AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फसवणुकीच्या प्रकरणी अखेर रजनीकांत यांच्या पत्नीने सोडलं मौन

एका तमिळ चित्रपटाशी संबंधित प्रकरणात साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांच्या पत्नी लता रजनीकांत यांचं नाव समोर आलं होतं. त्याप्रकरणी अखेर लता यांनी मौन सोडलं आहे. हे एका लोकप्रिय व्यक्तीचा छळ, शोषण आणि अपमानाचं प्रकरण आहे, असं त्या म्हणाल्या आहेत.

फसवणुकीच्या प्रकरणी अखेर रजनीकांत यांच्या पत्नीने सोडलं मौन
Rajinikanth's wife LathaImage Credit source: Instagram
| Updated on: Dec 27, 2023 | 3:32 PM
Share

चेन्नई : 27 डिसेंबर 2023 | सुपरस्टार रजनीकांत यांची पत्नी लता यांनी फसवणुकीच्या प्रकरणात अखेर मौन सोडलं आहे. ‘कोचडायन’ या तमिळ चित्रपटाशी संबंधित झालेल्या एका फसवणुकीच्या प्रकरणात लता यांचं नाव चर्चेत आलं होतं. याप्रकरणी त्यांना बेंगळुरूतील कोर्टाने दिलासासुद्धा दिला होता. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी फसवणुकीच्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे. सेलिब्रिटी असल्याची किंमत चुकवावी लागतेय, असं त्या म्हणाल्या आहेत.

रजनीकांत यांच्या पत्नी काय म्हणाल्या?

“माझ्यासाठी हे एका लोकप्रिय व्यक्तीचा छळ, शोषण आणि अपमानाचं प्रकरण आहे. सेलिब्रिटी असल्याची ही किंमत मोजावी लागतेय. त्यामुळे प्रकरण जरी मोठं नसलं तरी त्याची बातमी खूप मोठी होते. कोणतीही फसणवूक झाली नाही. माझा पैशांशी काहीही संबंध नाही”, असं म्हणत त्यांनी आरोप फेटाळले आहेत.

चेन्नईमधल्या एका ॲड ब्युरो ॲडवर्टायझिंग प्रायव्हेट लिमिटेडने 2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटांच्या अधिकारांवरून लता यांच्याविरोधात फसवणुकीचा खटला दाखल केला होता. चित्रपट निर्मात्यांपैकी एक असलेल्या मीडिया वनला 10 कोटी रुपये उधारीने दिले होते. याप्रकरणी रजनीकांत यांच्या पत्नी लता यांनी गँरटरच्या रुपात हस्ताक्षर केलं होतं, असा आरोप या याचिकेत करण्यात आला होता.

याविषयी लता पुढे म्हणाल्या, “ज्या पैशांबद्दल बोललं जातंय, त्यात माझं काहीच घेणं-देणं नाही. हे प्रकरण मीडिया वन आणि इतर संबंधित लोकांमधील आहे. याविषयी त्यांनी आधीच करार केला आहे आणि त्यांच्यामधील हा संपूर्ण प्रकरण आहे. गँरटरच्या रुपात मी हे सुनिश्चित केलं होतं की त्यांनी पैशांची परतफेड केली असेल. त्यानंतर मला फसवण्यात आलं आहे.” काही रिपोर्ट्सनुसार मंगळवारी एका अतिरिक्त मुख्य मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टाने त्यांना एक लाख खासगी बाँड आणि 25 हजार रुपये रोख जमा केल्यानंतर जामीन मंजूर केला होता.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.