AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dhurandhar : धुरंधरमुळे पाकिस्तानात भिकाऱ्यांचं जगणं झालं कठीण, नेमकी काय आहे गडबड?

Dhurandhar : पाकिस्तानातील भिकाऱ्यांचं थेट कनेक्शन 'धुरंधर' सिनेमाची..., त्यांचं जगणं झालंय कठीण..., नेमकी काय आहे गडबड? व्हायरल व्हिडीओ पाहून म्हणाल..., सध्या सर्वत्र फक्त व्हायरल व्हिडीओची चर्चा...

Dhurandhar : धुरंधरमुळे पाकिस्तानात भिकाऱ्यांचं जगणं झालं कठीण, नेमकी काय आहे गडबड?
Dhurandhar
| Updated on: Mar 28, 2026 | 10:04 AM
Share

Dhurandhar : पाकिस्तानात भिकाऱ्यांचं आयुष्य फार कठीण झालं आहे. सध्या पाकिस्तानात भिकाऱ्यांविरोधात पोलिसांचं सर्च ऑपरेशन सुरु आहे. सुरु असलेल्या सर्च ऑपरेशनचा विषय सध्या सर्वत्र चर्चेत आला आहे. एवढंच नाही तर, अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील समोर आले आहे. सर्च ऑपरेशनमुळे मोठ्या संख्येने अटकसत्र तर सुरू आहेच, पण या कारवाईचा संबंध ‘धुरंधर’ या सिनेमाशी जोडला जात आहे. सोशल मीडियावर असा दावा केला जात आहे की, सिनेमातील अभिनेता रणवीर सिंगची भूमिका ‘हमजा अली मदारी’ समोर आल्यानंतर पाकिस्तानात भिकाऱ्यांविरुद्ध एक विशेष शोध मोहीम सुरू करण्यात आली.

व्हायरल होत असलेल्या दाव्यात असं देखील सांगण्यात आलं आहे की, पोलीस भिकाऱ्यांच्या वेशात लपलेल्या भारतीय गुप्तहेरांच्या शोधात आहेत. पण जेव्हा पडताळणी करण्यात आली तेव्हा यामध्ये काहीही तथ्य नसल्याचं समोर आलं आहे आणि कोणतंच अधिकृत कनेक्शन देखील समोर आलेलं नाही.

सोशल मीडियावर भिकाऱ्यांना पकडून नेत असल्याचे अनेक व्गिडीओ व्हायरल होत आहेत. पण भारतात व्हिडीओ व्हायरल होत असल्याचं कारण ‘धुरंधर’ सिनेमा असल्याचं सांगण्यात येत आहे. नुकताच सोशल मीडिायावर एक व्हिडीओ व्हायरल झाला, ज्यामध्ये दावा करण्यात आला की, सिनेमाच्या यशानंतर पाकिस्तानातील पोलीस कराची येथील गल्ल्यांमध्ये ‘हमजा अली’ याच्या शोधात आहेत.

सर्च ऑपरेशन 2025 पासून सुरु आहे…

रिपोर्टनुसार, पाकिस्ताना भिकाऱ्यांविरोधात सर्च ऑपरेशन 2025 पासून सुरु आहे. पोलीस आणि एजेन्स रस्त्यांपासून विमानतळांपर्यंत कारवाई करत आहेत, जवळपास 66 हजार लोकांना ताब्यात घेण्यात आलं आहे, हजारो पासपोर्ट निलंबित करण्यात आलेत आणि अनेकांना आखाती देशांमधून हद्दपार करण्यात आलं आहे.

तपासात असं देखील उघड झालंय की, या भिकाऱ्यांच्या मागे संघटित नेटवर्क कार्यरत होतं, ज्यात पैशासाठी मुले आणि महिलांचे शोषण करणाऱ्या टोळ्यांचा समावेश होता. काही प्रकरणांमध्ये, यांचा संबंध चोरी आणि अमली पदार्थांच्या तस्करीशी देखील जोडला गेलेला.

सरकारच्या म्हणण्यानुसार, या सर्च ऑपरेशनचा उद्देश शहरं भिकारीमुक्त करणं, मानवी तस्करीला आळा घालणं आणि देशाची आंतरराष्ट्रीय प्रतिमा सुधारणं हा आहे. या कारवाईचे लक्ष्य आता टोळ्यांवर आहे. गुप्तचर यंत्रणा आणि सेफ सिटी कॅमेऱ्यांच्या साहाय्याने या नेटवर्कचा मागोवा घेतला जात आहे. तज्ज्ञांच्या मते, गरिबी आणि बेरोजगारी हे या समस्येचे मूळ आहे, त्यामुळे केवळ अटकच नव्हे, तर पुनर्वसनही आवश्यक आहे.. असं देखील सांगण्यात येत आहे.

Follow Us
'कर्माचे फळ...,' चाकणकरांच्या राजीनाम्यावर दमानिया यांची प्रतिक्रीया
'कर्माचे फळ...,' चाकणकरांच्या राजीनाम्यावर दमानिया यांची प्रतिक्रीया.
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही.
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?.
ठाकरेंच्या काळात पाणी दिलं हा आरोप दिशाभूल करणारा
ठाकरेंच्या काळात पाणी दिलं हा आरोप दिशाभूल करणारा.
पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत फडणवीसांचं मोठं विधान
पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत फडणवीसांचं मोठं विधान.
लॉकडाऊन लागणार नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार - CM फडणवीस
लॉकडाऊन लागणार नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार - CM फडणवीस.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सभागृहात गोंधळ; ठाकरेंच्या नगरसेवकांना...
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सभागृहात गोंधळ; ठाकरेंच्या नगरसेवकांना....
बुलढाणा चांदी बाजारात मंदी; LPGच्या तुटवड्यामुळे दागिन्यांचे काम ठप्प
बुलढाणा चांदी बाजारात मंदी; LPGच्या तुटवड्यामुळे दागिन्यांचे काम ठप्प.
राजकारण संपल्यानंतर काय करणार? पंकजा मुंडे यांचं मोठं विधान काय?
राजकारण संपल्यानंतर काय करणार? पंकजा मुंडे यांचं मोठं विधान काय?.
सुप्रिया सुळेंच्या त्या वक्तव्यावर काँग्रेसची टीका; फडणवीस यांच्या....
सुप्रिया सुळेंच्या त्या वक्तव्यावर काँग्रेसची टीका; फडणवीस यांच्या.....