानात सुनीलसोबत खूप मोठं भांडण झालं होतं. “मला ही गोष्ट स्वीकारायला कोणतीच कमतरता वाटत नाही की मी लहानसहान गोष्टींवरून खूप राग यायचा. ते माझ्या रक्तातच आहे. मी लोकांवर खूप प्रेम करतो पण जेव्हा मला राग येतो तेव्हा माझं स्वतःवर नियंत्रण राहत नाही. पण आता माझ्या स्वभावात बराच बदल झाला आहे. लोक म्हणतात की ते माझे शत्रू आहेत, पण मी कोणालाच माझा शत्रू मानत नाही,” असं कपिल म्हणाला.

“तुम्ही मला अहंकारी म्हणालात तरी चालेल”

द कपिल शर्मा शोमधून बाहेर पडलेल्या इतर कलाकारांविषयी तो पुढे म्हणाला, “तुम्ही मला अहंकारी म्हणालात तरी चालेल. पण तुम्ही त्यांना जाऊन विचारा की माझ्यासोबत त्यांना का काम करायचं नाही. सुनीलसोबत माझा वाद झाला होता. पण इतरांसोबत माझे चांगले संबंध होते.”

2020 दिलेल्या एका मुलाखतीत सुनीलसोबतच्या वादाबाबत कपिल म्हणाला होता, “छोटे छोटे वाद होतंच राहतात, पण त्याने नाती तुटत किंवा संपत नाहीत.” गेल्या वर्षी जेव्हा सुनीलला हृदयविकाराचा झटका आला, तेव्हा कपिलने त्याच्या तब्येतीची विचारपूस केली होती.

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.