AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पतीच्या निधनावर पहिल्यांदाच मंदिरा बेदी व्यक्त; म्हणाली ‘पहिलं वर्ष खूप कठीण..’

जून 2021 मध्ये अभिनेत्री मंदिरा बेदीचा पती राज कौशलचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. पतीच्या निधनाच्या तीन वर्षांनंतर मंदिरा पहिल्यांदाच मोकळेपणे व्यक्त झाली. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मंदिराने भावना व्यक्त केल्या आहेत.

पतीच्या निधनावर पहिल्यांदाच मंदिरा बेदी व्यक्त; म्हणाली 'पहिलं वर्ष खूप कठीण..'
Mandira Bedi with husbandImage Credit source: Instagram
| Updated on: Jun 16, 2024 | 5:01 PM
Share

अभिनेत्री मंदिरा बेदीने 2021 मध्ये पती राज कौशलला गमावलं. पतीच्या निधनानंतर मंदिरा आजवर त्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली नव्हती. राज कौशलबद्दल बोलणं तिने टाळलं होतं. मात्र आता पहिल्यांदाच ती पतीबद्दल व्यक्त झाली आहे. ‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’ला दिलेल्या मुलाखतीत मंदिराने सांगितलं की ती कशा पद्धतीने या दु:खातून सावरली आणि आता तिचं आयुष्य कसं जगतेय? जून 2021 मध्ये राज कौशलचं निधन हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने झालं होतं. पतीच्या निधनाच्या तीन वर्षांनंतर मंदिराने या मुलाखतीत भावना व्यक्त केल्या आहेत. पतीचा उल्लेख करताच डोळ्यात अश्रू यायचे, यामुळे माझ्यात बोलण्याची हिंमत नव्हती.. असं तिने सांगितलं.

या मुलाखतीत मंदिराने सांगितलं की राजच्या निधनानंतर पहिलं वर्ष तिच्यासाठी सर्वांत कठीण होतं. मात्र आता हळूहळू सर्व गोष्टी ठीक होत आहेत. याविषयी ती म्हणाली, “मी आणि माझी मुलं दररोज त्याच्याविषयी विचार करतो. असं नाहीये की मी त्याला विसरले आहे. पहिलं वर्ष खूप, खूप, खूप कठीण होतं. पहिल्या गोष्टीचा सामना करणं खूप कठीण असतं. पहिला जन्मदिन, पहिली ॲनिव्हर्सरी, पहिली दिवाळी, पहिला ख्रिसमस. दुसरं थोडं सोपं गेलं, तिसरं थोडं आणखी सोपं..”

View this post on Instagram

A post shared by Mandira Bedi (@mandirabedi)

या दु:खातून बाहेर येण्यासाठी स्वत:ला कामात झोकून दिल्याचं तिने सांगितलं. “असेही काही क्षण आले की जेव्हा आम्हाला एखादं गाणं ऐकल्यावर त्याची आठवण आली. मला ज्या थेरपीची गरज होती, ती मी घेतली. एक माणूस म्हणून तुम्ही नेहमी पुढे जाण्याचा प्रयत्न करता. आता मी त्याच्याबद्दल बोलू शकते. आजही मी त्याच्याबद्दल बोलताना भावूक होते. मात्र मी आता बोलू शकते. एक वेळ अशी होती जेव्हा मी इतकंसुद्धा बोलू शकत नव्हते. मात्र मी खचणार नाही. पतीच्या निधनाच्या दोन महिन्यांनंतर मी कामाला सुरूवात केली. कारण मला माझ्या कुटुंबीयांची जबाबदारी घ्यायची होती. माझ्या मुलांखातर मला हे करावं लागलं,” असं ती पुढे म्हणाली.

Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.