AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मुलगी झाली हो’मधील अभिनेत्रीची नवी मालिका; घटस्फोटावर करणार भाष्य

स्टार प्रवाहच्या मुलगी झाली हो मालिकेतून घराघरात पोहोचलेली माऊ म्हणजेच अभिनेत्री दिव्या पुगावकर पुन्हा एकदा नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नव्या मालिकेत ती आनंदी ही व्यक्तिरेखा साकारणार आहे.

'मुलगी झाली हो'मधील अभिनेत्रीची नवी मालिका; घटस्फोटावर करणार भाष्य
'मन धागा धागा जोडते नवा' मालिकेची प्रेक्षकांमध्ये उत्सुकताImage Credit source: Tv9
| Updated on: Apr 10, 2023 | 11:20 AM
Share

मुंबई : स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेचं नाव ‘मन धागा धागा जोडते नवा’ असं आहे. मुलगी झाली हो, रंग माझा वेगळा, आई कुठे काय करते यांसारख्या मालिकांमधून स्टार प्रवाह वाहिनीने वेगळे विषय हाताळले आहेत. आता मन धागा धागा जोडते नवा या मालिकेत घटस्फोट या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर भाष्य करण्यात येणार आहे.

या नव्या प्रयोगाविषयी सांगताना स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, “स्टार प्रवाहने आजपर्यंत नेहमीच ज्वलंत आणि आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींना घेऊन वेगवेगळ्या मालिका बांधल्या आहेत आणि त्या रसिकांसमोर सादर केल्या आहेत. या कथा आणि आणि ही पात्र रसिकांना आवडण्यामागचं कारण हेच आहे की त्या खऱ्या वाटतात आणि तो प्रवास एक नवी ऊर्जा देतो. आई कुठे काय करते, मुलगी झाली हो, रंग माझा वेगळा या मालिका एक उत्तम उदाहरण आहेत. अश्याच एका महत्त्वाच्या विषयावर आता स्टार प्रवाह वाहिनी मालिका घेऊन येतेय आणि तो विषय आहे घटस्फोट.”

“घटस्फोट हा कोणत्याही गोष्टीचा शेवट नाही. आयुष्याच्या प्रवासात या एका अपघातानंतर बराच प्रवास असतो जो सहज सुखकर असू शकतो हे दाखवणारी ही मालिका आहे. प्रत्येक घटस्फोटित मुलासाठी, मुलीसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी मन धागा धागा जोडते नवा ही मालिका एक प्रेरणादायी मालिका असेल याची आम्हाला खात्री आहे,” असं ते पुढे म्हणाले.

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

स्टार प्रवाहच्या मुलगी झाली हो मालिकेतून घराघरात पोहोचलेली माऊ म्हणजेच अभिनेत्री दिव्या पुगावकर पुन्हा एकदा नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नव्या मालिकेत ती आनंदी ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. इतरांना भरभरुन आनंद देणारी ही व्यक्तिरेखा साकारण्यासाठी अभिनेत्री दिव्या पुगावकर प्रचंड उत्सुक आहे.

या नव्या भूमिकेविषयी सांगताना दिव्या म्हणाली, “मुलगी झाली हो मालिकेत न बोलता खूप काही व्यक्त करण्याचं आव्हान होतं. या मालिकेत मी बोलणार तर आहे पण मनात खूप साऱ्या भावना साचवून. त्यामुळे आनंदी ही व्यक्तिरेखा एक अभिनेत्री म्हणून जास्त आव्हानात्मक आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या अभिनेत्याला स्क्रीनवर पहात आलेय त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करायला मिळणं हे स्वप्नवत आहे. हा अभिनेता नेमका कोण आहे हे कळेलच. पण या मालिकेच्या रुपात नवी जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळेल. आनंदी साकारण्यासाठी सध्या मी माझ्या भाषेवर आणि आवाजावर काम करतेय. माऊ या भूमिकेवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं आहे. हेच प्रेम आनंदीलाही मिळेल याची खात्री आहे.”

स्टार प्रवाह वाहिनीवरील ही नवी मालिका येत्या 8 मे पासून संध्याकाळी 6.30 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.