AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोनाक्षी सिन्हाच्या लग्नात का नाही आले भाऊ? 7 महिन्यांनंतर शत्रुघ्न सिन्हा यांनी सोडलं मौन

Shatrughan Sinha on Sonakshi Sinha Wedding: मुस्लिम मुलासोबत लग्न केलं म्हणून सोनाक्षीच्या लग्नात उपस्थित नव्हते भाऊ? अभिनेत्रीच्या लग्नाच्या 7 महिन्यांनंतर शत्रुघ्न सिन्हा यांचा मोठा खुलासा, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोनाक्षीच्या लग्नाची चर्चा...

सोनाक्षी सिन्हाच्या लग्नात का नाही आले भाऊ?  7 महिन्यांनंतर शत्रुघ्न सिन्हा यांनी सोडलं मौन
| Updated on: Dec 14, 2024 | 9:03 AM
Share

Shatrughan Sinha on Sonakshi Sinha Wedding: अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने सात वर्ष अभिनेता झहीर इक्बाल याला डेट केल्यानंतर लग्न केलं. 23 जून 2024 मध्ये सोनाक्षी आणि झहीर यांनी लग्न केलं. दोघांच्या लग्नात कुटुंबिय आणि खास मित्र उपस्थित होते. पण बहिणीच्या लग्ना भाऊ उपस्थित नसल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली. लग्नात अभिनेत्रीचा भाऊ लव सिन्हा कुठेच दिसला नाही. पण कुश सिन्हा फार कमी दिसला. सोनाक्षीच्या लग्नात दोन्ही भाऊ नसल्यामुळे सोशल मीडिया आणि चाहत्यांमध्ये अनेक चर्चा रंगल्या. सोनाक्षीने मुस्लिम मुलासोबत लग्न केलं म्हणून अभिनेत्रीचे भाऊ नाराज असल्याच्या चर्चांनी जोर घरला होता.

शिवाय सोनाक्षीच्या लग्ना दरम्यान लव सिन्हा सोशल मीडियावर अनेक क्रिप्टिक पोस्ट शेअर करत होता. ज्यामुळे चर्चांना अधिक उधाण आलं. अखेर सोनाक्षीच्या लग्नाच्या 7 महिन्यानंतर ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी मौन सोडलं आहे. सोनाक्षीच्या लग्नात तिचे भाऊ का दिसत नव्हते.. यावर शत्रुघ्न सिन्हा यांनी मोठा खुलासा केला आहे.

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत शत्रुघ्न सिन्हा यांनी सांगितलं की, ‘मी कोणतीही तक्रार करणार नाही. ते देखील व्यक्ती आहे. ते कदाचित अद्याप इतके परिपक्व नसावे. मी त्यांची वेदना आणि अडचण समजू शकतो. सांस्कृतिक प्रतिक्रिया नेहमीच असते. मी त्यांच्या वयाचा असतो तर मी देखील असंच केलं असतं. पण तुमची परिपक्वता, वरिष्ठता आणि अनुभव एक वेगळी भूमिका बजावते… त्यामुळे माझी प्रतिक्रिया माझ्या मुलांइतकी तीव्र नव्हती.’ असं शत्रुघ्न सिन्हा म्हणाले.

शत्रुघ्न सिन्हा पुढे म्हणाले, ‘मुलीने आंतरधर्मीय विवाह केलाय याला माझा पाठिंबा आहे. मी माझ्या मुलीला सपोर्ट करतो. असं न करण्यासाठी कोणतंच कारण नाही. तिचं लग्न आहे आणि लग्न तिच्या इच्छेनुसार व्हायला हवं… मी किंवा कोणी विरोध करणारे कोण आहोत? वडिलांच्या स्थानावर असल्यामुळे मुलीला सपोर्ट करणं माझं कर्तव्य आहे.. तिने काहीही बेकायदेशीर काम केलेलं नाही. तिच्या लग्नाच्या पार्टीचा देखील मी आनंद घेतला. अन्य पाहुण्यांना भेटून मला चांगलं वाटलं… सोनाक्षी आणि झहीर एकमेकांसोबत चांगले दिसतात…’ असं देखील शत्रुघ्न सिन्हा म्हणाले.

सांगायचं झालं तर, सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी रजिस्टर्ड पद्धतीत लग्न केलं. घरीच दोघांचं लग्न झालं. त्यानंतर रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं होतं. दोघांच्या लग्नात सलमान खान, रेखा, काजोल, हुमा कुरैशी यांसारखे अनेक सेलिब्रिटी होते.

Follow Us
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.
शांतता सामर्थ्यवानांची असते; राऊतांना नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर
शांतता सामर्थ्यवानांची असते; राऊतांना नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर.