AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वयाच्या 47 व्या वर्षी ‘अंगुरी भाभी’ करणार लग्न; या अभिनेत्याची होणार तिसरी पत्नी?

अंगुरी भाभी म्हणून घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री शिल्पा शिंदे लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा आहे. शिल्पा ज्या अभिनेत्यासोबत लग्न करणार असल्याची चर्चा आहे, त्याचं हे तिसरं लग्न असेल.

वयाच्या 47 व्या वर्षी 'अंगुरी भाभी' करणार लग्न; या अभिनेत्याची होणार तिसरी पत्नी?
Shilpa ShindeImage Credit source: Instagram
| Updated on: Sep 04, 2024 | 2:16 PM
Share

‘भाभीजी छत पर है’ या मालिकेत अंगुरी भाभीची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शिल्पा शिंदे सध्या ‘खतरों के खिलाडी 14’ या रिॲलिटी शोमध्ये झळकतेय. या शोमधील शिल्पाचा मजेशीर अंदाज प्रेक्षकांना खूप आवडतोय. मालिका आणि शोजसोबतच शिल्पा तिच्या खासगी आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत आली. 47 वर्षीय शिल्पा अजूनही अविवाहित आहे. तिने नुकताच लग्नाचा निर्णय घेतल्याची जोरदार चर्चा आहे. ज्या अभिनेत्यासोबत शिल्पाच्या लग्नाची चर्चा आहे, त्याचं हे तिसरं लग्न असणार आहे. ‘पवित्र रिश्ता’, ‘बातें कुछ अनकहीं सी’, ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ यांसारख्या मालिकांमध्ये त्याने काम केलंय.

याआधी शिल्पा रोमित राजशी लग्न करणार होता. या दोघांचा साखरपुडाही झाला होता. इतकंच काय तर लग्नपत्रिकाही छापल्या गेल्या होत्या. मात्र ऐनवेळी काही कारणास्तव दोघांनी लग्न मोडलं होतं. त्यानंतर शिल्पाने कधीच लग्नाचा विचार केला नाही. सध्या तिचं नाव अभिनेता करणवीर मेहराशी जोडलं जातंय. करणवीरचं हे तिसरं लग्न असून याआधी त्याची दोनही लग्न अयशस्वी ठरली आहेत. ‘खतरों के खिलाडी’ या शोमध्ये शिल्पा आणि करणवीर सोबतच स्पर्धक म्हणून सहभागी झाले आहेत. एका स्टंटदरम्यान करणवीरने म्हटलंय की, “जर हा स्टंट आम्ही जिंकला तर आम्ही दोघं लग्न करू.” करणवीरने शोदरम्यान शिल्पाला ‘आय लव्ह यू’ असंही म्हटलं होतं. नंतर करणवीरने जेव्हा तिला लग्नासाठी विचारलं, तेव्हा शिल्पा त्याला म्हणाली, “नाही, गडबड होईल, कोऑर्डिनेशनमध्ये.” त्यावर करण तिला म्हणतो, “नाही होणार गडबड. आपण दोघं मिळून करुया.” शिल्पा आणि करण हे आधीपासूनच एकमेकांचे चांगले मित्रही आहेत.

करणवीरने 2009 मध्ये बालमैत्रीण देविकाशी लग्न केलं होतं. मात्र लग्नाच्या नऊ वर्षांनंतर 2018 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. यानंतर त्याने 2021 मध्ये गर्लफ्रेंड निधी सेठशी लग्न केलं होतं. मात्र लग्नानंतर काही महिन्यांतच त्यांच्यात मतभेद निर्माण झाले. अखेर लग्नाच्या दोन वर्षांत करणवीरने निधीला घटस्फोट दिला. याविषयी बोलताना निधीने एका मुलाखतीत स्पष्ट केलं होतं, “माझ्या मते कोणत्याही नात्यात दररोज भांडणं होत असतील तर ते सहनशक्तीपलीकडे जातं. अशा परिस्थितीत कोणीच एकत्र राहू शकत नाही. मानसिक शांती, एकमेकांसाठी आदर, प्रामाणिकपणा आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असणं.. या गोष्टी कोणत्याही वैवाहिक आयुष्यात गरजेच्या असतात. कोणत्याही नात्यातील विषारीपणा सहन करता कामा नये.”

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.