AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्राजक्ता माळीच्या ‘फुलवंती’च्या टीममधल्या महत्त्वपूर्ण सदस्याचं निधन; अवघ्या 31 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या 'फुलवंती' या चित्रपटाच्या टीममधील महत्त्वपूर्ण सदस्याचं निधन झालं आहे. सिनेमॅटोग्राफर तन्मय वनमाळीने वयाच्या अवघ्या 31 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. त्याच्या निधनाचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

प्राजक्ता माळीच्या 'फुलवंती'च्या टीममधल्या महत्त्वपूर्ण सदस्याचं निधन; अवघ्या 31 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
प्राजक्ता माळी, तन्मय वनमाळीImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 11, 2026 | 1:51 PM
Share

‘फुलवंती’, ‘सरसेनापती हंबीरराव मोहिते’, ‘मुळशी पॅटर्न’ यांसारख्या मराठी चित्रपटांसाठी सिनेमॅटोग्राफर म्हणून काम केलेल्या तन्मय वनमाळीचं निधन झालं आहे. वयाच्या अवघ्या 31 व्या वर्षी त्याने जगाचा अखेरचा निरोप घेतला आहे. त्याच्या निधनामागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही. तन्मयने केवळ मराठीच नाही तर हिंदी चित्रपटांसाठीही सिनेमॅटोग्राफ म्हणून काम केलंय. त्यामुळे त्याच्या निधनाने दोन्ही चित्रपटसृष्टीतून हळहळ व्यक्त होत आहे. तन्मय हा प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर महेश लिमये यांच्या मार्गदर्शनासाठी काम करत होता. त्याच्या कामाचं अनेक दिग्दर्शक आणि निर्मात्यांकडून कौतुक केलं जात होतं.

प्राजक्ता माळी आणि गश्मीर महाजनी यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘फुलवंती’ या चित्रपटासाठी त्याने महेश लिमये यांच्यासोबत काम केलं होतं. याशिवाय प्रवीण तरडेंच्या ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटातही त्याने उल्लेखनीय कामगिरी केली होती. हिंदीत ‘दबंग 2’, ‘गंगुबाई काठियावाडी’, ‘हिरामंडी’, ‘बाजीराव मस्तानी’ यांसारख्या गाजलेल्या प्रोजेक्ट्समध्ये त्याने काम केलं आहे. कमी वयात त्याची कामावर चांगली पकड होती. सिनेमॅटोग्राफर म्हणून त्याने चित्रपटांमधील अनेक दृश्ये अत्यंत सुंदररित्या टिपली आहेत. नितेश तिवारी यांच्या आगामी ‘रामायण’ या बिग बजेट चित्रपटासाठीही तन्मयनं काम केलं होतं.

बॉलिवूडचे दिग्गज दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या विविध प्रोजेक्ट्ससाठी तन्मयने काम केलं आहे. छोट्यातलं छोटं दृश्य कॅमेरात अत्यंत सर्जनशीलतेनं कसं टिपायचं, ही कला त्याला आत्मसात होती. यात कलेच्या आणि कल्पकतेच्या जोरावर तो मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण करू पाहत होता. त्याच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

तन्मयच्या निधनावर वसईचे नेते हितेंद्र ठाकूर, आमदार क्षितिज ठाकूर यांनी शोक व्यक्त केला आहे. तर सिनेक्षेत्रातील हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व गमावल्याची भावना महेश लिमये यांनी व्यक्त केली. ‘खूप वाईट.. तन्मय खूप आठवण येत राहील बाळा’, अशा शब्दांत अभिनेते जयवंत वाडकर यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. सोशल मीडियावर अनेकांनी पोस्ट लिहित तन्मयला श्रद्धांजली वाहिली आहे.

Follow Us
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ....
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ.....
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक.
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली.
रिलायन्स इंडस्ट्रीची अमेरिकेत गुंतवणूक, संजय राऊत यांचा हल्लाबोल
रिलायन्स इंडस्ट्रीची अमेरिकेत गुंतवणूक, संजय राऊत यांचा हल्लाबोल.
व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा; हॉटेल व्यवसाय आणि उद्योग अडचणीत
व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा; हॉटेल व्यवसाय आणि उद्योग अडचणीत.
मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला...
मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला....
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू.
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.