मुंबईच्या रस्त्यांवर भीक मागितली, चोरी केली; पोलिसांनी अटक करताच…,कमनशिबी हिरोईनचं हृदयद्रावक सत्य
मायानगरी मुंबईत स्वतःची ओळख भक्कम करण्यासाठी आलेल्या प्रसिद्ध अभिनेत्रीवर भीक मागण्याची आणि चोरी करण्याची वेळ आली. कुटुंबियांच्या विरोधात जात अभिनेत्री मुंबईत तर आली, पण तिला असंख्य अडचणींचा सामना करावा लगला... कोण आहे 'ती' अभिनेत्री?

मायानगरी मुंबईत अनेक तरुण – तरुणी स्वप्न घेऊन येतात. पण या मायानगरीत राहणं फार कठीण आहे. येथे स्वतःची ओळख भक्कम करण्यासाठी मेहनतीला नशिबाची देखील जोड लागते. पण काहींच्या वाट्याला फक्त दुःख आणि खडतर आयुष्य येत. असंच काही एका अभिनेत्रीसोबत देखील झालं आहे. तिने मोठ्या अभिनेत्यांसोबत काम केलं नाही, पण छोट्या – मोठ्या भूमिका साकारत अभिनेत्री स्वतःची ओळख भक्कम करण्याचा प्रयत्न करत होती. पण कालांतराने अभिनेत्रीला आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागला आणि याच कारणामुळे ती अनेकांना मुंबईच्या रस्त्यांवर भीत मांडताना देखील दिसली.
सध्या ज्या अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगील आहे, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री मिताली शर्मा आहे. मिताली हिने भोजपुरी सिनेमांवर राज्य केलं. तिने कोणत्या मोठ्या सेलिब्रिटीसोबत स्क्रिन शेअर केली नाही, पण कमी बजेटच्या सिनेमांमध्ये काम करत की, पुढे येण्याचा प्रयत्न करत होती. तिच्याकडे अनेक प्रोजेक्ट आणि मॉडेलिंग असायमेंट देखील होते… करियरच्या सुरुवातील मिताली दिग्दर्शक, निर्मात्यांची पहिली पसंती ठरली. पण हळू – हळू काम मिळणं कमी होऊ लागलं…
भीक मागताना दिसली अभिनेत्री
रिपोर्टनुसार, मिताली दिल्ली येथे राहणारी होती. पण अभिनेत्री व्हायचं होतं म्हणून ती दिल्लीतून मुंबईत आली. कुटुंबियांचा विरोध असताना देखील मिताली हिने मुंबईत येण्याचा विचार केला आणि सर्व नाती तोडली. पण हळू – हळू मिताली हिला काम मिळणं देखील बंद होऊ लागलं आणि तिच्या आयुष्याचा वाईट काळ सुरु झाला. आर्थिक तंगीमुळे मिताली कायम मानसिक तणावाखाली राहू लागली. असा देखील दावा केला जातो की, मिताली मुंबई येथील लोखंडवाला परिसरात भीक मागू लागली.
चोरी करताना पोलिसांकडून अटक
अनेक रिपोर्ट्समध्ये असा देखील दावा करण्यात आला आहे की, मिताली हिला रस्त्यांवर चोरी करताना पकडण्यात आलं आहे. एकदा तर मुंबई पोलिसांनी अभिनेत्रीला अटक देखील केली. तेव्हा अभिनेत्री पोलिसांनी शिवीगाळ करु लागली. पण पोलीस जेव्हा अभिनेत्रीला पोलीस स्ठानकात घेऊन गेले, तेव्हा ती भूकेने त्रस्त झालेली. मितालीने पोलिसांकडून सर्वात आधी जेवयला मागितलं. तिची अशा अवस्था पाहिल्यानंतर पोलिसांनी देखील चिंता व्यक्त केली. ज्यानंतर मिताली हिला मुंबईच्या एका मानसिक स्वास्थ केंद्रात भर्ती करण्यात आलं.