AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘तू बिग बॉसच्या ट्रॉफीच्या लायक नाहीस’, म्हणणाऱ्यांना करणवीर मेहराचं सडेतोड उत्तर

प्रसिद्ध टीव्ही अभिनेता करणवीर मेहराने 'बिग बॉस 18'चं विजेतेपद पटकावलं आहे. विवियन डिसेनाला टक्कर देत त्याने बाजी मारली आहे. मात्र करणवीरच्या विजयावर काही जणांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांना आता करणवीर मेहराने सडेतोड उत्तर दिलं आहे.

'तू बिग बॉसच्या ट्रॉफीच्या लायक नाहीस', म्हणणाऱ्यांना करणवीर मेहराचं सडेतोड उत्तर
करणवीर मेहराImage Credit source: Instagram
| Updated on: Jan 22, 2025 | 1:34 PM
Share

तब्बल 105 दिवसांनंतर रविवारी 19 जानेवारी रोजी ‘बिग बॉस 18’ची सांगता झाली. करणवीर मेहरा आणि विवियन डिसेना या दोघांमध्ये अंतिम चुरस रंगली होती. यात प्रसिद्ध टीव्ही अभिनेता करणवीर मेहराने बाजी मारली. करणवीरला बिग बॉसची ट्रॉफी आणि त्यासोबतच 50 लाख रुपये बक्षीस मिळालं. या विजयानंतर अनेकांनी करणवीरला शुभेच्छा दिल्या. मात्र काहींनी त्याला ट्रोलसुद्धा केलं. ‘तू बिग बॉस जिंकण्याच्या लायक नाहीस’, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी त्याच्यावर टीका केली. या टीकाकारांना आता करणवीरने सडेतोड उत्तर दिलं आहे. मंगळवारी रात्री त्याला मुंबईत पाहिलं गेलं. यावेळी पापाराझींनी त्याला ट्रोलिंगबाबत प्रतिक्रिया विचारली.

करणवीर त्याच्या बेधडक स्वभावासाठी ओळखला जातो. त्यामुळे नकारात्मक कमेंट्सचा माझ्यावर काहीच परिणाम होत नसल्याचं त्याने म्हटलं. इतकंच नव्हे तर “जळणाऱ्यांना जळू द्या..” असं म्हणत त्याने काही हातवारे केले. करणवीरचा हा व्हिडीओ पापाराझींनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ‘बिग बॉस 18’मध्ये एकूण 23 स्पर्धक सहभागी झाले होते. त्यापैकी करणवीर मेहरा, विवियन डिसेना, रजत दलाल, अविनाश मिश्रा, चुम दरांग आणि ईशा सिंह हे सहा जण ग्रँड फिनालेपर्यंत पोहोचले होते. या सहा जणांपैकी ईशा सिंह, चुम दरांग आणि अविनाश मिश्रा हे फिनालेच्या एपिसोडमध्ये कमी मतांमुळे घराबाहेर पडले. त्यानंतर रजत दलाल हा सेकंड रनर अप ठरला, तर विवियन डिसेना हा फर्स्ट रनर अप ठरला.

करणवीरपेक्षा विवियन डिसेना आणि रजत दलाल हे दोघं विजेता बनण्यासाठी अधिक पात्र होते, अशा प्रतिक्रिया काही नेटकऱ्यांनी दिल्या होत्या. शोच्या पहिल्याच एपिसोडपासून विवियन चाहत्यांमध्ये लोकप्रिय होता. मात्र करणवीरची आक्रमक खेळी प्रेक्षकांना अधिक पसंत पडली. याआधी त्याने ‘खतरों के खिलाडी’ या शोचंही विजेतेपद पटकावलं आहे. आता बिग बॉसनंतर करणने ‘लाफ्टर शेफ’ या शोमध्येही जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

करणवीर मेहराने 2005 मध्ये ‘रिमिक्स’ या शोद्वारे करिअरची सुरुवात केली. त्यानंतर त्याने ‘बिवी और मैं’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारली. त्याने ‘रागिनी एमएमएस 2’, ‘मेरे डॅड की मारूती’, ‘ब्लड मनी’, ‘बदमाशियाँ’ यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केलंय. ‘फिअर फॅक्टर : खतरों के खिलाडी 14’चा तो विजेता ठरला होता. करणवीरने ‘पवित्र रिश्ता’, ‘ये रिश्ता क्या कहलाता है’, ‘परी हूँ मैं’, ‘बडे अच्छे लगते है’, ‘ससुराल सिमर का’, ‘डोली अरमानों की’ यांसारख्या गाजलेल्या मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

Follow Us
प्रताप सरनाईकांनंतर आता आणखी एका बड्या मंत्र्याचं 'ऑपरेशन टायगर'बाबत..
प्रताप सरनाईकांनंतर आता आणखी एका बड्या मंत्र्याचं 'ऑपरेशन टायगर'बाबत सुचक विधान, थेट म्हणाले...
नोकर आहात, नोकरांसारखे वागा; भर बैठीकीतच शिंदेंचा आमदार कडाडला...
Video | नोकर आहात, नोकरांसारखे वागा; भर बैठीकीतच शिंदेंचा आमदार कडाडला, असं काय घडलं की...
प्रताप सरनाईकांच्या दाव्यानंतर कैलास पाटलांची मोठी प्रतिक्रिया, थेट...
प्रताप सरनाईकांच्या दाव्यानंतर कैलास पाटलांची मोठी प्रतिक्रिया, थेट... धारशिवमध्ये राजकीय समीकरण पुन्हा बदलणार?
तुटलेल्या खिडक्यांवर उपमुख्यमंत्र्यांचे बॅनर अन्... अभिजीत दीपके आता..
तुटलेल्या खिडक्यांवर उपमुख्यमंत्र्यांचे बॅनर अन्... अभिजीत दीपके आता अगामी मोर्च्यावर
आता ओमराजेंचे निकटवर्तीय... राजकीय हालचाली वाढल्या? ऑपरेशन टायगरबाबत..
आता ओमराजेंचे निकटवर्तीय... राजकीय हालचाली वाढल्या? ऑपरेशन टायगरबाबत बड्या मंत्र्याचं मोठं विधान
पुन्हा ठाकरेंचे आमदार...फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण होणाऱ्या सोहळ्यात
पुन्हा ठाकरेंच्या आमदारांची चर्चा! फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण होणाऱ्या कार्यक्रमात ठाकरेंच्या आमदाराची हजेरी
तुम्ही गुपचूप सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांना भेटून... मोठी खळबळ
तुम्ही गुपचूप सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांना भेटून... शिवसेना निकालाआधीच बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचे पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर...
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचं पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण, अखेर म्हणाले...
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिन...
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिनाच्या भाषणादरम्यान CM नेमकं काय म्हणाले?
पंतप्रधानांचं नागरिकांना मोठं आवाहन! जागतिक स्तरावर निर्यात वाढीसाठी..
पंतप्रधानांचं नागरिकांना मोठं आवाहन! जागतिक स्तरावर निर्यात वाढीसाठी...