AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुलाच्या निधनानंतर पूर्णपणे खचले होते शेखर सुमन; बऱ्याच वर्षांनंतर घडला चमत्कार

अभिनेते शेखर सुमन यांनी काही वर्षांपूर्वी त्यांच्या मुलाला गमावलं होतं. दहा वर्षांच्या आयुषचं आजारपणात निधन झालं होतं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी मुलाला गमावण्याचं दु:ख व्यक्त केलं. त्याचसोबत घडलेल्या चमत्काराविषयी सांगितलं.

मुलाच्या निधनानंतर पूर्णपणे खचले होते शेखर सुमन; बऱ्याच वर्षांनंतर घडला चमत्कार
Shekhar SumanImage Credit source: Instagram
| Updated on: Apr 24, 2024 | 12:16 PM
Share

आपल्या पोटच्या मुलाला गमावण्याचं दु:ख काय असतं, ते शब्दांत वर्णन करता येणार नाही. अभिनेते शेखर सुमन यांनासुद्धा हे दु:ख सहन करावं लागलं होतं. त्यांच्या अवघ्या दहा वर्षांच्या मुलाने आपले प्राण गमावले होते. हृदयाशी संबंधित आजारामुळे आयुषचं निधन झालं होतं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ते याविषयी मोकळेपणे व्यक्त झाले. “मी आतून इतका खचलो होतो की मला यशाशी काही देणंघेणं नव्हतं आणि मला जगायचीही इच्छा नव्हती”, अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या. मुलाच्या निधनानंतर त्यांच्या आयुष्यावर दु:खाचं डोंगरच कोसळलं होतं.

आरजे सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत शेखर सुमन म्हणाले, “माझ्या दहा वर्षांच्या मुलाला जेव्हा मी गमावलं, तेव्हा माझं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झालं होतं. माझी जगायचीच इच्छा राहिली नव्हती. मी माझ्या हृदयाचा एक भागच गमावला होता, जो माझ्यासाठी खूप प्रिय होता. मी जमिनीवर डोकं आपटून रडत होतो. मुलाच्या निधनानंतर मला कोणत्याच गोष्टीशी घेणं-देणं नव्हतं. चित्रपटात काम करणं, पैसे कमावणं या गोष्टींमध्ये काहीच रस उरला नव्हता. मी जणू निर्जीवच झालो होतो. कुटुंबाचा गाडा चालवण्यासाठी मी काम करत होतो, पण माझ्यात जगायची इच्छाच उरली नव्हती.”

View this post on Instagram

A post shared by Shekhar Suman (@shekhusuman)

शेखर सुमन यांनी याच मुलाखतीत सांगितलं की मुलाच्या निधनानंतर ते अनेक पंडितांना भेटले आणि त्यांना विचारलं की असं का होतंय? अखेर एकेदिवशी एका व्यक्तीने त्यांना सांगितलं की त्यांचा मुलगा नक्कीच भेटणार. 2009 मध्ये शेखर सुमन हे बिहारच्या निवडणूक रॅलीमध्ये सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांची पत्नी काशी विश्वनाथला गेली होती. रॅलीदरम्यान त्यांच्या पत्नीने त्यांना फोन केला आणि त्यांच्यासोबत घडलेली आश्चर्यकारक घटना सांगितली. अल्का यांनी शेखर सुमन यांना सांगितलं की एका सेकंदासाठी त्यांना आयुषसारख्या दिसणाऱ्या मुलाला पाहिलं होतं. एका निर्मनुष्य जागी त्या कारमध्ये बसल्या होत्या, त्याचवेळी एक मुलगा त्यांच्याकडे आला आणि त्याने अल्का यांच्याकडे पैसे मागितले. जेव्हा त्यांनी पैसे दिले तेव्हा तो मुलगा म्हणाला, “यात माझं काय होईल?” हेच वाक्य त्यांचा मुलगा आयुष आजारी असताना बोलायचा. मुलाच्या तोंडून तेच शब्द ऐकून त्या चकीत झाल्या होत्या.

अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय,प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय,प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.