AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कॅन्सर शरिरात पसरला,जगण्याची शक्यता फक्त 30 टक्के… सोनाली बेंद्रेचा अंगावर शहारा आणणारा अनुभव

अभिनेत्री सोनाली बेंद्रेने तिला जेव्हा कॅन्सरचे निदान झाले होते तेव्हाची परिस्थीती सांगितली आहे. तिची अवस्था पाहून डॉक्टरांनी तिला फक्त 30 टक्केच जिवंत राहण्याची शक्यता दिली होती. तिने या सर्व भयानक परिस्थितीशी कशी लढली याबद्दल तिने सांगितले आहे.

कॅन्सर शरिरात पसरला,जगण्याची शक्यता फक्त 30 टक्के... सोनाली बेंद्रेचा अंगावर शहारा आणणारा अनुभव
Mayuri Sajerao
Mayuri Sajerao | Updated on: Jan 02, 2025 | 7:52 PM
Share

अभिनेत्री सोनाली बेंद्रेने तिच्या अभिनयाने आणि तिच्या सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. आजही ती अनेकांच्या फेव्हरेट लिस्टमध्ये आहे. सोनालीने नुकताच तिचा 50 वा वाढदिवस साजरा केला. सोनालीने तिच्या आयुष्यातील सर्वात वाईट काळ पाहिला तो म्हणजे तिला झालेलं कॅन्सरचे निदान. याबदद्लचा एक भयानक किस्सा तिने सांगितला होता.

काही वर्षांपूर्वी सोनाली बेंद्रेला कर्करोगाचे निदान झालेले. ते दिवस तिच्यासाठी आणि तिच्या कुटुंबासाठी फारच अवघड होते. तिने जेव्हा ही गोष्ट तिच्या चाहत्यांसोबत शेअर केली होती तेव्हा सर्वांनाच धक्का बसला होता.

कॅन्सर संपूर्ण शरीरात पसरला होता 

एका मुलाखतीत सोनाली बेंद्रेने त्यावेळेसची परिस्थीती काय होती याबद्दल सांगितले. ती म्हणाली की, “जेव्हा हे घडले, तेव्हा मी एक रिॲलिटी शो करत होते. आम्ही दर आठवड्याला शूटिंग करत होतो. मला जाणवत होते की माझ्या आत काहीतरी चुकीचं घडतंय. मी जेव्हा डॉक्टरांकडे गेले तेव्हा आम्हाला कळले की मला कॅन्सर झाला आहे. सुरुवातीला मला वाटले की फर्स्ट स्टेज असेल पण चाचण्या केल्या असता मला कळले की तो पूर्णपणे माझ्या शरीरात पसरलाय. ही परिस्थिती पाहून माझे डॉक्टर आणि माझ्या नवऱ्याच्या चेहऱ्यावरचा रंगच उडालेला.”

कॅन्सर झाला हे मान्य होत नव्हतं

2018 मध्ये जेव्हा सोनालीच्या कॅन्सरचे निदान झाले तेव्हा डॉक्टरांनी तिची जगण्याची केवळ 30 टक्केच शक्यता दिली होती. त्यावेळी तिच्यासह तिच्या घरच्यांनाही धक्का बसला होता.

सोनालीने पुढे सांगितले की, “मला कॅन्सर झाला आहे हे मी स्वीकारण्यास नकार दिला. मी घरी जाऊन झोपले, पण जेव्हा मला जाग आली तेव्हा काहीही बदलले नव्हते. माझ्या पतीने ताबडतोब निर्णय घेतला आणि दोन दिवसांतच आम्ही परदेशात गेलो. मी त्याच्याशी भांडत होते कारण माझा मुलगा रणवीर समर कॅम्पसाठी बाहेर गेला होता. मी त्याला म्हणाले होते जरा थांब, मला थोडा वेळ दे. तेव्हा तो म्हणाला की बाकी गोष्टींकडे लक्ष देणं बंद कर, स्वत:कडे लक्ष दे,कारण तुला जीवंत राहायचं आहे”. हे सांगताना सोनाली भावूकही झाली.

डॉक्टरांनी जगण्याची शक्यता 30 % दिली होती

ती पुढे म्हणाली “मी माझी कॅन्सरची लढाई सुरू केली जेव्हा माझी जगण्याची शक्यता 30 टक्केच होती. मी माझ्या डॉक्टरांशी सतत भांडायचे की ते असे कसे करु शकतात. पण नंतर मला कळले की ते फक्त सत्य बोलत होते.” असं म्हणत तिने त्यावेळची तिची मनस्थिती काय होती हे सांगितले.

सोनाली बेंद्रेवर वेळीत आणि योग्य उपचार झाल्यामुळे ती आजारातून बरी झाली आहे. तिने आपल्या कामाला ही सुरुवात केली आहे. तसेच आता जरी ती सिनेमे करत नसली तरी वेगवेगळ्या रिअलिटी शोमधून की प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. आताही तिला प्रेक्षकांचे तेवढेच प्रेम मिळत आहे.

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.