AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Naatu Naatu : ऑस्कर जिंकल्यानंतर सर्वत्र ‘नाटू नाटू’ गाण्याचा बोलबाला; जगभरात रचला मोठा विक्रम

ऑस्करवर नाव कोरल्यानंतर 'आरआरआर' सिनेमातील 'नाटू नाटू' गाण्याची जगभरात जादू; रचला मोठा विक्रम... सिनेमाला यश मिळाल्यानंतर एसएस राजामौली यांनी घेतला मोठा निर्णय

Naatu Naatu : ऑस्कर जिंकल्यानंतर सर्वत्र 'नाटू नाटू' गाण्याचा बोलबाला; जगभरात रचला मोठा विक्रम
Natu NatuImage Credit source: Youtube
| Updated on: Mar 15, 2023 | 5:21 PM
Share

मुंबई : यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात भराताचा बोलबाला पाहायला मिळाला. ९५ व्या अकादमी पुरस्कार सोहळ्यात भारताने यंदा एक नाही तर, दोन पुरस्कारांवर नाव कोरलं आहे. ज्यामुळे कलाकार आणि भारतात आनंद आणि उत्साहाचं वातावरण आहे. एसएस राजामौली यांच्या ‘आरआरआर’ सिनेमातील ‘नाटू नाटू’ गाण्याने संपूर्ण जगात धुमाकूळ घातला आहे. ओरिजिनल साँग (सर्वोत्कृष्ट मूळ गाणं) विभागात ऑस्कर पुरस्कार पटकावणारा हा पहिला भारतीय सिनेमा ठरला आहे. ऑस्कर जिंकल्यानंतर गाण्याची लोकप्रियता आणखी वाढली आहे. सध्या सर्वत्र ‘नाटू नाटू’ गाण्याची चर्चा आहे. ऑस्कर जिंकल्यानंतर गूगलवर ‘नाटू नाटू’ गाण्याचं सर्चिंग १,१०५ टक्क्यांनी वाढली आहे.

जापानी ऑनलाइन कॅसीनो गाइड 6Takarakuji यांच्यानुसार, तेलुगू सिनेमा RRR च्या ‘नाटू नाटू’ने ऑस्कर पुरस्कार जिंकल्यानंतर काही तासांतच या गाण्याच्या सर्च करण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. सध्या जगभरात नाटू नाटू गाण्याचा बोलबाला पाहायला मिळत आहे. ऑस्कर जिंकल्यानंतर सिनेमा नवीन विक्रम रचताना दिसत आहे.

6Takarakuji च्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी नाटू नाटू गाणं प्रदर्शित झाल्यानंतर टिक – टॉकवर गाण्याला २.६ मिलियन व्यूज मिळाले आहेत. सोशल मीडियावर सर्वत्र नाटू नाटू गाण्याचा बोलबाला आहे. एवढंच नाही तर, अनेकांनी नाटू नाटू गाण्यावर व्हिडीओ तयार करून सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Jr NTR (@jrntr)

नाटू नाटू प्रदर्शित झाल्यापासून गाण्याने अनेकांना आपल्या तालावर थिरकायला लावलं. एवढंच नाही तर, ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात देखील गायक राहुल सिप्लिगुंज आणि काल भैरव यांनी नाटू नाटू गाण्यावर ताल धरला. ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात यंदाच्या वर्षी भारताचा बोलबाला पाहयला मिळाला.

RRR सिनेमातील नाटू नाटू गाण्याने जगभरात प्रत्येकाला वेड लावलं आहे. जेव्हा ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात नाटू नाटू मंचावर सादर करण्यात आलं तेव्हा त्याला स्टँडिंग ओव्हेशन मिळालं. पुरस्कार सोहळ्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

सांगायचं झालं तर, दिग्दर्शक एसएस राजामौली दिग्दर्शित ‘आरआरआर’ सिनेमा २०२२ मध्ये प्रदर्शित झाला. बॉक्स ऑफिसवर देखील सिनेमाने मोठी कमाई केली. फक्त भारतातच नाही तर, जगभरात सिनेमाने नवीन विक्रम रचला. रिपोर्टनुसार, ‘आरआरआर’ सिनेमाला यश मिळाल्यानंतर एसएस राजामौली यांनी ‘आरआरआर’ सिनेमाच्या सिक्वलवर काम करण्यास सुरुवात केली आहे.

Follow Us
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.