AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घटस्फोट फक्त कागदाचा तुकडा, आम्ही बऱ्याच वर्षांपूर्वी.. सोहैल खानच्या पूर्व पत्नीने सांगितलं कारण

2022 मध्ये सीमा आणि सोहैल यांनी घटस्फोट घेतला. लग्नाच्या 24 वर्षांनंतर या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. या दोघांना निर्वाण आणि योहान ही दोन मुलं आहेत. गेल्या पाच वर्षांपासून आम्ही दोघं वेगळे राहतोय, असं तिने एका मुलाखतीत स्पष्ट केलं होतं.

घटस्फोट फक्त कागदाचा तुकडा, आम्ही बऱ्याच वर्षांपूर्वी.. सोहैल खानच्या पूर्व पत्नीने सांगितलं कारण
Sohail Khan and Seema SajdehImage Credit source: Instagram
| Updated on: Nov 01, 2023 | 5:00 PM
Share

मुंबई | 1 नोव्हेंबर 2023 : सलमान खानचा भाऊ आणि अभिनेता सोहैल खानचं खासगी आयुष्य गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. गेल्या वर्षी सोहैलने पत्नी सीमा सजदेहला घटस्फोट दिला. लग्नाच्या 24 वर्षांनंतर या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. या दोघांना दोन मुलं आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सीमा तिच्या आयुष्यातील या कठीण काळाविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. पॉडकास्ट मुलाखतीत सीमाला विचारण्यात आलं की घटस्फोटामुळे तुला कोणत्या समस्यांचा सामना करावा लागला? त्यावर ती म्हणाली की, “घटस्फोटानंतर मी माझ्याबद्दल अनेक द्वेषपूर्ण कमेंट्स वाचले आहेत. काहींनी असंही म्हटलं की मी माझ्या फायद्यासाठी खान कुटुंबाचा वापर केला आणि काम पूर्ण झाल्यानंतर सोहैलला सोडून दिलं.”

याविषयी सीना पुढे म्हणाली, “माझ्या वडिलांची अशी मानसिकता होती की आता माझ्या मुलीची काळजी कोण घेणार? आपल्या भारतीय संस्कृतीत घटस्फोटाला एक कलंकच मानलं जातं. आजच्या सोशल मीडियाच्या काळात अनेक कमेंट्स वाचायला मिळतात. मी माझ्या फायद्यासाठी सोहैलचा वापर केला, असं लोक म्हणाले. हे सर्व वाचून मला आश्चर्याचा धक्काच बसला.” घटस्फोटाच्या बऱ्याच आधीपासून सोहैलसोबत राहत नसल्याचंही सीमाने स्पष्ट केलं.

“घटस्फोटाच्या निर्णयासाठी मी त्याला का दोष देऊ? हा आम्हा दोघांचा निर्णय होता. आमचा मुलगा निर्वाण त्यावेळी अशा वयात होता, जेव्हा त्याला हे घडू नये असं वाटलं होतं. पण एक वेळ अशी आली होती की मला माझं लग्न किंवा माझा मुलगा या दोघांपैकी एकाचीच निवड करायची होती. माझा मुलगा अशा मार्गावर जात होता, ज्याची मला खूप भीती होती. एके दिवशी मी सकाळी उठले तेव्हा जाणवलं की मी माझी सर्व ऊर्जा या लग्नाला वाचवण्यासाठी घालवतेय आणि मुलाकडे दुर्लक्ष करतेय. तेव्हा मी माझा निर्णय घेतला आणि विभक्त झाले”, असं सीमा म्हणाली.

सोहैल आणि सीमाचा घटस्फोट तिसऱ्या महिलेमुळे झाल्याची चर्चा होती. मात्र असं काहीच नसल्याचं सीमाने स्पष्ट केलं. “यात काहीच सत्य नाही. मी माझ्या मुलांच्या भवितव्यासाठी हा निर्णय घेतला. घटस्फोटाचा निर्णय माझा होता. सतत होणाऱ्या भांडणांमुळे मी खुश नव्हते. त्याचा मुलांवरही वाईट परिणाम होत होता. घटस्फोट तर फक्त कागदाचा एक तुकडा आहे. पण आम्ही बऱ्याच वर्षांपासून वेगळे राहत होतो. माझ्या मुलाने जेव्हा मला सांगितलं की मी ठीक आहे, तू पुढे जाऊ शकतेस. तेव्हा मी घटस्फोटावर शिक्कामोर्तब केला”, अशा शब्दांत ती व्यक्त झाली.

प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा.
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.