AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुक्या प्राण्यांवर दया करा; ‘बकरी ईद’ साजरी करण्याबाबत ‘रामायण’ फेम सुनील लहरी यांचं आवाहन

बकरी ईदनिमित्त 'रामायण' फेम अभिनेते सुनील लहरी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टद्वारे त्यांनी इको फ्रेंडली बकरी ईद साजरी करण्याचं आवाहन केलं आहे. मुक्या प्राण्यांवर दया करा, असं त्यांनी म्हटलंय.

मुक्या प्राण्यांवर दया करा; 'बकरी ईद' साजरी करण्याबाबत 'रामायण' फेम सुनील लहरी यांचं आवाहन
Sunil LahriImage Credit source: Instagram
| Updated on: Jun 17, 2024 | 3:17 PM
Share

रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या मालिकेत लक्ष्मणाची भूमिका साकारलेले अभिनेते सुनील लहरी हे विविध मुद्द्यांवर मोकळेपणे व्यक्त होतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी लोकसभा निवडणूक निकालावर प्रतिक्रिया दिली होती. जिथे राम मंदिर बनवण्यात आलं, त्याच अयोध्येत भाजपचा पराभव झाल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. आता बकरी ईदनिमित्त त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टद्वारे त्यांनी इको फ्रेंडली बकरी ईद साजरी करण्याचं आवाहन केलं आहे.

सुनील लहरी यांच्या पोस्टमध्ये काय लिहिलंय?

सुनील लहरी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात दोन व्यक्ती केक कापताना दिसत आहेत. यावरील मजकुरात असं म्हटलंय, ‘इको फ्रेंडली बकरी ईद साजरी करा आणि मुक्या प्राण्यांवर दया करा. हे आवाहनसुद्धा मीडियाने अशा पद्धतीने करावं जसं होळीत पाणी वाचवण्यासाठी, दिवाळीत प्रदूषण रोखण्यासाठी आणि गणेशोत्सवात सांकेतिक विसर्जनासाठी केलं जातं. देशात सर्वधर्मसमभाव तर आहेच.’ कृपया यंदा हिंसारहित बकरी ईद साजरी करा आणि पर्यावरणाला वाचवा, असंही त्या फोटोवर लिहिलेलं पहायला मिळतं.

देशभरात आज (17 जून) बकरी ईद साजरी केली जात आहे. मुस्लीम समाजात रमजान आणि बकरी ईद हे मोठे सण म्हणून साजरे केले जातात. बकरी ईदच्या दिवशी बकरा कुर्बान करून त्याचं मटण नातेवाईकांमध्ये आणि काही गरीब लोकांमध्ये वाटण्यात येतं. मुस्लिमांचे पैगंबर आणि हजरत मोहम्मद यांचे पूर्वज हजरत इब्राहिम यांच्या बलिदानाची आठवण म्हणून ही ईद साजरी केली जाते.

सुनील लहरी यांनी रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ मालिकेत लक्ष्मणाची भूमिका साकारली होती. या मालिकेमुळे त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. लॉकडाऊनच्या काळात जेव्हा ही मालिका पुन्हा टीव्हीवर प्रक्षेपित करण्यात आली, तेव्हा त्यातील कलाकार सोशल मीडियावर चर्चेत आले. तेव्हापासून सुनील लहरी सोशल मीडियाद्वारे सतत चाहत्यांच्या संपर्कात असतात. लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी अभिनेते अरुण गोविल यांच्या समर्थनार्थ प्रचारसुद्धा केला होता. अरुण गोविल यांनी मेरठ या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. ‘रामायण’ या मालिकेत ते प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेत होते.

Follow Us
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत...नेमकं काय घडलं?
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
Kishori Pednekar | मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? मॅनहोलमध्ये पडून मृत्यू; BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...नेमकं काय घडतंय?
खाडकन उघडले धरणाचे 4 दरवाजे, तापी नदीपात्रात भयंकर विसर्ग सुरू, काळजी
खाडकन उघडले धरणाचे 4 दरवाजे, तापी नदीपात्रात भयंकर विसर्ग सुरू, काळजी घेण्याचे आवाहन!
राजकारणात मोठा ट्विस्ट! ठाकरे सेना-शिंदे सेना-भाजप एकाच मंचावर
राजकारणात मोठा ट्विस्ट! ठाकरे सेना-शिंदे सेना-भाजप एकाच मंचावर; औरंगाबादमध्ये नवं समीकरण
एकच खळबळ! माणूस मॅनहोलमध्ये कसा काय पडला? CCTV तून धक्कादायक माहिती
एकच खळबळ! माणूस मॅनहोलमध्ये कसा काय पडला? CCTV तून धक्कादायक माहिती समोर
मुंबईत धुवाधार पावसात पुन्हा भयंकर घडलं! एक व्यक्ती थेट 20 ते 25 फुट
मुंबईत धुवाधार पावसात पुन्हा भयंकर घडलं! एक व्यक्ती थेट 20 ते 25 फुट खोल मॅनहोलमध्ये...
आता ऑपरेशन तुतारी! कोल्हेंच्या वक्तव्यावर शिरसाटांचा मोठा राजकीय स्फोट
Sanjay Shirsat On Amol Kolhe | ऑपरेशन टायगरनंतर आता ऑपरेशन तुतारी! अमोल कोल्हेंच्या वक्तव्यावर शिरसाटांचा मोठा राजकीय स्फोट, म्हणाले...
तीन ठिकाणी पंचनामे, मोबाईल, कपडे अन् सगळंच... पोलिसांचं पथक
तीन ठिकाणी पंचनामे, मोबाईल, कपडे अन् सगळंच... पोलिसांचं पथक सियाच्या घरी पोहोचलं, पुढे काय घडलं?
आधी मला तर स्कोअर करू दे, बाकीची टीम... बच्चू कडूंच्या दाव्यावर सचिन
आधी मला तर स्कोअर करू दे, बाकीची टीम... बच्चू कडूंच्या दाव्यावर सचिन अहिर असं काय म्हणाले?