AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऐश्वर्याने अभिषेक सोबत लग्न केल्यामुळे…, सलमान खान याचं मोठं वक्तव्य

Salman Khan on Aishwarya Marriage: अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या लग्नावर सलमान खान याचं मोठं वक्तव्य, मनातील भावना व्यक्त करत भाईजान म्हणाला, 'ऐश्वर्याने अभिषेक सोबत लग्न केल्यामुळे...', आजही दोघांच्या नात्याची चर्चा सर्वत्र रंगलेली असते.

ऐश्वर्याने अभिषेक  सोबत लग्न केल्यामुळे..., सलमान खान याचं मोठं वक्तव्य
| Updated on: Nov 16, 2024 | 10:55 AM
Share

अभिनेत्री ऐश्वर्या राय हिने 2007 मध्ये अभिनेता अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न केलं. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर ऐश्वर्या हिने लेक आराध्या हिला जन्म दिला. पण अभिषेक याच्यासोबत लग्न करण्याआधी ऐश्वर्या अभिनेता सलमान खान याला डेट करत होती. दोघांच्या जोडीला चाहत्यांनी देखील डोक्यावर घेतलं होतं. एवढंच नाही तर, चाहते सलमान – ऐश्वर्या यांच्या लग्नाच्या प्रतीक्षेत देखील होते. पण सलमान – ऐश्वर्या यांचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं आहे.

सलमान खान याच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर अभिनेत्री अभिषेक याच्यासोबत संसार थाटला. पण आज वयाच्या 58 व्या वर्षी देखील सलमान खान अविवाहित आहे. पण एका मुलाखतीत सलमान खान याला ऐश्वर्याच्या लग्नाबद्दल विचारण्यात आलं होतं.

एका मुलाखतीत सलमान खान, ऐश्वर्या बद्दल म्हणाला होता, ‘त्या गोष्टीला अनेक वर्ष झाली आहे. आत ती कोणाची तरी पत्नी आहे. ऐश्वर्याने अभिषेक याच्यासोबत लग्न केल्यामुळे मी आनंदी आहे. अभिषेक एका चांगला मुलगा आहे. एक्स-बॉयफ्रेंडला आणखी काय हवं आहे…’

‘नातं संपल्यानंतर एक्स-गर्लफ्रेंडला वाईट परिस्थितीत पाहण्याची कोणत्याच एक्स बॉयफ्रेंडची इच्छा नसते… माझ्या मनात आता कोणतीच पश्चातापाची भावना नाही. ऐश्वर्याने कायम आनंदी राहवं अशीच माझी इच्छा आहे.’ असं देखील सलमान खान म्हणाला होता.

सलमान आणि ऐश्वर्या यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, ‘हम दिल दे चुके सनम’ सिनेमातून दोघांच्या नात्याला सुरुवात झाली. रिलेशनशिपमध्ये असताना दोघांना अनेकदा एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं. पण सलमान – ऐश्वर्या यांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. ऐश्वर्याने सलमान याच्यावर मानसीक आणि शारीरिक छळाचे आरोप केले होते.

ऐश्वर्या – अभिषेक यांचं नातं

गेल्या अनेक दिवसांपासून ऐश्वर्या – अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे. पण यावर कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही. दरम्यान अभिषेक याच्या नावाची चर्चा अभिनेत्री निम्रत कौर हिच्यासोबत देखील होत आहे.

Follow Us
प्रताप सरनाईकांनंतर आता आणखी एका बड्या मंत्र्याचं 'ऑपरेशन टायगर'बाबत..
प्रताप सरनाईकांनंतर आता आणखी एका बड्या मंत्र्याचं 'ऑपरेशन टायगर'बाबत सुचक विधान, थेट म्हणाले...
नोकर आहात, नोकरांसारखे वागा; भर बैठीकीतच शिंदेंचा आमदार कडाडला...
Video | नोकर आहात, नोकरांसारखे वागा; भर बैठीकीतच शिंदेंचा आमदार कडाडला, असं काय घडलं की...
प्रताप सरनाईकांच्या दाव्यानंतर कैलास पाटलांची मोठी प्रतिक्रिया, थेट...
प्रताप सरनाईकांच्या दाव्यानंतर कैलास पाटलांची मोठी प्रतिक्रिया, थेट... धारशिवमध्ये राजकीय समीकरण पुन्हा बदलणार?
तुटलेल्या खिडक्यांवर उपमुख्यमंत्र्यांचे बॅनर अन्... अभिजीत दीपके आता..
तुटलेल्या खिडक्यांवर उपमुख्यमंत्र्यांचे बॅनर अन्... अभिजीत दीपके आता अगामी मोर्च्यावर
आता ओमराजेंचे निकटवर्तीय... राजकीय हालचाली वाढल्या? ऑपरेशन टायगरबाबत..
आता ओमराजेंचे निकटवर्तीय... राजकीय हालचाली वाढल्या? ऑपरेशन टायगरबाबत बड्या मंत्र्याचं मोठं विधान
पुन्हा ठाकरेंचे आमदार...फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण होणाऱ्या सोहळ्यात
पुन्हा ठाकरेंच्या आमदारांची चर्चा! फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण होणाऱ्या कार्यक्रमात ठाकरेंच्या आमदाराची हजेरी
तुम्ही गुपचूप सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांना भेटून... मोठी खळबळ
तुम्ही गुपचूप सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांना भेटून... शिवसेना निकालाआधीच बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचे पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर...
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचं पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण, अखेर म्हणाले...
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिन...
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिनाच्या भाषणादरम्यान CM नेमकं काय म्हणाले?
पंतप्रधानांचं नागरिकांना मोठं आवाहन! जागतिक स्तरावर निर्यात वाढीसाठी..
पंतप्रधानांचं नागरिकांना मोठं आवाहन! जागतिक स्तरावर निर्यात वाढीसाठी...