AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पतीच्या निधनावर पहिल्यांदाच मंदिरा बेदी व्यक्त; म्हणाली ‘पहिलं वर्ष खूप कठीण..’

जून 2021 मध्ये अभिनेत्री मंदिरा बेदीचा पती राज कौशलचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. पतीच्या निधनाच्या तीन वर्षांनंतर मंदिरा पहिल्यांदाच मोकळेपणे व्यक्त झाली. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मंदिराने भावना व्यक्त केल्या आहेत.

पतीच्या निधनावर पहिल्यांदाच मंदिरा बेदी व्यक्त; म्हणाली 'पहिलं वर्ष खूप कठीण..'
Mandira Bedi with husbandImage Credit source: Instagram
| Updated on: Jun 16, 2024 | 5:01 PM
Share

अभिनेत्री मंदिरा बेदीने 2021 मध्ये पती राज कौशलला गमावलं. पतीच्या निधनानंतर मंदिरा आजवर त्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली नव्हती. राज कौशलबद्दल बोलणं तिने टाळलं होतं. मात्र आता पहिल्यांदाच ती पतीबद्दल व्यक्त झाली आहे. ‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’ला दिलेल्या मुलाखतीत मंदिराने सांगितलं की ती कशा पद्धतीने या दु:खातून सावरली आणि आता तिचं आयुष्य कसं जगतेय? जून 2021 मध्ये राज कौशलचं निधन हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने झालं होतं. पतीच्या निधनाच्या तीन वर्षांनंतर मंदिराने या मुलाखतीत भावना व्यक्त केल्या आहेत. पतीचा उल्लेख करताच डोळ्यात अश्रू यायचे, यामुळे माझ्यात बोलण्याची हिंमत नव्हती.. असं तिने सांगितलं.

या मुलाखतीत मंदिराने सांगितलं की राजच्या निधनानंतर पहिलं वर्ष तिच्यासाठी सर्वांत कठीण होतं. मात्र आता हळूहळू सर्व गोष्टी ठीक होत आहेत. याविषयी ती म्हणाली, “मी आणि माझी मुलं दररोज त्याच्याविषयी विचार करतो. असं नाहीये की मी त्याला विसरले आहे. पहिलं वर्ष खूप, खूप, खूप कठीण होतं. पहिल्या गोष्टीचा सामना करणं खूप कठीण असतं. पहिला जन्मदिन, पहिली ॲनिव्हर्सरी, पहिली दिवाळी, पहिला ख्रिसमस. दुसरं थोडं सोपं गेलं, तिसरं थोडं आणखी सोपं..”

View this post on Instagram

A post shared by Mandira Bedi (@mandirabedi)

या दु:खातून बाहेर येण्यासाठी स्वत:ला कामात झोकून दिल्याचं तिने सांगितलं. “असेही काही क्षण आले की जेव्हा आम्हाला एखादं गाणं ऐकल्यावर त्याची आठवण आली. मला ज्या थेरपीची गरज होती, ती मी घेतली. एक माणूस म्हणून तुम्ही नेहमी पुढे जाण्याचा प्रयत्न करता. आता मी त्याच्याबद्दल बोलू शकते. आजही मी त्याच्याबद्दल बोलताना भावूक होते. मात्र मी आता बोलू शकते. एक वेळ अशी होती जेव्हा मी इतकंसुद्धा बोलू शकत नव्हते. मात्र मी खचणार नाही. पतीच्या निधनाच्या दोन महिन्यांनंतर मी कामाला सुरूवात केली. कारण मला माझ्या कुटुंबीयांची जबाबदारी घ्यायची होती. माझ्या मुलांखातर मला हे करावं लागलं,” असं ती पुढे म्हणाली.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा