AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कितने आदमी थे… शोलेतल्या गब्बरला मीच शिकवलं, सचिन पिळगांवकरांनी सांगितलं फेमस डायलॉगचा जन्म कसा झाला?

सचिन पिळगावकर यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये 'शोले' सिनेमातील किस्सा सांगितला आहे. त्यांनी कितने आदमी थे या प्रसिद्ध डायलॉगमागील किस्सा सांगितला आहे.

कितने आदमी थे… शोलेतल्या गब्बरला मीच शिकवलं, सचिन पिळगांवकरांनी सांगितलं फेमस डायलॉगचा जन्म कसा झाला?
Sachin pilgaonkarImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Jun 20, 2025 | 12:29 PM
Share

मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज आणि ज्येष्ठ अभिनेते म्हणून सचिन पिळगांवकर ओळखले जातात. त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात बालकलाकार म्हणून केली. हिंदी सह मराठी सिनेमांमध्ये काम करत आपल्या अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. ‘बालिका वधू’, ‘पारध’, ‘ब्रह्मचारी’, ‘सत्ते पे सत्ता’, ‘बचपन’, ‘अशीही बनवा बनवी’, ‘नवरा माझा नवसाचा’, ‘आयत्या घरात घरोबा’ यांसारख्या अनेक सिनेमांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली. विशेष म्हणजे, हिंदी चित्रपटसृष्टीतील हिट सिनेमा ‘शोले’मध्येही त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती. आता त्यांनी शोलेमधील ‘कितने आदमी थे’ या प्रसिद्ध डायलॉगचा जन्म कसा झाला हे सांगितले आहे.

‘शोले’ चित्रपटातील “कितने आदमी थे…” हा डायलॉग आजही प्रत्येकाच्या मनात घर करून आहे. अमजद खान यांच्या गब्बर सिंग या पात्राने आणि त्यांच्या भारदस्त आवाजाने या डायलॉगला अमरत्व प्राप्त झाले. पण, या डायलॉगमागे सचिन पिळगांवकर यांची मेहनत आणि मार्गदर्शन असल्याचे फार कमी लोकांना माहिती आहे.

वाचा: अश्लील फोटो आणि व्हिडीओ विकून दोन महिन्यात कमावले 10 कोटी, कोण आहे ही अभिनेत्री?

नुकत्याच एका मुलाखतीत सचिन पिळगांवकर यांनी ‘शोले’मधील या डायलॉगच्या निर्मितीमागील रंजक किस्सा सांगितला. त्यांनी सांगितले की, अमजद खान यांना हा डायलॉग सुरुवातीला योग्य रीतीने बोलता येत नव्हता. त्यांचा आवाज पातळ वाटत होता आणि या डायलॉगसाठी भारदस्त व खर्जातील आवाजाची गरज होती. यासाठी सचिन पिळगांवकर यांनी अमजद खान यांना स्टुडिओत नेले आणि त्यांना डायलॉग बोलण्यासाठी विशेष मार्गदर्शन केले.

सचिन पिळगांवकर म्हणाले, “शोले चित्रपट प्रदर्शित झाल्यावर अनेकांना वाटले की, अमजदचा आवाज गब्बर सिंगच्या पात्राला शोभत नाही. तो थोडा पातळ वाटत होता. मी त्याला माइकसमोर उभे केले. तेव्हा आमचे रेकॉर्डिस्ट सूद आणि त्यांचे असिस्टंट मंगेश देसाई यांना मी सांगितले, ‘ट्रेबल पूर्णपणे बंद करा आणि बेस वाढवा.’ त्याचबरोबर मी अमजदला सांगितले, ‘माइकच्या जवळ उभा राहा आणि वरच्या पट्टीत बोलू नको, खालच्या पट्टीत बोल.’ कारण मला माझ्या गायनाच्या अनुभवामुळे ऑक्टेव्हज्‌चे ज्ञान आहे. मी त्याला सांगितले, ‘खालच्या सुरात बोल… कितने आदमी थे…’ त्याने आधी हा डायलॉग वरच्या पट्टीत ओरडून म्हटला होता, पण मी त्याला खालच्या सुरात बोलायला सांगितले.”

सचिन पिळगांवकर यांच्या या मार्गदर्शनामुळे अमजद खान यांनी तो डायलॉग इतक्या प्रभावीपणे सादर केला की, तो ‘शोले’ चित्रपटाचा प्राणच बनला. सचिन यांच्या अनुभव आणि कौशल्यामुळे हा डायलॉग आजही प्रेक्षकांच्या मनात कायम आहे.

Follow Us
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोपांनी खळबळ!
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत... पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
Mayank Lohar | लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट
Shirdi | साईबाबांच्या नगरीत धक्कादायक खुलासा! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट पेढे...
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णय
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा
स्वार्थासाठी गेले, जनता हिशोब चुकता करणार! नाईकांचा खासदारांना इशारा
Vaibhav Naik | स्वार्थासाठी गेले, आता जनता हिशोब चुकता करणार! वैभव नाईकांचा फुटीर खासदारांना इशारा
विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट
Beed | विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट निर्णय घेतला; लवकरच...
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं!
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं! त्या वादाला आता नवं वळण!
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता बड्या नेत्याचं विधान चर्चेत