AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सतिश कौशिक यांचं अर्धवट राहिलेलं स्वप्न आता सलमान खान पूर्ण करणार

अभिनेते सतिश कौशिक यांच्या निधनाने अनेक बॉलिवूड कलाकारांना चांगलाच धक्का बसला आहे. अनेक जण त्यांच्या आठवणींना उजाळा देत आहेत.

सतिश कौशिक यांचं अर्धवट राहिलेलं स्वप्न आता सलमान खान पूर्ण करणार
| Updated on: Apr 19, 2023 | 5:26 PM
Share

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खान ( Salman Khan ) सध्या त्याच्या आगामी ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसत आहे. या दरम्यान सलमानला ‘तेरे नाम’ चित्रपटाची आठवण झाली. यावेळी बोलताना त्याने ‘तेरे नाम’चा सिक्वेल आणि अभिनेता सतीश कौशिकबद्दलही ( Satish Kaushaik ) खुलासा केला.

2003 साली प्रदर्शित झालेला सलमानचा ‘तेरे नाम’ ( Tere naam ) हा चित्रपट चांगलाच गाजला होता. हा चित्रपट सतीश कौशिक यांनी दिग्दर्शित केला होता. बऱ्याच वर्षांनंतर सतीन कौशिक यांनी सलमान खानसोबत ‘तेरे नाम 2’ च्या कल्पनेवरही चर्चा केली होती.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सलमान खानने सांगितले की, सतीश कौशिक त्याच्याकडे 20 वर्षांपूर्वी ‘तेरे नाम’साठी एका ओळीची कल्पना घेऊन आले होते आणि त्यानंतर सलमानला वाटले की ही एक सुपर आयडिया आहे. सलमान खानने सतीश कौशिकसोबत चांगले संबंध असल्याचेही सांगितले.

तेरे नाम सिनेमाचा सिक्वेल

सतीश कौशिक यांचे ९ मार्च रोजी दिल्लीत निधन झाले. तिसऱ्या चित्रपटाच्या कामासाठी ते मुंबईत येणार होते, पण त्यांनी या जगाचा निरोप घेतला. सलमानने पुढे खुलासा केला की त्यांनी ‘तेरे नाम’ ( Tere Naam 2 ) च्या कथानकावर चर्चा केली होती आणि 20 वर्षांनंतर कथेत काय घडले असते. त्यांनी सलमानला वचन दिले होते की ते या पटकथेवर लवकरच काम सुरू करणार आहेत. भविष्यात कधीतरी ‘तेरे नाम’चा सिक्वेल बनवण्याचा विचार करणार असल्याचे सलमानने सांगितले.

सलमान खानचा आगामी चित्रपट

सलमान खान 21 एप्रिल रोजी ‘किसी का भाई किसी की जान’मध्ये पूजा हेगडेसोबत दिसणार आहे. याशिवाय या चित्रपटात साऊथ स्टार दग्गुबती व्यंकटेश, शहनाज गिल, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, पलक तिवारी यांच्यासह अनेक नावाजलेले स्टार्स आहेत.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.