AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऐश्वर्या – अभिषेक यांच्या लग्नात जान्हवी कपूरने कापली होती स्वतःची नस! काय आहे संपूर्ण प्रकरण

Abhishek Bachchan - Aishwarya Rai: ऐश्वर्या राय - अभिषेक बच्चन यांचं लग्न सुरु होतं, तर दुसरीकडे जान्हवी कपूर कापली होती स्वतःची नस! लग्न मंडपात माजली होती खळबळ... सर्वत्र चर्चांना उधाण..., फार कमी लोकांना माहिती आहे प्रकरण...

ऐश्वर्या - अभिषेक यांच्या लग्नात जान्हवी कपूरने कापली होती स्वतःची नस! काय आहे संपूर्ण प्रकरण
| Updated on: Aug 23, 2024 | 9:02 AM
Share

Abhishek Bachchan – Aishwarya Rai Marriage: अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांच्या लग्नाबद्दल अनेक चर्चा रंगल्या आहेत. दोघांचं नातं आता घटस्फोटापर्यंत देखील पोहोचलं आहे… असं सांगण्यात येत आहे. पण यावर अद्याप कोणी अधिकृत वक्तव्य केलेलं नाही. 2007 मध्ये ऐश्वर्या – अभिषेक यांनी लग्न केलं. पण दोघांच्या लग्नात अनेक अडचणी आल्या. तेव्हा दोघांच्या लग्नाला थांबण्याचा प्रयत्न जान्हवी कपूर हिने केला होता. ही घटना फार कमी लोकांना माहिती आहे.

ऐश्वर्या – अभिषेक यांचं लग्न थांबण्यासाठी जान्हवी कपूर हिने स्वतःच्या हाताची नस कापून घेतली होती. जान्हवी कपूर बॉलिवूडची अभिनेत्री नाही तर, एक मॉडेल होती. जान्हवी हिने मोठा दावा केला होता. अभिषेक बच्चन आणि माझं लग्न झालं आहे… असा दावा जान्हवी कपूर हिने केला होता.

अभिषेक बच्चन याने गुपचूप 2006 मध्ये माझ्यासोबत लग्न केलं आहे… असा दावा जान्हवी हिने केला होता. एवढंच नाही तर, जान्हवी हिने अभिषेक विरोधात पोलिसांत तक्रार देखील दाखल केली होती. पण कोणतेच पुरावे नसल्यामुळे जान्हवी पोलिसांसमोर काहीही साध्य करु शकली नाही. ज्यामुळे पोलिसांनी देखील तक्रार दाखल करण्यास नकार दिला.

ऐश्वर्या – अभिषेक यांचं लग्न मोडण्यासाठी जान्हवीने सर्व प्रयत्न केले. दोघांच्या लग्नाच्या दिवशी जान्हवी हिने स्वतःच्या हाताची नस कापली, ज्यामुळे अभिनेत्री रुग्णालयात देखील दाखल करण्यात आलं. लग्नाच्या दिवशी जान्हवीने गोंधळ घातला होता. ज्यामुळे लग्न सोहळ्याचा आनंद कमी झाला होता.

ऐश्वर्या राय – अभिषेक बच्चन यांच्या लग्नाबद्दल सांगायचं झालं तर, दोघांच्या लग्नात फार कमी लोकांना निमंत्रित करण्यात आलं होतं. बॉलिवूडचे प्रसिद्ध आणि दिग्गज कलाकार देखील लग्नात उपस्थित नव्हते. फार कमी पाहुण्यांच्या उपस्थित ऐश्वर्या – अभिषेक यांचं लग्न झालं.

ऐश्वर्या – अभिषेक यांचं लग्न 2007 मध्ये झालं. दोघांच्या लग्नाचे फोटो आजही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. शिवाय अनेक मुलाखतींमध्ये देखील ऐश्वर्या – अभिषेक यांनी त्यांच्या लग्नाबद्दल सांगितलं आहे. पण गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या – अभिषेक घटस्फोटामुळे चर्चेत आहेत. ऐश्वर्या – अभिषेक कायम त्यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतात.

... तर नार्वेकरांना राजीनामा द्यावा लागेल! राऊतांनी स्पष्टच सांगितलं
... तर नार्वेकरांना राजीनामा द्यावा लागेल! राऊतांनी स्पष्टच सांगितलं.
देशाला गुलामीतून मुक्त करण्यासाठी टिपूने बलिदान दिलं! ओवैसींचं विधान
देशाला गुलामीतून मुक्त करण्यासाठी टिपूने बलिदान दिलं! ओवैसींचं विधान.
माझ्या नादी लागू नका; श्रीकांत शिंदेंचा गणेश नाईकांना इशारा
माझ्या नादी लागू नका; श्रीकांत शिंदेंचा गणेश नाईकांना इशारा.
पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा, कार्यकर्ता जखमी
पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा, कार्यकर्ता जखमी.
काँग्रेसची अधोगती मतांच्या राजकारणामुळे; श्रीकांत शिंदेंची टीका
काँग्रेसची अधोगती मतांच्या राजकारणामुळे; श्रीकांत शिंदेंची टीका.
तेजस ठाकरेंवर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू!
तेजस ठाकरेंवर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू!.
सपकाळांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; भाजप आक्रमक
सपकाळांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; भाजप आक्रमक.
सपकाळांना महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही! अतुल सावेंची टीका
सपकाळांना महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही! अतुल सावेंची टीका.
भाजपकडून हिंदू-मुस्लिम रंग देण्याचं काम! हर्षवर्धन सपकाळांकडून टीका
भाजपकडून हिंदू-मुस्लिम रंग देण्याचं काम! हर्षवर्धन सपकाळांकडून टीका.
हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात पुण्यात भाजप- काँग्रेसचे आंदोलक आक्रमक
हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात पुण्यात भाजप- काँग्रेसचे आंदोलक आक्रमक.