AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुक्या प्राण्यांवर दया करा; ‘बकरी ईद’ साजरी करण्याबाबत ‘रामायण’ फेम सुनील लहरी यांचं आवाहन

बकरी ईदनिमित्त 'रामायण' फेम अभिनेते सुनील लहरी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टद्वारे त्यांनी इको फ्रेंडली बकरी ईद साजरी करण्याचं आवाहन केलं आहे. मुक्या प्राण्यांवर दया करा, असं त्यांनी म्हटलंय.

मुक्या प्राण्यांवर दया करा; 'बकरी ईद' साजरी करण्याबाबत 'रामायण' फेम सुनील लहरी यांचं आवाहन
Sunil LahriImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jun 17, 2024 | 3:17 PM

रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या मालिकेत लक्ष्मणाची भूमिका साकारलेले अभिनेते सुनील लहरी हे विविध मुद्द्यांवर मोकळेपणे व्यक्त होतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी लोकसभा निवडणूक निकालावर प्रतिक्रिया दिली होती. जिथे राम मंदिर बनवण्यात आलं, त्याच अयोध्येत भाजपचा पराभव झाल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. आता बकरी ईदनिमित्त त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टद्वारे त्यांनी इको फ्रेंडली बकरी ईद साजरी करण्याचं आवाहन केलं आहे.

सुनील लहरी यांच्या पोस्टमध्ये काय लिहिलंय?

सुनील लहरी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात दोन व्यक्ती केक कापताना दिसत आहेत. यावरील मजकुरात असं म्हटलंय, ‘इको फ्रेंडली बकरी ईद साजरी करा आणि मुक्या प्राण्यांवर दया करा. हे आवाहनसुद्धा मीडियाने अशा पद्धतीने करावं जसं होळीत पाणी वाचवण्यासाठी, दिवाळीत प्रदूषण रोखण्यासाठी आणि गणेशोत्सवात सांकेतिक विसर्जनासाठी केलं जातं. देशात सर्वधर्मसमभाव तर आहेच.’ कृपया यंदा हिंसारहित बकरी ईद साजरी करा आणि पर्यावरणाला वाचवा, असंही त्या फोटोवर लिहिलेलं पहायला मिळतं.

हे सुद्धा वाचा

देशभरात आज (17 जून) बकरी ईद साजरी केली जात आहे. मुस्लीम समाजात रमजान आणि बकरी ईद हे मोठे सण म्हणून साजरे केले जातात. बकरी ईदच्या दिवशी बकरा कुर्बान करून त्याचं मटण नातेवाईकांमध्ये आणि काही गरीब लोकांमध्ये वाटण्यात येतं. मुस्लिमांचे पैगंबर आणि हजरत मोहम्मद यांचे पूर्वज हजरत इब्राहिम यांच्या बलिदानाची आठवण म्हणून ही ईद साजरी केली जाते.

सुनील लहरी यांनी रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ मालिकेत लक्ष्मणाची भूमिका साकारली होती. या मालिकेमुळे त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. लॉकडाऊनच्या काळात जेव्हा ही मालिका पुन्हा टीव्हीवर प्रक्षेपित करण्यात आली, तेव्हा त्यातील कलाकार सोशल मीडियावर चर्चेत आले. तेव्हापासून सुनील लहरी सोशल मीडियाद्वारे सतत चाहत्यांच्या संपर्कात असतात. लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी अभिनेते अरुण गोविल यांच्या समर्थनार्थ प्रचारसुद्धा केला होता. अरुण गोविल यांनी मेरठ या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. ‘रामायण’ या मालिकेत ते प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेत होते.

पवारांची राष्ट्रवादी हा एक मोठा पक्ष सोडून कुणाशीही युती करण्यास तयार?
पवारांची राष्ट्रवादी हा एक मोठा पक्ष सोडून कुणाशीही युती करण्यास तयार?.
बावनकुळेंनी घेतली बच्चू कडूंची भेट तर फोनवरून फडणवीसांचं मोठं आश्वासन
बावनकुळेंनी घेतली बच्चू कडूंची भेट तर फोनवरून फडणवीसांचं मोठं आश्वासन.
अपघातात वडिलांचा मृत्यू, ओळख पटवण्यासाठी 8 महिन्याच्या बाळाचे DNA
अपघातात वडिलांचा मृत्यू, ओळख पटवण्यासाठी 8 महिन्याच्या बाळाचे DNA.
अपघाताचं कारण समजणार, DVR अन् ब्लॅकबॉक्सही सापडलं, कशी मिळते माहिती?
अपघाताचं कारण समजणार, DVR अन् ब्लॅकबॉक्सही सापडलं, कशी मिळते माहिती?.
विमान दुर्घटनेनंतर DGCA चा मोठा निर्णय, आता बोईंग विमानाची...
विमान दुर्घटनेनंतर DGCA चा मोठा निर्णय, आता बोईंग विमानाची....
...असं केलं विमान दुर्घटनेनंतर एकमेव जिवंत असलेल्या प्रवाशाचं रेस्क्यू
...असं केलं विमान दुर्घटनेनंतर एकमेव जिवंत असलेल्या प्रवाशाचं रेस्क्यू.
दुपारी झोपेत असताना मोठा आवाज पाहिलं तर...अकोल्याची तरूणी कशी बचावली?
दुपारी झोपेत असताना मोठा आवाज पाहिलं तर...अकोल्याची तरूणी कशी बचावली?.
अपघात टाळता येत नाही. मग यांना काय टाळता येतं?, राऊतांचा खोचक सवाल
अपघात टाळता येत नाही. मग यांना काय टाळता येतं?, राऊतांचा खोचक सवाल.
विमान दुर्घटनेत गोरेगावमधील अपर्णा महाडिक यांचा मृत्यू
विमान दुर्घटनेत गोरेगावमधील अपर्णा महाडिक यांचा मृत्यू.
कोकण किनारपट्टीसाठी रेड अलर्ट; सतर्क राहण्याचं आवाहन
कोकण किनारपट्टीसाठी रेड अलर्ट; सतर्क राहण्याचं आवाहन.