AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सलमान खानच्या ‘बॅटल ऑफ गलवान’ची तुफान चर्चा, सत्य घटनेचा पडद्यावर थरार रंगणार; नेमकी कथा काय?

बॉलिवूडचा भाजान सलमान खानच्या प्रत्येक चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये आतुरता असते. सध्या 'बॅटल ऑफ गलवान' या चित्रपटाची चर्चा सुरु आहे. आता हा चित्रपट सत्य घटनेवर आधारीत असल्याचे समोर आले आहे.

सलमान खानच्या 'बॅटल ऑफ गलवान'ची तुफान चर्चा, सत्य घटनेचा पडद्यावर थरार रंगणार; नेमकी कथा काय?
Battle of galwanImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Dec 29, 2025 | 3:48 PM
Share

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा चित्रपट म्हटलं की चाहत्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचते. लवकरच भाईजानचा ‘बॅटल ऑफ गलवान’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. आता चाहत्यांना प्रश्न पडला आहे की या चित्रपटाची कथा नेमकी काय असणार आहे? खरं तर या बहुप्रतिक्षीत चित्रपटाची कथा ही सत्य घटनेवर आधारीत आहे.

‘बॅटल ऑफ गलवान’ खरी कथा काय आहे?

सलमान खानचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘बॅटल ऑफ गलवान’ लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत आणि चीन यांच्यात २०२० मध्ये झालेल्या संघर्षावर आधारित आहे. भारतीय आणि चीनी सैनिकांमध्ये झालेला हा मोठा संघर्ष आहे. हा संघर्ष जून २०२० मध्ये झाला होता. १५ जूनला नियंत्रण रेखा (LAC) वर दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये तणाव वाढला होता. ही एक हिंसक घटना होती ज्यात दोन्ही बाजूंना जीवितहानी झाली. सीमेजवळ बंदुकीचा वापर न करण्याच्या करारामुळे, सैनिकांनी काठ्या आणि दगडांचा वापर करून लड़ाई केली होती.

अल जझीरानुसार, हा संघर्ष दोन चीनी तंबू आणि निगराणी टॉवरांवरून झालेल्या वादामुळे सुरू झाला. याबाबत भारतीय अधिकाऱ्यांचे म्हणणे होते की ते “LACच्या भारतीय भागात बांधले गेले होते.” रॉयटर्सनुसार, “दोन्ही बाजूंचे सुमारे ९०० सैनिक समोरासमोरच्या लड़ाईत सामील होते, ज्यात त्यांनी एकमेकांना दगड आणि खिळे बसवलेल्या लाकडी काठ्यांनी मारले होते.”

‘बॅटल ऑफ गलवान’ कधी रिलीज होईल?

सलमान खानने चित्रपटामध्ये कर्नल बी. संतोष बाबू यांची भूमिका साकारली आहे. त्यांनी अपवादात्मक धैर्याने १६ बिहार रेजिमेंटचे नेतृत्व केले आणि त्यांना महावीर चक्राने सन्मानित करण्यात आले होते. सलमान खान स्टारर ‘बॅटल ऑफ गलवान’ १७ एप्रिल २०२६ रोजी चित्रपटगृहांत रिलीज होईल.

‘बॅटल ऑफ गलवान’ स्टार कास्ट

अपूर्वा लाखिया दिग्दर्शित या चित्रपटामध्ये सलमान खान व्यतिरिक्त चित्रांगदा सिंग मुख्य भूमिकेत आहे. चित्रपटाच्या सपोर्टिंग कलाकारांमध्ये अभिलाष चौधरी, अंकुर भाटिया, विपिन भारद्वाज, झेन शॉ, हीरा सोहल, निर्भय चौधरी, सिद्धार्थ मूली, अभिश्री सेन यांच्यासह अनेक कलाकार सामील आहेत. या चित्रपटाची निर्मिती सलमान खान फिल्म्स अंतर्गत सलमान खानने केली आहे.

सलमानच्या वाढदिवशी रिलीज झाला होता टीझर

२७ डिसेंबरला आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने सलमान खानने चाहत्यांना भेट देताना आपल्या बहुप्रतीक्षित चित्रपट ‘बॅटल ऑफ गलवान’चा टीझर जारी केला होता. ज्यात अभिनेता अॅक्शन मोडमध्ये दिसत आहे. एक मिनिटाच्या या वॉर ड्रामाच्या टीझरमध्ये खान एक धाडसी भारतीय सेना अधिकारीच्या भूमिकेत आहेत, जो शत्रूचा सामना करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. टीझरची सुरुवात सलमान खानच्या दमदार आवाजाने होते, ज्यात ते आपल्या बटालियनला उत्साहाने भरलेले भाषण देतात. पार्श्वभूमीत उंच डोंगराळ भागांचे दृश्य दाखवले गेले आहेत. दुसऱ्या एका दृश्यात, शत्रूशी समोरासमोरच्या लड़ाईसाठी दगडांसह तयार उभे दिसत आहे. हा टीझर पाहिल्यानंतर चाहते चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत.

हर्षवर्धन सपकाळ यांच्या व्यक्तव्यावरू पुण्यात भाजप-कॉंग्रेस आमनेसामने
हर्षवर्धन सपकाळ यांच्या व्यक्तव्यावरू पुण्यात भाजप-कॉंग्रेस आमनेसामने.
पुण्याच्या ओंकारेश्वर मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी
पुण्याच्या ओंकारेश्वर मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी.
कोंडेश्वर शिव मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या मोठ्या रांगा
कोंडेश्वर शिव मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या मोठ्या रांगा.
तेजस ठाकरेंवर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरु! नेमकं काय घडलं?
तेजस ठाकरेंवर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरु! नेमकं काय घडलं?.
अजित पवारांचा विलीनीकरणासाठी आग्रह होता - जयंत पाटील
अजित पवारांचा विलीनीकरणासाठी आग्रह होता - जयंत पाटील.
हर्षवर्धन सपकाळांच्या वक्तव्याने वाद; भाजप-काँग्रेसमध्ये जुंपली
हर्षवर्धन सपकाळांच्या वक्तव्याने वाद; भाजप-काँग्रेसमध्ये जुंपली.
राज्यभरात एटीएसची मोठी कारवाई; यवतमाळ आणि अहिल्यानगरमध्ये छापे
राज्यभरात एटीएसची मोठी कारवाई; यवतमाळ आणि अहिल्यानगरमध्ये छापे.
अजित पवारांच्या अपघाताप्रकरणी रोहित पवारांचं अमित शाहांना पत्र
अजित पवारांच्या अपघाताप्रकरणी रोहित पवारांचं अमित शाहांना पत्र.
महाराष्ट्र पालथा घातला असता तर...; राऊतांनी ठाकरे बंधूंचे कान टोचले
महाराष्ट्र पालथा घातला असता तर...; राऊतांनी ठाकरे बंधूंचे कान टोचले.
मी कान नाही टोचले, मी फक्त...; सामनातील अग्रलेखावर राऊतांचं उत्तर
मी कान नाही टोचले, मी फक्त...; सामनातील अग्रलेखावर राऊतांचं उत्तर.