AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rinku Rajguru : आधी होती नास्तिक , मग कसा बसला अध्यात्मावार विश्वास ? रिंकू राजगुरूने सांगितला आयुष्य बदलणारा अनुभव.. काय म्हणाली ती ?

रिंकू राजगुरू, तिच्या आध्यात्मिक प्रवासाने चर्चेत आहे. एका मुलाखतीत तिने नास्तिकतेतून आस्तिकतेकडे कसा प्रवास केला हे सांगितले. केदारनाथमधील विलक्षण अनुभवाने तिचा देवावर विश्वास बसला. पूजा-पाठ आणि जपातून तिला समाधान मिळते, असं ती सांगते. रिंकूच्या या नवीन आध्यात्मिक बाजूमुळे चाहते आश्चर्यचकित झाले आहेत.

Rinku Rajguru : आधी होती नास्तिक , मग कसा बसला अध्यात्मावार विश्वास ? रिंकू राजगुरूने सांगितला आयुष्य बदलणारा अनुभव.. काय म्हणाली ती ?
रिंकू राजगुरूImage Credit source: Instagram
| Updated on: Feb 20, 2026 | 9:25 AM
Share

‘सैराट’ मधल्या ‘आर्ची’च्या भूमिकेतून अभिनयाचं नाण खणखणीत वाजवणारी अभिनेत्री रिंकू राजगुरू हिची वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही. तिच्या ‘आर्ची’ ने सगळ्यांनाच वेड लावलं होते, मात्र ती वन फिल्म वंडर न ठरता, अभिनयाच्या दुनियेत शिरत खाचखळगे, टक्के-टोलपणे खात तिने तिचं अस्तिच्व सिद्ध करून दाखवल. प्रत्येक चित्रपटागणीक प्रगती करत तिने प्रेक्षाकांच्या, चाहत्यांच्या मनात घर केलं. रिकू ही थोडीफार आर्चीप्रमाणेच आहे, तिच्या अभिनयाचप्रमाणेच ती स्पष्टवक्तेपणासाठीही ती ओळखली जाते. ‘सैराट’ नंतरही ती अनेक चित्रपटात दिसली असून सोशल मीडियावरही ती खूप ॲक्टिव्ह असते. तिच्या अकाऊंटवर ती अनेक फोटो, व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना अपेडट देत असते.

रिंकू नुकतीच साडेमाडेतील चित्रपटात झळकली. पण सध्या ती या चित्रपटामुळे नव्हे तर तिच्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आहे. एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये वैयक्तिक आयुष्याबद्दल बरेच खुलासे केले. तसेच तिने तिची अध्यात्मिक बाजू आणि केदारनाथला आलेला विलक्षण अनुभव सांगितला. आधी मी नास्तिक होते, पण काही अनुभवांमुळे अध्यात्मिक झाल्याचे रिंकून नूद केले. यावेळी तिने एक अनुभवही कथन केला, तो ऐकून तुमच्याही अगांवर नक्कीच काटा येईल.

आधी मी नास्तिक होते, पण…

या मुलाखतीत रिंकू अध्यात्माकडे झालेल्या तिच्या प्रवासाबद्दल सविस्तरपणे बोलली. ” खरंतर आधी मी नास्तिक होते, पण केदारनाथला गेल्यावर, तिथे आलेल्या काही अनुभवांमुळे माझा थोडा विश्वास बसू लागला. मग मी उपवास वगैरे करायला लागले. पूजा करू लागले, मग मला त्याचे अनुभवही आले, ” असं रिंकूने सांगितलं.

” आता मी त्या गोष्टींकडे वळले. खरंतर पूजा पाठ, सण उत्सव यामागे काही वैज्ञानिक कारणंही आहेत. कुठलीतरी शक्ती आहे. जेव्हा इच्छाशक्ती प्रबळ असते, तेव्हा आपण त्या गोष्टींकडे वळतो. माझ्याबाबतही तसंच काहीसं घडलं. माझ्या आयुष्यात अशा काही गोष्टी घडल्या, ज्यामुळे मी या गोष्टींवर विश्वास ठेवू लागले,  मी या गोष्टी करायला लागले. मला असं वाटतं की आता इथेच ती आशा आणि शांतता आहे. सकाळी मी देव पूजा करते, जप करते, या गोष्टीतून मला आनंद मिळतो”, असं रिंकूने नमूद केलं.

केदारनाथमध्ये आला विलक्षण अनुभव

पुढे बोलता बोलता रिंकूने तिला केदारनाथमध्ये आलेल्या विलक्षण अनुभवाबद्दल सांगितलं. ” मला जो अनुभव आला, तो कधीही न विसरता येण्याजोगा आहे. एत दिवस मला अचानक वाटलं की केदारनाथला जावं आणि मी गेलेही. गुरूवार होता, पौर्णिमेच्या दिवशी मी चालत गेले, पण खूप थकलेसुद्धा होते. मी दर्शन घेतलं आणि तेव्हा मला वाटलं की जाताना तरी हेलिकॉप्टर मिळू दे. कारण पुढल्याच दिवशी फ्लाईट होतं. मी खूप दमले होते, रडलेही… तिथे एक मला माणूस म्हणाला होता की, हेलिकॉप्टर मिळेल. दोन तीन तास यासाठी आम्ही थांबलो. पण हेलिकॉप्टर काही आलं नाही. अंधार व्हायला आला होता. “असं रिंकूने सांगितलं.

मी देवाला म्हटलं…

हा अनुभव सांगताना रिंकू पुढे म्हणाली, “मी देवाला म्हटलं हेलिकॉप्टर येऊ दे, मी कुटुंबासह दर्शनाला येईन. त्यानंतर तिथे एक माणूस आला आणि म्हणाला आता हेलिकॉप्टर मिळणार नाही. ते ऐकून त्रास झाला, मी प्रचंड चिडले होते, त्याच त्राग्यात म्हटलं हा काय देव आहे ? एक हेलिकॉप्टर हवंय (मला) तर मिळत नाहीये, तशीच बडबड करत पुढे जात होते. तेवढ्यात माझ्या मागून एक माणूस आला आणि त्याने मला सांगितलं की हेलिकॉप्टरमध्ये 2 जागा आहेत. ते ऐकून मी आनंदात पळत पळत पुढे गेले, आणि पुढच्याच क्षणी धाडकन खाली पडले. तेव्हा माझ्या गुडघ्याला लागलं. त्यानंतर मी देवाला म्हटलं, यापुढे कधीच तक्रार करणार नाही. कारण त्याच क्षणी मला शिक्षा मिळाली होती ” असा विलक्षण किस्सा, अनुभव रिंकूने यावेळी शेअर केला

मला खूप त्रास झाला. मी चिडले. मी देवाला म्हटले की, हा काय देव आहे, हेलिकॉप्टर हवाय तर मिळत नाही, असं म्हणत पुढे गेले. एक व्यक्ती आला आणि म्हणाला, हेलिकॉप्टरमध्ये दोन सीट आहेत. मी आनंदात पळत गेले पण खाली पडले. माझ्या गुडघ्याला लागलं. मी देवाला म्हटलं, पुढे कधीच तक्रार करणार नाही. कारण मला त्याच क्षणी मला शिक्षा मिळाली होती”, हा किस्सा तिनं मुलाखतीतून शेअर केला. ” हे कसं घडलं माहीत नाही, कारण तेव्हा बरेच लोक वाट पहात होते, पण फक्त आम्ही दोघीच हेलिकॉप्टरमधून गेलो. त्यानंतर माझा विसवास बसला की अशी काही एक शक्ति आहे”, असंही रिंकूने नमूद केलं.

आता एनसीईआरटीच्या पुस्तकात मराठा साम्राज्याच्या इतिहासाचा समावेश
आता एनसीईआरटीच्या पुस्तकात मराठा साम्राज्याच्या इतिहासाचा समावेश.
नवी दिल्लीत इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026 चे उद्घाटन
नवी दिल्लीत इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026 चे उद्घाटन.
नाशिकमध्ये शेअर मार्केटच्या आमिषाने 2.16 कोटींची फसवणूक
नाशिकमध्ये शेअर मार्केटच्या आमिषाने 2.16 कोटींची फसवणूक.
ड्रग्ज प्रकरणाला इम्तियाज जलीलांचा सपोर्ट? संजय शिरसाटांचे गंभीर आरोप
ड्रग्ज प्रकरणाला इम्तियाज जलीलांचा सपोर्ट? संजय शिरसाटांचे गंभीर आरोप.
मुंबई पालिकेच्या महापौरपदावरुन महायुतीत एकमत? अपडेट आली समोर
मुंबई पालिकेच्या महापौरपदावरुन महायुतीत एकमत? अपडेट आली समोर.
शिंदे- ठाकरे भेटीवर राजकीय वाद; राऊत आणि बन यांच्यात टीका-प्रत्युत्तर
शिंदे- ठाकरे भेटीवर राजकीय वाद; राऊत आणि बन यांच्यात टीका-प्रत्युत्तर.
अजित दादांच्या अपघातावर मुलाची शंका, थेट पोस्ट करत केला सवाल
अजित दादांच्या अपघातावर मुलाची शंका, थेट पोस्ट करत केला सवाल.
धाराशिवमध्ये तानाजी सावंत-एकनाथ शिंदेंच्या भेटीत नेमकं काय घडलं?
धाराशिवमध्ये तानाजी सावंत-एकनाथ शिंदेंच्या भेटीत नेमकं काय घडलं?.
छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेली मुंबई आम्हाला घडवायची आहे
छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेली मुंबई आम्हाला घडवायची आहे.
आठवड्याभरानंतर तेजस ठाकरेंना रुग्णालयातून डिस्चार्ज
आठवड्याभरानंतर तेजस ठाकरेंना रुग्णालयातून डिस्चार्ज.