AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रवी दुबेची पत्नी सरगुनचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर? अखेर त्याने सोडलं मौन

रवी दुबे आणि सरगुन मेहता ही जोडी टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील अत्यंत लोकप्रिय जोडी आहे. 2013 मध्ये या दोघांनी लग्न केलं. मात्र गेल्या काही दिवसांपासून सरगुनच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यावर आता संगीतकार जानीने मौन सोडलं आहे.

रवी दुबेची पत्नी सरगुनचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर? अखेर त्याने सोडलं मौन
रवी दुबे, सरगुन मेहता, जानीImage Credit source: Instagram
| Updated on: Nov 18, 2024 | 8:59 AM
Share

अभिनेत्री सरगुन मेहताने टेलिव्हिजनवर नाव कमावल्यानंतर पंजाबी इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं. तिने पंजाबी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आणि तिथेही तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. सरगुन आणि तिचा पती रवी दुबे यांची जोडी खूप हिट आहे. हे दोघं मिळून एक प्रॉडक्शन हाऊस चालवतात. त्यांचे म्युझिक व्हिडीओ प्रेक्षकांना खूप आवडतात. टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय जोडी म्हणून या दोघांकडे पाहिलं जातं. अशातच सरगुन आणि संगीतकार जानी यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं. आता या चर्चांवर खुद्द जानीने प्रतिक्रिया दिली आहे.

नुकत्याच एका पॉडकास्ट मुलाखतीत जानी म्हणाला, “मी सरगुनला एक व्हॉइस नोट पाठवला होता. त्यात मी म्हटलं होतं की सरगुनसारखी मुलगी, मैत्रीण, गर्लफ्रेंड, पत्नी किंवा बहीण म्हणून प्रत्येकाच्या आयुष्यात असायला हवी. ती खूप खास व्यक्ती आहे. मी तिच्यापेक्षा जास्त मेहनती मुलीला पाहिलं नाही. आमच्यात खूप चांगली मैत्री आहे म्हणून लोकांना असं वाटतं की काहीतरी सुरू आहे. पण माझ्यात आणि सरगुनमध्ये असं काहीच नाही.”

“आमचं काहीच अफेअर नाही, हे मी स्पष्ट करतो. रवी भावासोबत माझं खूप चांगलं नातं आहे. सरगुनसोबतही माझी चांगली मैत्री आहे. तिचा स्वभाव इतका चांगला आहे की तिच्यासारखी मुलगी कोणत्याही नात्याने तुमच्या आयुष्यात असावी असं मला वाटतं. तिचा उद्देशच असा आहे की 24 तास काम करणं. चित्रपटाचं शूटिंग, बिझनेस, मित्रमैत्रिणींसोबत नातं जपणं, एवढ्या हिंमतीने वागणं.. हे सर्व गुण तिच्यात आहेत”, असं त्याने पुढे स्पष्ट केलं.

सरगुन आणि जानी यांनी एकत्र बऱ्याच म्युझिक व्हिडीओंसाठी काम केलंय. ‘तितलियाँ वर्गा’, ‘गल्ला तेरियाँ’, ‘तेरी आँखे’, ‘किस मोऱ्ह ते’, ‘लारे’ यांसारख्या गाण्यांचा त्यात समावेश आहे. रवी आणि सरगुन यांनी 7 डिसेंबर 2013 रोजी लग्न केलं होतं. या दोघांनी ’12/24 करोल बाग’ या मालिकेत एकत्र काम केलं होतं. याच मालिकेत काम करताना दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.