AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईतून मराठी माणूस होतेय कमी? सोनालीचं मोठं वक्तव्य, महिलांवर होणाऱ्या अत्याचारांबद्दल म्हणाली…

मुंबईतून मराठी माणूस कमी होतोय? असं का म्हणाली मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी? महिलांवर होत असलेल्या अत्याचाराच्या वाढत्या प्रमाणावर देखील सोनाली कुलकर्णी हिने मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीची चर्चा...

मुंबईतून मराठी माणूस होतेय कमी? सोनालीचं मोठं वक्तव्य, महिलांवर होणाऱ्या अत्याचारांबद्दल म्हणाली...
| Updated on: Aug 30, 2024 | 10:16 AM
Share

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने अनेक सिनेमांध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. अभिनेत्री तिच्या सौंदर्यामुळे देखील कायम चर्चेत असते. शिवाय अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर देखील अभिनेत्री स्वतःचं मत मांडत असते. नुकताच सोनाली हिने मुंबईतील मराठी माणूस आणि महिलांवर होणाऱ्या अत्याचारांबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोनाली कुलकर्णी हिची चर्चा रंगली आहे.

सांगायचं झालं तर, नुकताच दहीहंडी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दहीहंडी सणाचं निमित्त साधत अभिनेत्री सोनाली कुलकर्णी म्हणाली, ‘आपल्याला कायम वाटतं की मुंबईतून मराठी माणसं कमी होत आहेत का?’ पण सणांच्या दिवशी मराठी माणसांचा उत्साह दिसून येतो. सणांच्या निमित्ताने मराठी माणूस एकत्र येतो. महाराष्ट्राचा मानाचा उत्सव मराठमोळ्या पद्धतीने साजरा व्हावा अशी जिद्द असते… हे पाहून फार छान वाटतं…’ असं अभिनेत्री म्हणाली.

एवढंच नाही तर, महिलांवर होणाऱ्या अत्याचारांबद्दल देखील सोनाली हिला विचारण्यात आलं. यावर अभिनेत्री म्हणाली, ‘फक्त महाराष्ट्रातच नाही तर, संपूर्ण जगात सारखीच परिस्थिती आहे. घडणाऱ्या घटनांचा प्रचंड राग आहे… देशातील कायदे कठोर होत नाहीत, तोपर्यंत कोणत्याच राज्यात क्रांती घडणार नाही. प्रत्येक देशात, प्रत्येक राज्यात बदल घडायला हवेत…’

‘पीडितांना न्याय मिळण्याची प्रक्रिया त्वरित व्हायला हवी आहे. अशा गुन्ह्यांची शिक्षा देखील कठोर असली पाहिजे… जोपर्यंत अशा विषयांकडे गांभीर्याने पाहिलं जाणार नाही, तोपर्यंत बदल घडणार नाही…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोनाली कुलकर्णी हिच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

सोनाली कुलकर्णी हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने ‘नटरंग’, ‘झिम्मा’, ‘क्षणभर विश्रांती’, ‘हिरकणी’, ‘क्लासमेट’, ‘पोश्टर गर्ल’, ‘पांडू’, ‘हंपी’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. चाहते देखली अभिनेत्रीच्या आगामी सिनेमांच्या प्रतीक्षेत असतात.

सोनाली सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. चाहते देखील सोनालीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

Follow Us
मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा दरड कोसळली; वाहतूक एकाच लेनवर
Breaking! मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा दरड कोसळली; वाहतूक एकाच लेनवर, प्रशासन अॅक्शन मोडमध्ये
'दादांच्या आठवणी कुठे नाहीत...' पंढरपूर वारीदरम्यान सुनेत्रा पवारांचं
Sunetra Pawar | 'दादांच्या आठवणी कुठे नाहीत...' पंढरपूर वारीदरम्यान सुनेत्रा पवारांचं भावनिक विधान
कल्याण-डोंबिवलीत पुन्हा पावसाचा कहर! मुसळधार सरींनी नागरिकांची धावपळ
Heavy Rain | कल्याण-डोंबिवलीत पुन्हा पावसाचा कहर! अचानक मुसळधार सरींनी नागरिकांची धावपळ
जयंत पाटील–विनोद तावडे भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ
NDAमध्ये शरद पवारांची एन्ट्री? जयंत पाटील–विनोद तावडे भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ
इतका भयंकर वेग की मोठमोठे कंटेनर फरफटले गेले, दोघांचा मृत्यू अन्...
इतका भयंकर वेग की मोठमोठे कंटेनर फरफटले गेले, दोघांचा मृत्यू अन्... भुस्खलनाचा थरारक व्हिडीओ समोर
मृत्यूवर हसलो नाही! अमित साटम यांचा सभागृहात मोठा खुलासा; म्हणाले...
Amit Satam | मृत्यूवर हसलो नाही! अमित साटम यांचा सभागृहात मोठा खुलासा; म्हणाले...
देवस्थानाच्या पाहणीला गेले अन् कार चिखलातच अडकली; गिरीश महाजन यांनाही
देवस्थानाच्या पाहणीला गेले अन् कार चिखलातच अडकली; गिरीश महाजन यांनाही पूरस्थितीचा फटका
खाली धावपट्टी आहे की नाही? हेच समजेना! अखेर वैमानिकाने... अंगावर काटा
Navi Mumbai | खाली धावपट्टी आहे की नाही? हेच समजेना! अखेर वैमानिकाने... अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
स्थानिकांना दिलासा! वाऱ्यांची दिशा बदलेली अन् मोठं संकट टळलं, आता...
स्थानिकांना दिलासा! वाऱ्यांची दिशा बदलेली अन् मोठं संकट टळलं, आता या शहरावर ओढावलं ढगफुटीचं संकट
संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना! 427 वर्षांची परंपरा...
Ashadhi Wari 2026 | संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना! 427 वर्षांची परंपरा, विठ्ठल... विठ्ठलच्या गजरात दुमदुमलं पैठण