AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manisha Koirala: माझा मृत्यू जवळ आलाय.. कॅन्सरच्या चौथ्या स्टेजमध्ये अशी होती मनिषा कोईरालाची अवस्था

Manisha Koirala: मनिषाच्या ही संघर्षाची कहाणी केवळ एका अभिनेत्रीची नाही, तर अत्यंत कठीण परिस्थितीतही आशा न सोडण्याची कहाणी आहे. तिचा हा अनुभव ऐकून चाहत्यांनीही सोशल मीडियावर तिच्या धैर्याचं कौतुक केलं आहे.

Manisha Koirala: माझा मृत्यू जवळ आलाय.. कॅन्सरच्या चौथ्या स्टेजमध्ये अशी होती मनिषा कोईरालाची अवस्था
Manisha Koirala Image Credit source: Instagram
| Updated on: Sep 01, 2026 | 9:14 AM
Share

Manisha Koirala: बॉलिवूड अभिनेत्री मनिषा कोईरालाने तिच्या आयुष्यातील अत्यंत कठीण काळाबद्दल पुन्हा एकदा मन मोकळं केलं आहे. कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचा सामना करताना आलेला अनुभव, त्या काळातील भीती आणि प्रचंड एकटेपणाची भावना याबद्दल त्यांनी सांगितलं. कॅन्सरचं निदान झाल्यानंतर आयुष्य संपत असल्यासारखं वाटत होतं, असं ती म्हणाली. तिच्या या आठवणींनी चाहत्यांनाही भावूक केलं आहे. मनिषा कोईरालाला काही वर्षांपूर्वी ओव्हेरियन कॅन्सरचं निदान झालं होतं. आजार चौथ्या स्टेजमध्ये असल्याचं समोर आल्यानंतर तिला मोठा धक्का बसला. तिच्यासमोर अचानक मृत्यूचं सावट उभं राहिलं होतं. या काळात मानसिक आणि भावनिक पातळीवर तिने मोठा संघर्ष केला.

कॅन्सरचं निदान झाल्यानंतरची पहिली रात्र तिच्या आयुष्यातील सर्वात भयावह रात्रींपैकी एक होती. त्या क्षणी पुढे काय होणार, उपचारांचा काय परिणाम होईल आणि आपण पुन्हा पूर्वीसारखं आयुष्य जगू शकू का, असे अनेक प्रश्न तिच्या मनात होते. या काळात तिला प्रचंड एकटेपणाची जाणीव झाली.

सुशांत प्रधानच्या पॉडकास्टमध्ये याविषयी मनिषा म्हणाली, “रुग्णालयातील त्या रात्री, मी एका खोल अंधारात जात आहे, असं मला वाटत होतं. सर्वकाही संपणार आहे, मृत्यू जवळ आला आहे, या भीतीने मी सतत ग्रासले होते. गंभीर आजारातून जात असताना वाटणारी भीती आणि एकटेपणा हा अकल्पनीय असतो. या अनुभवाने मला शिकवलं की आजारपण फक्त शारीरिक वेदनाच देत नाही, तर माणसाला मानसिकदृष्ट्याही एकाकी पाडतं. एकटेपणा हे जीवनाचं कठोर वास्तव आहे. कधीकधी लोकांच्या गर्दीतही माणसाला एकाकी वाटतं.”

View this post on Instagram

A post shared by Manisha Koirala (@m_koirala)

कर्करोगावर मात केल्यानंतर मनिषा कोईरालाचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोण पूर्णपणे बदलला आहे. “जेव्हा आयुष्याने मला पुन्हा जगण्याची संधी दिली, तेव्हा मी माझ्या तत्त्वांशी जुळत नसलेल्या सर्व अनावश्यक गोष्टींपासून स्वत:ला दूर केलं. आजारपणापूर्वी मी माझ्या आरोग्याबाबत खूप निष्काळजीपणे वागत होती. पण आता मी माझं आरोग्य, कुटुंब, निसर्ग आणि देवाप्रती कृतज्ञता यांना प्राधान्य देते”, असं तिने सांगितलं.

कॅन्सरशी लढताना मनिषाचं आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला. पूर्वी छोट्या वाटणाऱ्या गोष्टींचं महत्त्व तिला या काळात नव्याने जाणवलं. मृत्यूची भीती समोर असताना प्रत्येक क्षण किती मौल्यवान आहे, याची जाणीव तिला झाली.

Follow Us
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच: समितीच्या कामकाजावरून वाद
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान: महायुती म्हणून एकत्रित लढण्याला प्राधान्य
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा..
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर...
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर कुत्र्याने मालकाच्या घरासमोर ठाण मांडलं
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात...
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात... राजकारणातील हालाचली वाढल्या
त्रिशुलीतील बँक बचाव मोहीम: पुराच्या पाण्यातून सोने आणि रोकड जप्त
नेपाळ पूर: पाण्यात बुडालेल्या बँकेतून ५० कोटींचे सोने सुरक्षित बाहेर
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट...
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट गुन्हा दाखल
पीडित कुटुंबाला सुनेत्रा पवारांकडून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन
पिंपरी चिंचवड हुंडाबळी प्रकरण; सुनेत्रा पवारांनी गवारे कुटुंबीयांशी साधला संवाद
लक्ष्मण हाके यांच्या ओबीसी मोर्चाला पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली
मुंबईत ओबीसी आंदोलनाला परवानगी नाकारली; पोलिसांचा दुसऱ्यांदा नकार