AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्र भूषण पुरस्काराने अशोक सराफ भारावले, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबतच्या आठवणींना दिला उजाळा

"लक्ष्याने माझ्याबरोबर फक्त सिनेमात काम केलं. त्याने नाटकात कधी काम केलं नाही. पण सिनेमात आमचं दोघांचं टायमिंग जमून आलं. आम्ही दोघांनी एकत्र जवळपास 50 सिनेमे केले असतील. त्यामुळे आमची जोडी इतकी जमलेली होती, टायमिंग जमल्यामुळे रोल खुलून यायचा", असं अशोक सराफ म्हणाले.

महाराष्ट्र भूषण पुरस्काराने अशोक सराफ भारावले, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबतच्या आठवणींना दिला उजाळा
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Jan 30, 2024 | 9:43 PM
Share

मुंबई | 30 जानेवारी 2024 : ज्येष्ठ अभिनेते शोक सराफ यांना महाराष्ट्र सरकारचा मानाचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर झाला आहे. अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आम्ही त्यांची पहिली प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. अशोक सराफ यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. “माझी प्रतिक्रिया तशी संमिश्र आहे. हा पुरस्कार मिळणं हे खरंच मोठी मानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. कारण हा पुरस्कार आधी ज्या-ज्या लोकांना मिळाला आहे ती नावे इतकी थोर आहेत की त्यानंतर मला त्या लायनीत नेऊन बसवलं ही माझ्यासाठी फार मोठी आनंदाची गोष्ट झाली आहे. महाराष्ट्राचा भूषण म्हणजे महाराष्ट्राचा नंबर 1 पुरस्कार आहे असं मी समजतो. तो पुरस्कार माझ्याकडे आलाय यापेक्षा जास्त आनंद असूच शकत नाही”, असं अशोक सराफ म्हणाले. यावेळी त्यांनी दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला.

“मी सतत 50 वर्षे सिनेमा, नाटक आणि सीरियलमध्ये जे काम केलं ते कुठेतरी सत्कारणी लागत आहे. प्रेक्षक आणि सरकारने त्या कामाची दाद घेतली. मला अतिशय मनाला भावून गेलं आहे. मी अतिशय भारावून गेलो आहे. त्यामुळे मी आणखी त्या गोष्टीचा बांधला गेलो आहे की, आपल्याला आणखी काहीतरी वेगळं आणि चांगलं करायचं आहे. त्यामुळे मी सिलेक्टेड काम करतोय. पण मी काम निश्चितच करत राहणार. माझे तुम्ही आहात आणि तुमचा मी आहे, मी तुमच्याशिवाय राहुच शकत नाही. त्यामुळे काम करायलाच पाहिजे”, अशी प्रतिक्रिया अशोक सराफ यांनी दिली.

‘आम्ही दोघांनी एकत्र जवळपास 50 सिनेमे केले’

“खरंतर या लोकांची आठवण येणं साहजिकच आहे. माझ्याबरोबर ज्यांनी काम केलं त्यापैकी सचिन पिळगावकर. सचिनसोबत मी 15 ते 16 चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं. मी जास्तीत जास्त चित्रपट सचिनसोबत केले. सचिन आणि माझी जोडी एकदम हिट होती. लक्ष्याने माझ्याबरोबर फक्त सिनेमात काम केलं. त्याने नाटकात कधी काम केलं नाही. पण सिनेमात आमचं दोघांचं टायमिंग जमून आलं. आम्ही दोघांनी एकत्र जवळपास 50 सिनेमे केले असतील. त्यामुळे आमची जोडी इतकी जमलेली होती, टायमिंग जमल्यामुळे रोल खुलून यायचा. लक्ष्मीकांत गेल्यानंतर माझी एक बाजू थोडीशी कमी झाली. मला दुसरा माणूस शोधावा लागला किंवा तयार करावा लागला. पण लक्ष्मीकांतच्या वेळेला कधीच कठीण पडलं नाही”, अशी भावना अशोक सराफ यांनी व्यक्त केली.

निवेदिताताईंची प्रतिक्रिया काय?

यावेळी त्यांना पत्नी निवेदिता सराफ यांची प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावर अशोक सराफ यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली. “मला बरेच फोन आले आहेत. फोन बंद करतो तेवढ्यात फोन वाजतोय. फोन एकामागे एक येतच होते. शेवटी मी तो फोन काही वेळासाठी बंद केला आहे. पण सतत येत आहे. निवेदिताची प्रतिक्रिया सर्वात पहिल्यांदा आली. कारण पहिला फोन तिलाच आला. ती पहिल्यांदा इतक्या मोठ्यात ओरडली, अर्थात तिला माझ्यासाठी हा आनंद होणार हे स्वभाविकच आहे. कारण माझ्या या सगळ्या वाटचालीमध्ये तिचा हाच आहेच. ती माझ्यामागे ठामपणे उभी आहे. मी माझं कामशिवाय दुसरं काही बघूच शकत नाही, अशी परिस्थिती तिने करुन ठेवली आहे. त्यामुळे मला कितीतरी फायदा झाला. माझं लग्न होण्याआधी भावाने सर्व काही सांभाळलं आणि लग्नानंतर तिने सर्व काही सांभाळलं आहे. माझ्या जडणघडणीत तिचं योगदान फार मोठं आहे”, असं अशोक सराफ म्हणाले.

Follow Us
‘स्कूल ठीक करो’ मोहिमे अंतर्गत CJP पदाधिकारी आणि दादा भुसे यांची भेट
मंत्री दादा भुसे आणि कॉकरोच जनता पार्टीची भेट
OBC आश्रमशाळांना इशारा; मूलभूत सुविधा न दिल्यास मान्यता रद्द
राज्यातील जिल्हा परिषद शाळा आणि आश्रमशाळांच्या दयनीय स्थितीवर मंत्र्यांची कठोर भूमिका
आदिवासी विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय, वयोमर्यादेचा नियम शिथिल
आदिवासी विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय, वयोमर्यादेचा नियम शिथिल
कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट