AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हनीमूनच्या रात्री पतीनेच लावली करिश्मा कपूर हिची बोली; अभिनेत्रीचं खासगी आयुष्य भयंकर

अभिनेत्री करिश्मा कपूरचं आयुष्य एका खुल्या पुस्तकासारखं; हनीमूनच्या पहिल्या रात्री पतीनेच लावली बोली, सासूकडून मारहाण आणि घटस्फोट... करिश्माचं खासगी आयुष्य सिनेमापेक्षा देखील भयंकर

हनीमूनच्या रात्री पतीनेच लावली करिश्मा कपूर हिची बोली; अभिनेत्रीचं खासगी आयुष्य भयंकर
हनीमूनच्या रात्री पतीनेच लावली करिश्मा कपूर हिची बोली; अभिनेत्रीचं खासगी आयुष्य भयंकर
| Updated on: Jan 17, 2023 | 9:40 AM
Share

मुंबई : कपूर कुटुंबाची लेक आणि अभिनेत्री करिश्मा कपूर आता बॉलिवूडपासून दूर असली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. आज करिश्मा अभिनयात सक्रिय नसली तरी अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या प्रचंड मोठी आहे. करिश्मा सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. एक काळ होता जेव्हा करिश्मा हिने तिच्या अभिनयाने आणि डान्सने चाहत्यांच्या मनात राज्य केलं.

करिश्माचं प्रोफेशनल आयुष्य जेवढं यशस्वी, तेवढंच करिश्माला तिच्या खासगी अयुष्यात अपयशाचा सामना करावा लागला. करिश्मा कपूर लग्नानंतर चर्चेत आली, जेव्हा तिने पती संजय कपूरवर गंभीर आरोप केले. संजय कपूर आणि करिश्मा कपूर यांनी प्रेम विवाह केला.

लग्नानंतर काही वर्षांनी जेव्हा करिश्माने सासरच्या मंडळींवर घरगुती हिंसाचाराचे आरोप लावले, तेव्हा अभिनेत्रीच्या कुटुंबियांसोबतच चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला. करिश्माने दिलेल्या माहितीनुसार हनीमून पासूनच अभिनेत्रीवर अत्याचार झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, हनिमूनच्या रात्रीच संजय कपूरने करिश्माची बोली लावली होती. संजय कपूरने त्याच्या मित्रांसोबत करिश्मा कपूरसाठी बोली लावली होती. पण करिश्माने नकार दिल्यानंतर पती संजन याने अभिनेत्रीला मारहाण केली.

एवढंच नाही तर, फक्त संपत्तीसाठी लग्न केलं असल्याचं सांगत संजयने करिश्माला आर्थिक मदत देखील करत नव्हता. करिश्मा आणि संजय यांचं लग्न २००३ मध्ये झालं पण हे नातं फार काळ टिकलं नाही. एकमेकांवर अनेक गंभीर आरोप केल्यानंतर २०१४ मध्ये दोघे विभक्त झाले.

घटस्फोटानंतर करिश्मा कपूर तिच्या दोन मुलांसोबत आनंदाने आयुष्य जगत आहे. तर संजय कपूर याने प्रिया सचदेव हिच्यासोबत लग्न केलं आहे. प्रिया संजयची तिसरी पत्नी आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.