AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लता दिदींच्या अंत्यसंस्कारावेळी नेमकं काय घडलं?, अभिनेत्री हेमांगी कवीची नवी फेसबुक पोस्ट, म्हणते, ‘चहापेक्षा किटली गरम’

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं 6 फेब्रुवारीला निधन झालं. लतादिदींचं दर्शन घ्यायला जाताना अडवणून झाल्याचं हेमांगी कवीनं सांगितलं. त्यानंतर मराठी कलाकारांना अडवलं गेल्याचा सूर उमटू लागला. यावर आता तिने फेसबुकवर पोस्ट लिहित स्पष्टीकरण दिलं आहे.

लता दिदींच्या अंत्यसंस्कारावेळी नेमकं काय घडलं?, अभिनेत्री हेमांगी कवीची नवी फेसबुक पोस्ट, म्हणते, 'चहापेक्षा किटली गरम'
हेमांगी कवी
| Edited By: | Updated on: Feb 09, 2022 | 1:06 PM
Share

मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर (lata Mageshkar) यांचं 6 फेब्रुवारीला निधन झालं. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण देश शोकसागरात बुडाला होता. सगळ्यांनाच लता मंगेशकर यांचं अंत्यदर्शन घेता यावं असं वाटत होतं. अश्यातच पेडर रोडवरच्या त्यांच्या प्रभूकुंज या निवासस्थानी त्यांना अखेरचा प्रणाम करण्यासाठी अनेकजण गेले होते. यात मराठी अभिनेत्री हेमांगी कवीदेखील (Hemangi Kavi) होती. लतादिदींचं दर्शन घ्यायला जाताना अडवणून झाल्याचं हेमांगी कवीनं सांगितलं. त्यानंतर मराठी कलाकारांना अडवलं गेल्याचा सूर उमटू लागला. यावर आता तिने फेसबुकवर पोस्ट लिहित स्पष्टीकरण दिलं आहे. “फक्त मराठी कलाकारांनाच नाही तर हिंदी सेलिब्रिटींनादेखील लतादिदींच्या घरी जाण्यापासून पोलिसांकडून अडवलं गेलं. हे सगळं बघून चहापेक्षा किटली गरम असं म्हणावसं वाटतं”, असं हेमांगी कवीने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणाली आहे.

हेमांगी कवीची फेसबुक पोस्ट

हेमांगी कवीने घडल्या प्रकारावर फेसबुक पोस्ट लिहीत प्रकाश टाकला आहे. हेमांगी कवी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणते, “परवा मयूर अडकरच्या post वर खरंतर विचारलेल्या प्रश्नावर मी comment केली. मला आलेला अनुभव share केला. स्वतंत्र post लिहिली नाही. त्या comment मध्ये ही मी गायक जे हिंदीत प्रसिद्ध आहेत शान, मिका सिंग, शैलेंद्र सिंग, कैलास खेर, कविता पौडवाल, मराठीतले गायक बेला शेंडे, नंदेश उमप यांना जवळून दर्शन मिळावं म्हणून खूप प्रयत्न करावे लागले जे सहजरित्या मिळू शकत होतं हे नमूद केलंय. यात कुठेही पोलिसांनी bollywood, हिंदी आणि मराठी असा फरक केला नाही. आणि जर केला असेल तर तो फरक bollywood किंवा हिंदीत काम करणाऱ्यांनी केला का? तर नाही! पोलिसांना वाटलं अमुक अमुक लोकांना पाठवायला हवं, त्यांच्या मनाला वाटलं त्या लोकांनाच सहजपणे शेवटचं दर्शन घेऊ दिलं. किंवा त्यांच्यासाठी तशी सोय करण्यात आली असावी. हिंदीतल्या लोकांना आत सोडा आणि मराठील्या लोकांना नको असा काही criteria त्यांनी केला नाही. थोडक्यात मेरे मन को भाया…”, असं म्हणत तिने फक्त मराठीच नाही तर हिंदी कलाकारांनाही अडवण्यात आल्याचं सांगितलं आहे.

चहापेक्षा किटली गरम

“हिंदीतल्या the विद्या बालन आणि सिद्धार्थ रॉय कपूर लाही इतर bollywood अभिनेत्यांसारखा थेट प्रवेश दिला नाही थांबवून ठेवलं. उशिराने आलेल्या आमिर खान, त्याची मुलगी, रणबीर कपूर, शंकर महादेवन यांना मात्र आमच्या अगदी बाजूने थेट आत सोडण्यात आलं. त्यामुळे सगळाच सावळा गोंधळ होता. Covid मुळे तशी ही फार गर्दी नव्हती. सगळे सौजन्याने वागत होते. शांतीपूर्ण वातावरण होतं. सहज दर्शन मिळू शकलं असतं. पण नाही. तुम्ही कुणीही celebrity असला तरी आता तुम्हांला जाऊ देणार नाही म्हणत दोन महिला पोलीस अधिकारी एकमेकींना टाळी देत हसल्या. तिथे काही हिंदीतल्या कलाकारांना जाऊ दिलं आणि आम्हांला पुन्हा अडवलं तेही मराठी पोलिसांनी! यात चूक त्या हिंदी कलाकारांची??? गोष्ट जेव्हा भांडणापर्यंत पोचली तेव्हा आम्हांला लताजींच्या पार्थिवाजवळ जाऊ देण्यास वाट मोकळी झाली. पार्थिवाजवळ पोचल्यावर ना कुणी अडवलं ना हटकलं. अगदी घरच्या मंडळींप्रमाणे दर्शन घेऊ दिलं. हवा तितका वेळ थांबू दिलं! मंगेशकर कुटुंबियांसोबत उभं केलं. पण gate पासून ते इथपर्यंत जो काही प्रकार झाला तो म्हणजे ‘चाय से ज्यादा किटली गरम’ हाच होता!”, असं हेमांगीने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलंय.

राजकीय मंडळींना व्हीआयपी ट्रीटमेंट

“राजकारण क्षेत्रातील आणि शासकीय मंडळींमुळे, त्यांच्या सुरक्षा कारणांमुळे मनाई केली. बरं त्यात ही या लोकांसाठी वेगळी सोय केली असताना सर्व gates वर मनाई केली. ती का केली हे पोलिसच चांगल्या प्रकारे सांगू शकतात. तिथले पोलिस हिंदीतल्या गायक मंडळींना सुद्धा सतत मागे जाऊन बसायला सांगत होते आणि या हिंदी गायकांना ही शेवट पर्यंत थांबूनच ठेवण्यात आलं. मी या प्रकाराकडे वरून आलेले आदेश पोलीस पाळत होते आणि सरकारी protocols याच अर्थाने पाहिलंय. पोलिसांनी हिंदी मराठी दोन्ही गायक कलाकारांपेक्षा नेते मंडळी, शासकीय लोकांना झुकतं माप दिलं गेल्याचं दिसलं हे मात्र तेवढंच खरं! कलाकारांच्या भावनेपेक्षा नेते मंडळींची सुरक्षा महत्वाची वाटली याला bollywood कसं जबाबदार?”, अशी खंतही हेमांगीने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये व्यक्त केली आहे.

संबंधित बातम्या

VIDEO : अपघातानंतर बघ्यांची गर्दी, मदतीला कोणीच नाही, पण Sonu Sood ने तरुणाला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले!

Amrita Singh Birthday : अमृता सिंहचं करिअर, 12 वर्षांनी लहान सैफ अली खानवर प्रेम-लग्न-घटस्फोट, सगळं वाचा एका क्लिकवर…

‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’मधील खंडेराव यांच्या भूमिकेसाठी गौरव अमलानीची वेगळी मेहनत

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.