AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सलमान खानची वहिनी सोहेलपासून घटस्फोटानंतर आता या व्यक्तीच्या पडली प्रेमात

सलमान खान सध्या त्याला मिळत असलेल्या धमक्यांमुळे चर्चेत आहे. पण सलमान खानचे कुटुंब देखील यामुळे डिस्टर्ब आहेत. त्यांना चिंता सतावते आहे. पण यादरम्यान सोहेल खानच्या एक्स पत्नी सीमा सचदेव देखील चर्चेत आहे. कारण तिने खुलासा केलाय की तो कोणाला तरी डेट करतेय. सोहेल आणि सीमा यांच्या २०२२ मध्ये घटस्फोट झाला होता.

सलमान खानची वहिनी सोहेलपासून घटस्फोटानंतर आता या व्यक्तीच्या पडली प्रेमात
salman khan
| Updated on: Oct 19, 2024 | 9:41 PM
Share

सलमान खानचा भाऊ सोहेल खान आणि सीमा सजदेह यांचा घटस्फोट झाला आहे. दोघांनी ही प्रेमविवाह केला होता. पण अनेक वर्ष एकत्र राहिल्यानंतर त्यांच्या नात्यात दुरावा आला आणि दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. हे सलमान खान आणि त्याच्या कुटुंबासाठी नक्कीच चांगली बातमी नव्हती. कारण अरबाज खान आणि मलायकाचा देखील घटस्फोट झालाय. सीमा ही फॅब्युलस लाईव्हज ऑफ बॉलीवूड वाइव्हज या शोमध्ये दिसली होती. आता या शोचा तिसरा सीझन आला आहे. ज्याला चांगला प्रतिसाद मिळतोय. पहिल्या एपिसोडमध्ये सीमा तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चा करताना दिसत आहे.

सीमा कोणाला डेट करत आहे?

महीप कपूर सांगतात की सीमा आयुष्यात पुढे गेली आहे. सीमा सांगते की ती आता विक्रम आहुजा नावाच्या व्यक्तीला डेट करत आहे. एवढेच नाही तर सीमाने विक्रमची तिच्या जवळच्या मित्रांशीही ओळख करून दिली आहे. असेही बोलले जात आहे की, सोहेलला भेटण्यापूर्वी सीमाने विक्रमशी एंगेजमेंट केली होती.

सीमा-सोहेलचं लग्न

सीमा आणि सोहेल खान जेव्हा एकमेकांच्या प्रेमात पडले तेव्हा दोघांनीही पळून जाऊन 1998 मध्ये लग्न केले होते. पण 2022 मध्ये दोघांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. पण याआधीच ते वेगळे राहत होते. या दोघांची चांगली गोष्ट म्हणजे सीमा आणि सोहेल वेगळे झाले असले तरी ते आपल्या मुलांचे पालकत्व एकत्रच करतात. मुलं कधी सीमासोबत तर कधी सोहेलसोबत राहतात.

विभक्त होण्यावर काय म्हणाली सीमा

शोच्या दुसऱ्या भागात सीमाने तिच्या विभक्त आयुष्याबाबत खुलासा केला होता. एका पॉडकास्टमध्ये सीमाने सांगितले होते की, तिने निर्मात्याला विनंती केली होती की ती शोमध्ये सोहेलपासून वेगळे होण्याबद्दल सांगेल, परंतु यामुळे कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. सत्य प्रत्येकाला कळले पाहिजे.

यावेळी सीमाने असेही सांगितले होते की, घटस्फोटापूर्वी दोघेही ५ वर्षे वेगळे राहत होतो. तो म्हणाला होता, ‘मी त्याला का दोष देऊ? माझा मोठा मुलगा त्यावेळी इतका मोठा होता की त्याला आपण वेगळे व्हावे असे वाटत नव्हते, पण त्यानंतर मला लग्न आणि माझा मुलगा यापैकी एक निवडावा लागला. मग मी मुलगा निवडला.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.