AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जेव्हा तो त्याच्या लग्नाबद्दल..; नील भट्टकडून अंकिता-विकीची पोलखोल

अंकिता आणि विकी हे सोशल मीडियावर एका व्हिडीओमुळे चर्चेत आले होते. विकीने अंकितावर हात उचलण्याचा प्रयत्न केला, असा आरोप नेटकऱ्यांनी तो व्हिडीओ पाहिल्यानंतर केला होता. आता घरातून बाहेर पडल्यानंतर नील भट्टने या दोघांच्या नात्याची पोलखोल केली आहे.

जेव्हा तो त्याच्या लग्नाबद्दल..; नील भट्टकडून अंकिता-विकीची पोलखोल
Neil Bhatt on Ankita and VickyImage Credit source: Instagram
| Updated on: Jan 02, 2024 | 3:35 PM
Share

मुंबई : 2 जानेवारी 2024 | ‘बिग बॉस 17’च्या घरात अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैनला सतत भांडताना पाहिलं गेलंय. अभिनेता नील भट्ट या शोमधून नुकताच बाहेर पडला. घराबाहेर आल्यानंतर दिलेल्या एका मुलाखतीत त्याने अंकिता-विकीच्या नात्याची पोलखोल केली आहे. विकीला नात्यांची कदर नाही, म्हणूनच त्या दोघांमध्ये सतत भांडणं होतात, असं नील म्हणाला. ‘बिग बॉस 17’च्या पहिल्या एपिसोडपासूनच अंकिता आणि विकी या दोघांमध्ये सतत खटके उडताना दिसत आहे. सोशल मीडियावर ही जोडी जरी एकमेकांबद्दल प्रेम व्यक्त करत असली तरी त्यांच्या नात्याची एक वेगळीच बाजू प्रेक्षकांना बिग बॉसच्या घरात पहायला मिळत आहे.

या मुलाखतीत नील म्हणाला, “विकी त्याच्या सोयीनुसार वागतो. त्याला कोणत्याचं गोष्टीची किंमत नाही. ना नात्यांची, ना कोणाच्या भावनांची. बिग बॉसच्या घरात विकीचं वागणं पाहून हे प्रत्येकाला समजतंय की तो अंकितापेक्षा वरचढ ठरण्याचा प्रयत्न करतोय. मी माझी पत्नी ऐश्वर्यासोबत कधीच असं वागलो नाही. आमच्यात नेहमीच समजुतदारपणा होता.” बिग बॉसच्या घरात विकी जेव्हा कधी लग्नाचा उल्लेख करायचा, तेव्हा स्वत:ला पीडित असं म्हणायचा, असंही नीलने सांगितलं.

“एखाद्याच्या लग्नावरून टिप्पणी करणे खूप चुकीचं आहे. विकीमध्ये खूप अहंकार आहे. अंकिताचा आवाज खूप मजबूत आहे. तर विकीचं व्यक्तीमत्त्व दबंगगिरी करणारं आहे. तो सतत दुसऱ्यांना हे दाखवू इच्छितो की मी जे काही बोलतोय ते सर्व योग्यच बोलतोय आणि तुम्ही सर्वजण माझी साथ द्या”, असंही नील पुढे म्हणाला. अंकिता लोखंडेनं डिसेंबर 2021 मध्ये बिझनेसमन विकी जैनशी लग्न केलं. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात दोघांनी बिग बॉसच्या घरात एण्ट्री केली.

‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अंकिता आणि तिचा पती विकी जैन या जोडीने बिग बॉसच्या घरात विशेष लक्ष वेधलं आहे. या जोडीचं सोशल मीडियावर एक रुप आणि बिग बॉसच्या घरात दुसरं रुप पाहून सर्वजण अवाक् झाले आहेत. दररोज अंकिता-विकीमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणामुळे भांडणं होताना दिसतात. नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये अंकिताने विकीला थेट घटस्फोटाची धमकी दिली होती.

Follow Us
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताध
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताधाऱ्यांवर बोरची टीका
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत वाघमारेंचा ठाकरे गटाला इशारा
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत ज्योती वाघमारेंचा ठाकरे गटाला थेट इशारा, संजय राऊतांवरही निशाणा
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं विधान; राजकारणात मोठा भूकंप येणार?
प्रणित मोरे प्रकरण थेट संसदेत? शिंदेंच्या महिला खासदाराचा प्रचंड संताप
आता प्रणित मोरे प्रकरण थेट संसदेत? शिंदेंच्या महिला खासदाराचा प्रचंड संताप; लवकरच...
कर्जमाफीवरून सरकारने अखेर बैठक बोलवली, नेमकं काय घडतंय?
Dattatray Bharne | कर्जमाफीवरून सरकारने अखेर बैठक बोलवली, रोहित पवारांच्या उपोषणामुळे हालचाली वाढल्या, नेमकं काय घडतंय?
24 तासांतच चांदीचा मुकुट पुन्हा चोरला; तुळजाभवानी मंदिरातील धक्कादायक
24 तासांतच चांदीचा मुकुट पुन्हा चोरला; तुळजाभवानी मंदिरातील धक्कादायक CCTV फुटेज समोर!
अर्वाच्च भाषेतील ऑडीओ क्लिप व्हायरल; बड्या अधिकाऱ्यावर मोठी कारवाई,
अर्वाच्च भाषेतील ऑडीओ क्लिप व्हायरल; बड्या अधिकाऱ्यावर मोठी कारवाई,  ठाकरेंच्या नगरसेवकाला... नेमकं प्रकरण काय?
भाजप आमदाराच्या पत्नीच्या गाडीचा भीषण अपघात; डोक्याला अन्....
मोठी बातमी! भाजप आमदाराच्या पत्नीच्या गाडीचा भीषण अपघात; डोक्याला आणि पायाला दुखापत
40 वर्षांच्या अनुभवासह धीरज सेठ यांच्याकडे देशाच्या सुरक्षेची धुरा
Dhiraj Seth | भारतीय लष्कराला नवे सेनाप्रमुख! 40 वर्षांच्या अनुभवासह धीरज सेठ यांच्याकडे देशाच्या सुरक्षेची धुरा
अजितदादांप्रमाणेच एकनाथ शिंदेंचाही घातपात होणार? बड्या नेत्याच्या
अजितदादांप्रमाणेच एकनाथ शिंदेंचाही घातपात होणार? बड्या नेत्याच्या दाव्याने एकच खळबळ; नेमकं काय सांगितलं?