अंधारात दडलेलं रहस्य.. ‘ती’ कोण? गाव, गूढ अन् थरारक प्रसंग; महाराष्ट्रातल्या ‘सालबर्डी’ गावातली अंगावर काटा आणणारी कथा

गाव, गूढ आणि रहस्याने व्यापलेली कथा.. अनपेक्षित वळणं, थरारक प्रसंग आणि शेवटपर्यंत खिळवून ठेवणारी पटकथा.. ‘सालबर्डी’ हा चित्रपट येत्या १७ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

अंधारात दडलेलं रहस्य.. ती कोण? गाव, गूढ अन् थरारक प्रसंग; महाराष्ट्रातल्या सालबर्डी गावातली अंगावर काटा आणणारी कथा
सालबर्डी
Image Credit source: Instagram
| Updated on: Mar 03, 2026 | 9:23 PM

अंधाराच्या गर्भात लपलेली एक अनोळखी कहाणी.. जिचं सत्य आजवर कुणालाच कळलेलं नाही. ‘सालबर्डी’ या शांत, निरागस वाटणाऱ्या गावात अचानक घडू लागलेल्या गूढ घटनांनी भीतीचं सावट पसरवलं आहे. गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह.. आणि वातावरणात दडलेला अनामिक थरार! या सगळ्याच्या मध्यभागी आहे एक रहस्यमय ‘ती’.. जी अचानक गावात येते आणि घटनांचा वेगच बदलून टाकते. ती नेमकी कोण? तिचा या घटनांशी काय संबंध? ती सत्य शोधायला आली आहे की स्वतःच एखादं गूढ घेऊन? गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर आणि चित्रपटप्रेमींमध्ये याच प्रश्नाची जोरदार चर्चा रंगली आहे. मराठीतील एका ग्लॅमरस अभिनेत्रीचं नाव या भूमिकेसाठी चर्चेत असल्याने उत्सुकता आणखी वाढली आहे. तिची ओळख गुप्त ठेवण्यात आली असली तरी तिची झलक पाहण्यासाठी चाहत्यांची आतुरता शिगेला पोहोचली आहे.

इतिहासाच्या गर्भात दडलेल्या अनेक रहस्यांचा कधीच शोध लागत नाही, ती नेहमीच अनुत्तरीतच रहातात. काहींचा शोध घेताना ती अजून वेगळया रहस्यांना जन्म देतात. महाराष्ट्रातल्या दुर्गम भागात असलेल्या ‘सालबर्डी’ या गावातल्या अशाच एका रहस्याचा आणि तिथे घडणाऱ्या विचित्र घटनांच्या शोधाची कहाणी सांगणारा ‘सालबर्डी’ हा थरारपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

भय आणि भ्रमाच्या विळख्यातल्या अनपेक्षित घटनेमागच्या शोधाचे ‘रहस्य’ शोधताना काय होणार? हे सत्य कोण आणि कसं बाहेर काढणार? हे पाहणं अतिशय थरारक असणार आहे. भीती, थरार, विश्वास-अविश्वास यांचा अकल्पित अनुभव देणाऱ्या ‘सालबर्डी’ चित्रपटात मराठीतल्या उत्तम कलाकारांची मांदियाळी आहे. परंतु हे कलाकार नेमके कोण आहेत, याबद्दलची माहिती अद्याप गुलदस्त्यात आहे.

‘सालबर्डी’ चित्रपटाचं छायांकन आणि संकलन सिद्धेश संतोष मोरे यांचं आहे. तर पटकथा आणि संवाद रोहित शुक्रे यांचं आहेत. गुरु ठाकूर, मुकुंद भालेराव यांनी लिहिलेल्या गीतांना पद्मनाभ गायकवाड यांचं संगीत लाभलं आहे. पार्श्वसंगीताची जबाबदारी अमर मोहिले यांनी सांभाळली आहे. अजय गोगावले, जावेद अली, आनंदी जोशी या गायकांचा स्वरसाज चित्रपटाला लाभला आहे. नृत्यदिग्दर्शन फुलवा खामकर, आशीष पाटील यांनी केलं आहे. कार्यकारी निर्माते दिपक कुदळे पाटील आहेत. वेशभूषा प्रणिता चिंदगे तर रंगभूषा श्रीनिवास मेनूगे यांची आहे. कलादिग्दर्शन प्रदीप गुरव यांचं आहे.

Follow Us
नाशिक : हज यात्रेसाठी गेलेले येवल्यातील सहा पर्यटक मक्का शहरात अडकलेअमेरिका व इराणच्या युद्धामुळे आखाती देशांमधील वातावरण चिघळले असून भारतातून अनेक पर्यटक व मुस्लिम बांधव हे हाजी यात्रेसाठी मक्कामध्ये गेले आहे. नाशिकच्या येवला शहरातील शेखलिंबूवाले कुटुंबियांमधील 6 लोक मक्का शहरात अडकले आहेत. त्यांना परत आणण्यासाठी भारत सरकारने प्रयत्न करावे अशी मागणी येवल्यातील त्यांच्या कुटुंबीयांनी केली आहे.
धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी धरला ठेका
गौतमीने ठाण्यात साजरी केली होळी
चंद्रग्रहणामुळे हिंगोलीचे औंढा नागनाथ मंदिर बंद
लाखो आदिवासी बांधवांच्या साक्षीने राजवाडी होळी संपन्न