AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वयाच्या 47 व्या वर्षी ‘अंगुरी भाभी’ करणार लग्न; या अभिनेत्याची होणार तिसरी पत्नी?

अंगुरी भाभी म्हणून घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री शिल्पा शिंदे लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा आहे. शिल्पा ज्या अभिनेत्यासोबत लग्न करणार असल्याची चर्चा आहे, त्याचं हे तिसरं लग्न असेल.

वयाच्या 47 व्या वर्षी 'अंगुरी भाभी' करणार लग्न; या अभिनेत्याची होणार तिसरी पत्नी?
Shilpa ShindeImage Credit source: Instagram
| Updated on: Sep 04, 2024 | 2:16 PM
Share

‘भाभीजी छत पर है’ या मालिकेत अंगुरी भाभीची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शिल्पा शिंदे सध्या ‘खतरों के खिलाडी 14’ या रिॲलिटी शोमध्ये झळकतेय. या शोमधील शिल्पाचा मजेशीर अंदाज प्रेक्षकांना खूप आवडतोय. मालिका आणि शोजसोबतच शिल्पा तिच्या खासगी आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत आली. 47 वर्षीय शिल्पा अजूनही अविवाहित आहे. तिने नुकताच लग्नाचा निर्णय घेतल्याची जोरदार चर्चा आहे. ज्या अभिनेत्यासोबत शिल्पाच्या लग्नाची चर्चा आहे, त्याचं हे तिसरं लग्न असणार आहे. ‘पवित्र रिश्ता’, ‘बातें कुछ अनकहीं सी’, ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ यांसारख्या मालिकांमध्ये त्याने काम केलंय.

याआधी शिल्पा रोमित राजशी लग्न करणार होता. या दोघांचा साखरपुडाही झाला होता. इतकंच काय तर लग्नपत्रिकाही छापल्या गेल्या होत्या. मात्र ऐनवेळी काही कारणास्तव दोघांनी लग्न मोडलं होतं. त्यानंतर शिल्पाने कधीच लग्नाचा विचार केला नाही. सध्या तिचं नाव अभिनेता करणवीर मेहराशी जोडलं जातंय. करणवीरचं हे तिसरं लग्न असून याआधी त्याची दोनही लग्न अयशस्वी ठरली आहेत. ‘खतरों के खिलाडी’ या शोमध्ये शिल्पा आणि करणवीर सोबतच स्पर्धक म्हणून सहभागी झाले आहेत. एका स्टंटदरम्यान करणवीरने म्हटलंय की, “जर हा स्टंट आम्ही जिंकला तर आम्ही दोघं लग्न करू.” करणवीरने शोदरम्यान शिल्पाला ‘आय लव्ह यू’ असंही म्हटलं होतं. नंतर करणवीरने जेव्हा तिला लग्नासाठी विचारलं, तेव्हा शिल्पा त्याला म्हणाली, “नाही, गडबड होईल, कोऑर्डिनेशनमध्ये.” त्यावर करण तिला म्हणतो, “नाही होणार गडबड. आपण दोघं मिळून करुया.” शिल्पा आणि करण हे आधीपासूनच एकमेकांचे चांगले मित्रही आहेत.

करणवीरने 2009 मध्ये बालमैत्रीण देविकाशी लग्न केलं होतं. मात्र लग्नाच्या नऊ वर्षांनंतर 2018 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. यानंतर त्याने 2021 मध्ये गर्लफ्रेंड निधी सेठशी लग्न केलं होतं. मात्र लग्नानंतर काही महिन्यांतच त्यांच्यात मतभेद निर्माण झाले. अखेर लग्नाच्या दोन वर्षांत करणवीरने निधीला घटस्फोट दिला. याविषयी बोलताना निधीने एका मुलाखतीत स्पष्ट केलं होतं, “माझ्या मते कोणत्याही नात्यात दररोज भांडणं होत असतील तर ते सहनशक्तीपलीकडे जातं. अशा परिस्थितीत कोणीच एकत्र राहू शकत नाही. मानसिक शांती, एकमेकांसाठी आदर, प्रामाणिकपणा आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असणं.. या गोष्टी कोणत्याही वैवाहिक आयुष्यात गरजेच्या असतात. कोणत्याही नात्यातील विषारीपणा सहन करता कामा नये.”

Follow Us
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार.
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण.
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक...
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक....
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल.
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण.
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?.
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी.
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी.
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?.
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण.