AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

40 वर्षांनंतरही मनाला चटका लावणारं गाणं, गायिकेला येत नव्हते लिहिता-वाचता, गाण्याचे पाकिस्तानमध्ये होते चाहते

43 वर्षांपूर्वीचं दर्दभरी गाणं, ज्यामधील गायिकेला येत नव्हते लिहिता-वाचता. आवाज असा की तिला मिळाली'वाळवंटाची कोकिळा' म्हणून ओळख.

40 वर्षांनंतरही मनाला चटका लावणारं गाणं, गायिकेला येत नव्हते लिहिता-वाचता, गाण्याचे पाकिस्तानमध्ये होते चाहते
Image Credit source: Social media
| Updated on: Jun 27, 2026 | 4:52 PM
Share

हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक अशी गाणी आहेत, जी काळाच्या ओघातही प्रेक्षकांच्या मनातून पुसली जात नाहीत. अपूर्ण प्रेम आणि आठवणींनी भरलेल्या गाण्यांचा विचार केला तर काही गाणी आजही तितकीच ताजी वाटतात. 1983 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हिरो’ या चित्रपटातील ‘लंबी जुदाई’ हे असेच एक अजरामर गाणं आहे. चार दशकांहून अधिक काळ लोटल्यानंतरही हे गाणे अग्रस्थानी आहे. मात्र या गाण्याच्या निर्मितीमागे अनेक रंजक आणि फारशा परिचित नसलेल्या आठवणी दडल्या आहेत.

‘लंबी जुदाई’ या गाण्याला आपल्या भावपूर्ण आवाजाने अमर करणाऱ्या प्रसिद्ध लोकगायिका रेशमा यांना हे गाणे गाण्याची संधी कशी मिळाली, याची कहाणीही तितकीच खास आहे. सांगितले जाते की, दिग्दर्शक सुभाष घई यांनी प्रथमच रेशमा यांचा आवाज राज कपूर यांच्या एका पार्टीत ऐकला होता. त्यांच्या आवाजातील वेदना, लोकसंगीताचा गोडवा आणि गायकीतील नैसर्गिकता पाहून ते इतके प्रभावित झाले की, त्यांनी त्याचवेळी आपल्या आगामी ‘हिरो’ चित्रपटासाठी त्यांना गाण्याची ऑफर दिली.

सुरुवातीला रेशमा यांनी दिला होता नकार

मात्र सुरुवातीला रेशमा या ऑफरसाठी तयार नव्हत्या. त्या प्रामुख्याने दर्गे, सूफी मेळावे आणि लोकसंगीताच्या कार्यक्रमांमध्ये गायन करत असत. स्टुडिओमध्ये बंद वातावरणात गाणे रेकॉर्ड करण्याची पद्धत त्यांच्यासाठी पूर्णपणे नवी होती. त्यामुळे त्यांनी सुरुवातीला संकोच व्यक्त केला.

यानंतर सुभाष घई यांनी त्यांना विश्वास दिला की, त्यांच्या नैसर्गिक आवाजात किंवा गायनशैलीत कोणताही कृत्रिम बदल केला जाणार नाही. हा विश्वास मिळाल्यानंतर रेशमा यांनी हे गाणं रेकॉर्ड केले आणि पुढे ते हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सर्वाधिक लोकप्रिय गाण्यांपैकी एक ठरले.

‘हिरो’च्या यशात गाण्याचाही मोठा वाटा

‘हिरो’ चित्रपटात जॅकी श्रॉफ आणि मीनाक्षी शेषाद्री यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. चित्रपटाला मिळालेल्या प्रचंड यशामध्ये ‘लंबी जुदाई’ या गाण्याचाही मोठा वाटा असल्याचे मानले जाते. या गाण्याला संगीतकार जोडी लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी सुरेल संगीत दिले तर गीतकार आनंद बक्षी यांनी हृदयस्पर्शी शब्दांची रचना केली.

‘वाळवंटाची कोकिळा’ म्हणून मिळाली ओळख

रेशमा यांचा जन्म राजस्थानातील बीकानेर येथे एका बंजारा कुटुंबात झाला होता. त्यांच्या आवाजात लोकसंगीताची सहजता, वेदना आणि आत्मीयता यांचा अप्रतिम संगम होता. त्यामुळे ‘लंबी जुदाई’ या गाण्यानंतर त्यांना ‘वाळवंटाची कोकिळा’ अशी ओळख मिळाली. त्यांच्या गायकीने भारतासह पाकिस्तानमध्येही लाखो चाहत्यांची मने जिंकली.

Follow Us
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेम
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेमकं काय म्हणाले?
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच पोलिसांना...
तर नोकरी सोडून राजकारणात या, विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर
तर नोकरी सोडून राजकारणात या, IPS विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर राज ठाकरेंचा थेट हल्लबोल!
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय देशमुखांनी थेट हे काय सांगितलं?
ठरलं तर मग! पुढचे 3 वर्षे हाच कार्यक्रम; शिवसेनेत... उद्धव ठाकरेंनी
ठरलं तर मग! पुढचे 3 वर्षे हाच कार्यक्रम; शिवसेनेत... उद्धव ठाकरेंनी सांगितला मास्टर प्लॅन
शिंदेंनी शब्द पाळला! आणखी एका खासदाराला दिलं सर्वात मोठं गिफ्ट? तब्बल
शिंदेंनी शब्द पाळला! आणखी एका खासदाराला दिलं सर्वात मोठं गिफ्ट? तब्बल...
पुन्हा पेपरफुटी! TET परीक्षेचा पेपर फुटला, पुन्हा परिक्षा कधी होणार?
पुन्हा पेपरफुटी! TET परीक्षेचा पेपर फुटला, पुन्हा परिक्षा कधी होणार?
इकडे उद्धव ठाकरेंचा दौरा अन् तिकडे एकनाथ शिंदेंचा मोठा डाव, काय घडलं?
इकडे उद्धव ठाकरेंचा दौरा अन् तिकडे एकनाथ शिंदेंचा मोठा डाव, काय घडलं?
लावा रे तो ऑडियो... पहिल्याच दौऱ्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली; थेट...
लावा रे तो ऑडियो... पहिल्याच दौऱ्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली; थेट...
मी जनतेची माफी मागणार... उद्धव ठाकरे असं का म्हणाले?
मी जनतेची माफी मागणार... उद्धव ठाकरे असं का म्हणाले?