AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फळ विक्रेत्याच्या मुलाने अमिताभ बच्चनच्या घराजवळ सुरु केला 300 कोटींच्या आइस्क्रीमचा धंदा

मुंबई, स्वप्नांचं शहर, येथे एका व्यक्तीने अमिताभ बच्चन, हृतिक रोशन यांसारख्या अभिनेत्यांच्या घराजवळ आइस्क्रीमचा धंदा सुरु केला होता. आज तो एक ब्रँड बनला आहे, ज्याचा व्यवसाय आज 300 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

फळ विक्रेत्याच्या मुलाने अमिताभ बच्चनच्या घराजवळ सुरु केला 300 कोटींच्या आइस्क्रीमचा धंदा
Amitabh BachchhanImage Credit source: Tv9 Bharatvarsh
| Updated on: Apr 25, 2025 | 7:40 PM
Share

मुंबई ही स्वप्नांची नगरी आहे असं अनेकदा म्हटले जाते. या शहरात अनेकांची स्वप्नं पूर्णही होतात. काही जण मुंबईत येऊन स्टार बनतात, तर काही स्टार बनण्याच्या शर्यतीत मागे राहतात. पण मुंबईत असेही काही तारे आहेत, जे चित्रपट स्टार नसले तरी त्यांचं यश कोणत्याही चित्रपट स्टारपेक्षा कमी नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच एका ताऱ्याची कहाणी सांगणार आहोत, ज्याने अमिताभ बच्चन आणि हृतिक रोशन यांच्या घराजवळ आइस्क्रीम दुकान टाकले होते. आज तो या दुकानातून 300 कोटींचा धंदा करतो.

ही आहे रघुनंदन श्रीनिवास कामत यांची कहाणी. त्यांनी 1984 मध्ये मुंबईच्या जुहू परिसरात नॅचरल्स आइस्क्रीम पार्लर सुरू केलं होतं. आज हा व्यवसाय 300 कोटींहून अधिक झाला आहे. या आइस्क्रीम पार्लरमधील आइस्क्रीम फळांच्या चवींनी बनलेली असतात. त्यामुळे ग्राहक खूप आकर्षित होतात. चला, रघुनंदन यांनी बिग बी यांच्या घराशेजारी दुकान कसं उघडलं यामागची कहाणी जाणून घेऊया…

वाचा: काश्मीरला यायचं असेल तर कलमा शिक, नाहीतर…; पाकिस्तानी मित्राने अभिनेत्रीला धमकी दिली

खरंतर, जिथे हे आउटलेट आहे, तिथून जवळच चित्रपट स्टार्सची घरं आहेत. रघुनंदन यांनी स्वतः एका मुलाखतीत सांगितलं होतं की, त्यांनी या परिसरात दुकान उघडण्याचा प्लॅन बनवला कारण तिथे अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी यांसारख्या स्टार्सची घरं जवळ आहेत. लोक तिथे येतील आणि त्यांचं दुकान चालेल, असा त्यांचा विचार होता. रघुनंदन यांनी ठरवल्याप्रमाणेच झालं. दिवसेंदिवस व्यवसाय वाढत गेला आणि आज तो 300 कोटींहून अधिक झाला आहे.

वडील फळं विकायचे, मुलाने फळांपासून बनवली आइस्क्रीम

रघुनंदन श्रीनिवास कामत यांचे वडील फळं विकायचे. पण त्यांच्या मुलाने फळांपासून आइस्क्रीम बनवली. रघुनंदन यांनी फळांच्या चवींची आइस्क्रीम बनवून 300 कोटींहून अधिकचा व्यवसाय उभा केला आहे. ते एका सामान्य कुटुंबातून आले होते. वयाच्या 14व्या वर्षी त्यांनी शिक्षण सोडलं आणि आपल्या भावाच्या हॉटेलात काम केलं. पण तिथेच त्यांना नॅचरल आइस्क्रीमसारखं व्यावसायिक उपक्रम सुरू करण्याची कल्पना आली.

12 फ्लेवर्स, 3.5 लाखांपासून 300 कोटींहून अधिकचा व्यवसाय

रघुनंदन यांनी भावापासून वेगळं होऊन 3.5 लाखांच्या खर्चात 6 कामगारांसह 200 चौरस फुटांच्या दुकानात व्यवसाय सुरू केला. त्यांचं ध्येय स्पष्ट होतं दूध, साखर आणि फळांपासून आइस्क्रीम बनवायची. सुरुवातीला 12 फ्लेवर्सने सुरू झालेला हा व्यवसाय हळूहळू 20 पेक्षा जास्त फ्लेवर्सपर्यंत पोहोचला. आता देशातील 15 शहरांमध्ये याचे 165 पेक्षा जास्त आउटलेट्स आहेत. त्यांचा एकूण व्यवसाय 300 कोटींहून अधिक झाला आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.