AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजामौलींच्या वडिलांनी दिली RRR 2 बद्दल मोठी अपडेट; सीक्वेलमध्ये दाखवणार दुसरी कथा पण दिग्दर्शन मात्र..

देशाच्या स्वातंत्र्यापूर्वीचा 1920 चा काळ RRR या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. अल्लुरी सीताराम राजू (रामचरण) आणि कोमाराम भीम (ज्युनियर एनटीआर) या दोन क्रांतिकारकांभोवती ही कथा फिरते. इतिहासातील ही दोन महत्त्वाची नावं जरी घेतली असली तरी चित्रपटाची संपूर्ण कथा ही काल्पनिक आहे.

राजामौलींच्या वडिलांनी दिली RRR 2 बद्दल मोठी अपडेट; सीक्वेलमध्ये दाखवणार दुसरी कथा पण दिग्दर्शन मात्र..
RRRImage Credit source: Instagram
| Updated on: Jul 11, 2023 | 8:58 AM
Share

मुंबई : एस. एस. राजामौली दिग्दर्शित ‘RRR’ या चित्रपटाने केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात आपल्या यशाचा झेंडा फडकवला. 2022 या वर्षाती हा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला होता. यातील ‘नाटू नाटू’ या गाण्यानेही प्रतिष्ठित ऑस्कर आणि गोल्डन ग्लोब पुरस्कार पटकावत इतिहास रचला. त्यानंतर आता या चित्रपटाविषयी महत्त्वपूर्ण माहिती समोर येत आहे. राजामौली यांचे वडील आणि दिग्गज पटकथालेखक विजयेंद्र प्रसाद यांनी RRR च्या सीक्वेलविषयी मोठी घोषणा केली आहे. या सीक्वेलच्या कथेवर सध्या काम सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ते म्हणाले की, RRR चा सीक्वेल हा हॉलिवूड प्रोजेक्ट असेल. हॉलिवूड दिग्दर्शक या सीक्वेलचं दिग्दर्शन करणार आहे.

विजयेंद्र यांनी हेसुद्धा यावेळी जाहीर केलं की रामचरण आणि ज्युनियर एनटीआरच या सीक्वेलमध्ये मुख्य भूमिका साकारणार आहेत. मात्र RRR ची तीच कथा सीक्वेलमध्ये पुढे जाणार नाही. स्वातंत्र्यपूर्व काळातील तेलुगू राज्यांमधील दुसऱ्या प्रकरणावर आधारित त्याची कथा असू शकते. “रामचरण आणि ज्युनियर एनटीआर यांच्या RRR चित्रपटाच्या सीक्वेलवर आम्ही काम करतोय. या चित्रपटाचं दिग्दर्शक एस. एस. राजामौलीच करणार की नाही हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र चित्रपटावर त्यांचं बारकाईने लक्ष असेल. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच हा चित्रपट बनवला जाईल”, असं विजयेंद्र प्रसाद म्हणाले.

याआधी राजामौलींनीही सीक्वेलविषयी महत्त्वपूर्ण माहिती दिली होती. शिकागोमध्ये पार पडलेल्या RRR च्या स्क्रीनिंगदरम्यान राजामौलींना सीक्वेलबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर ते म्हणाले, “मी सीक्वेलविषयी सध्या फार काही माहिती देऊ शकत नाही. पण एवढं नक्कीच सांगू शकतो की माझे वडील, ज्यांनी RRR सह आतापर्यंत माझ्या प्रत्येक चित्रपटाची पटकथा लिहिली आहे, त्यांच्यासोबत मी यावर चर्चा केली आहे. ते सध्या कथेवर काम करत आहेत.”

देशाच्या स्वातंत्र्यापूर्वीचा 1920 चा काळ RRR या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. अल्लुरी सीताराम राजू (रामचरण) आणि कोमाराम भीम (ज्युनियर एनटीआर) या दोन क्रांतिकारकांभोवती ही कथा फिरते. इतिहासातील ही दोन महत्त्वाची नावं जरी घेतली असली तरी चित्रपटाची संपूर्ण कथा ही काल्पनिक आहे. RRR या चित्रपटात ज्युनियर एनटीआर आणि रामचरण यांच्या मुख्य भूमिका होत्या. तर आलिया भट्ट आणि अजय देवगण यांनीसुद्धा चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. राजामौली यांचे वडील आणि पटकथालेखक विजयेंद्र प्रसाद हे सीक्वेलची कथा लिहित आहेत.

Follow Us
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.
शहरातही आता चुलींना मागणी वाढली, गॅस सिलिंडर टंचाईवर शोधला उपाय
शहरातही आता चुलींना मागणी वाढली, गॅस सिलिंडर टंचाईवर शोधला उपाय.
खरातवर आणखी दोन गुन्हे दाखल, एकूण गुन्ह्यांची संख्या १०, हवाला रॅकेट..
खरातवर आणखी दोन गुन्हे दाखल, एकूण गुन्ह्यांची संख्या १०, हवाला रॅकेट...
रुपाली चाकणकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार ? काय म्हणाल्या अंधारे?
रुपाली चाकणकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार ? काय म्हणाल्या अंधारे?.
'ऑल पार्टी मिटींगला जे उपस्थित नाहीत ते...', राऊत यांची मोदींवर टीका
'ऑल पार्टी मिटींगला जे उपस्थित नाहीत ते...', राऊत यांची मोदींवर टीका.
रत्नागिरीत अवकाळी पावसाचा आंब्यांना फटका, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
रत्नागिरीत अवकाळी पावसाचा आंब्यांना फटका, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान.
'कर्माचे फळ...,' चाकणकरांच्या राजीनाम्यावर दमानिया यांची प्रतिक्रीया
'कर्माचे फळ...,' चाकणकरांच्या राजीनाम्यावर दमानिया यांची प्रतिक्रीया.
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही.