AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घटस्फोट फक्त कागदाचा तुकडा, आम्ही बऱ्याच वर्षांपूर्वी.. सोहैल खानच्या पूर्व पत्नीने सांगितलं कारण

2022 मध्ये सीमा आणि सोहैल यांनी घटस्फोट घेतला. लग्नाच्या 24 वर्षांनंतर या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. या दोघांना निर्वाण आणि योहान ही दोन मुलं आहेत. गेल्या पाच वर्षांपासून आम्ही दोघं वेगळे राहतोय, असं तिने एका मुलाखतीत स्पष्ट केलं होतं.

घटस्फोट फक्त कागदाचा तुकडा, आम्ही बऱ्याच वर्षांपूर्वी.. सोहैल खानच्या पूर्व पत्नीने सांगितलं कारण
Sohail Khan and Seema SajdehImage Credit source: Instagram
| Updated on: Nov 01, 2023 | 5:00 PM
Share

मुंबई | 1 नोव्हेंबर 2023 : सलमान खानचा भाऊ आणि अभिनेता सोहैल खानचं खासगी आयुष्य गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. गेल्या वर्षी सोहैलने पत्नी सीमा सजदेहला घटस्फोट दिला. लग्नाच्या 24 वर्षांनंतर या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. या दोघांना दोन मुलं आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सीमा तिच्या आयुष्यातील या कठीण काळाविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. पॉडकास्ट मुलाखतीत सीमाला विचारण्यात आलं की घटस्फोटामुळे तुला कोणत्या समस्यांचा सामना करावा लागला? त्यावर ती म्हणाली की, “घटस्फोटानंतर मी माझ्याबद्दल अनेक द्वेषपूर्ण कमेंट्स वाचले आहेत. काहींनी असंही म्हटलं की मी माझ्या फायद्यासाठी खान कुटुंबाचा वापर केला आणि काम पूर्ण झाल्यानंतर सोहैलला सोडून दिलं.”

याविषयी सीना पुढे म्हणाली, “माझ्या वडिलांची अशी मानसिकता होती की आता माझ्या मुलीची काळजी कोण घेणार? आपल्या भारतीय संस्कृतीत घटस्फोटाला एक कलंकच मानलं जातं. आजच्या सोशल मीडियाच्या काळात अनेक कमेंट्स वाचायला मिळतात. मी माझ्या फायद्यासाठी सोहैलचा वापर केला, असं लोक म्हणाले. हे सर्व वाचून मला आश्चर्याचा धक्काच बसला.” घटस्फोटाच्या बऱ्याच आधीपासून सोहैलसोबत राहत नसल्याचंही सीमाने स्पष्ट केलं.

“घटस्फोटाच्या निर्णयासाठी मी त्याला का दोष देऊ? हा आम्हा दोघांचा निर्णय होता. आमचा मुलगा निर्वाण त्यावेळी अशा वयात होता, जेव्हा त्याला हे घडू नये असं वाटलं होतं. पण एक वेळ अशी आली होती की मला माझं लग्न किंवा माझा मुलगा या दोघांपैकी एकाचीच निवड करायची होती. माझा मुलगा अशा मार्गावर जात होता, ज्याची मला खूप भीती होती. एके दिवशी मी सकाळी उठले तेव्हा जाणवलं की मी माझी सर्व ऊर्जा या लग्नाला वाचवण्यासाठी घालवतेय आणि मुलाकडे दुर्लक्ष करतेय. तेव्हा मी माझा निर्णय घेतला आणि विभक्त झाले”, असं सीमा म्हणाली.

सोहैल आणि सीमाचा घटस्फोट तिसऱ्या महिलेमुळे झाल्याची चर्चा होती. मात्र असं काहीच नसल्याचं सीमाने स्पष्ट केलं. “यात काहीच सत्य नाही. मी माझ्या मुलांच्या भवितव्यासाठी हा निर्णय घेतला. घटस्फोटाचा निर्णय माझा होता. सतत होणाऱ्या भांडणांमुळे मी खुश नव्हते. त्याचा मुलांवरही वाईट परिणाम होत होता. घटस्फोट तर फक्त कागदाचा एक तुकडा आहे. पण आम्ही बऱ्याच वर्षांपासून वेगळे राहत होतो. माझ्या मुलाने जेव्हा मला सांगितलं की मी ठीक आहे, तू पुढे जाऊ शकतेस. तेव्हा मी घटस्फोटावर शिक्कामोर्तब केला”, अशा शब्दांत ती व्यक्त झाली.

Follow Us
प्रताप सरनाईकांनंतर आता आणखी एका बड्या मंत्र्याचं 'ऑपरेशन टायगर'बाबत..
प्रताप सरनाईकांनंतर आता आणखी एका बड्या मंत्र्याचं 'ऑपरेशन टायगर'बाबत सुचक विधान, थेट म्हणाले...
नोकर आहात, नोकरांसारखे वागा; भर बैठीकीतच शिंदेंचा आमदार कडाडला...
Video | नोकर आहात, नोकरांसारखे वागा; भर बैठीकीतच शिंदेंचा आमदार कडाडला, असं काय घडलं की...
प्रताप सरनाईकांच्या दाव्यानंतर कैलास पाटलांची मोठी प्रतिक्रिया, थेट...
प्रताप सरनाईकांच्या दाव्यानंतर कैलास पाटलांची मोठी प्रतिक्रिया, थेट... धारशिवमध्ये राजकीय समीकरण पुन्हा बदलणार?
तुटलेल्या खिडक्यांवर उपमुख्यमंत्र्यांचे बॅनर अन्... अभिजीत दीपके आता..
तुटलेल्या खिडक्यांवर उपमुख्यमंत्र्यांचे बॅनर अन्... अभिजीत दीपके आता अगामी मोर्च्यावर
आता ओमराजेंचे निकटवर्तीय... राजकीय हालचाली वाढल्या? ऑपरेशन टायगरबाबत..
आता ओमराजेंचे निकटवर्तीय... राजकीय हालचाली वाढल्या? ऑपरेशन टायगरबाबत बड्या मंत्र्याचं मोठं विधान
पुन्हा ठाकरेंचे आमदार...फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण होणाऱ्या सोहळ्यात
पुन्हा ठाकरेंच्या आमदारांची चर्चा! फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण होणाऱ्या कार्यक्रमात ठाकरेंच्या आमदाराची हजेरी
तुम्ही गुपचूप सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांना भेटून... मोठी खळबळ
तुम्ही गुपचूप सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांना भेटून... शिवसेना निकालाआधीच बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचे पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर...
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचं पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण, अखेर म्हणाले...
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिन...
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिनाच्या भाषणादरम्यान CM नेमकं काय म्हणाले?
पंतप्रधानांचं नागरिकांना मोठं आवाहन! जागतिक स्तरावर निर्यात वाढीसाठी..
पंतप्रधानांचं नागरिकांना मोठं आवाहन! जागतिक स्तरावर निर्यात वाढीसाठी...