Sonu Nigam | सोनू निगमने घेतली योगी आदित्यनाथांची भेट, राम मंदिर निर्माणासाठी ‘वीट’ भेट देण्याची इच्छा!

बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक सोनू निगम यांनी सोमवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांची भेट घेतली.

Sonu Nigam | सोनू निगमने घेतली योगी आदित्यनाथांची भेट, राम मंदिर निर्माणासाठी ‘वीट’ भेट देण्याची इच्छा!
Follow us
| Updated on: Jan 25, 2021 | 5:05 PM

मुंबई : बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक सोनू निगम यांनी सोमवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांची भेट घेतली. या दोघांची ही खास भेट मुख्यमंत्री निवासस्थानी झाली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोनू निगमच्या भेटी दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाँच केलेले नवे नाणे’ आणि कुंभमेळ्यावर लिहिलेल्या पुस्तकाची प्रत भेट म्हणून भेट दिली. योगी आदित्यनाथ यांच्या ऑफिसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून त्यांची आणि सोनू निगमची काही छायाचित्रे पोस्ट करत याची माहिती दिली गेली आहे (Sonu Nigam Meets UP CM Yogi Adityanath)

अधिकृत ट्विटर हँडलवरून शेअर केलेल्या फोटोंमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, गायक सोनू निगम यांना नाणे आणि पुस्तक भेट म्हणून देताना दिसत आहेत. ही छायाचित्रे शेअर करताना या ट्विटमध्ये लिहिले की, “उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी यांनी पार्श्वगायक सोनू निगम यांची त्यांच्या लखनऊ येथील अधिकृत निवासस्थानी भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सोनू निगम यांना श्री राम जन्मभूमी मंदिरवर आधारित चांदीचे नाणे आणि कॉफी टेबल बुक प्रदान केले.”

योगी आदित्यनाथ यांची विचारसरणी देशासाठी फायदेशीर! मुख्यमंत्री योगी यांची भेट घेतल्यानंतर सोनू निगम यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, ‘मुख्यमंत्री योगी एक गतिशील नेते आणि दूरदर्शी आहेत. त्यांची विचारसरणी देशासाठी फायदेशीर असल्याचे देखील मी मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे. राष्ट्र उभारणीत आपण कसा भाग घेऊ शकतो, हे त्यांनी प्रत्येकाला सांगायला हवे.’(Sonu Nigam Meets UP CM Yogi Adityanath)

यापूर्वी रविवारी पार्श्वगायक सोनू निगम यांनी अयोध्येत जाऊन रामजन्मभूमीवर भगवान राम यांची पूजा केली. त्यांनी रामजन्मभूमीला भेट दिली तेव्हा काँग्रेसचे जेष्ठ नेते संजय निरुपमही त्यांच्यासमवेत अयोध्येत होते. यावेळी सोनू निगम देखील भगवान रामाच्या आरतीमध्ये सहभागी झाला होता. यानंतर सोनू यांनी हनुमान गढी मंदिरालाही भेट दिली. ‘मला बर्‍याच वर्षांपासून अयोध्येत यायचे होते आणि आता अखेर माझी ही इच्छा पूर्ण झाली आहे’, असे सोनू निगम म्हणाले.

राम मंदिर निर्माणासाठी वीट देण्याची इच्छा यासह राम मंदिराच्या बांधकामासाठी आपल्याला देखील वीट भेट करायची आहे, अशी इच्छा सोनू निगम यांनी व्यक्त केली. अयोध्येत रामलला भेट दिल्यानंतर आणि मुख्यमंत्री योगी यांच्याशी भेट घेतल्यानंतर सोनू निगम वाराणसीला काशी विश्वनाथच्या दर्शनासाठी रवाना होणार आहे.

संबंधित बातम्या : 

Shocking | राम गोपाल वर्माचं वादग्रस्त वक्तव्य, दाऊद इब्राहीमचे मानले आभार!

कंगनाचा पुन्हा स्वराशी पंगा, प्रत्युत्तराने फॅन्सचा सोशल मीडियावर दंगा…!

(Sonu Nigam Meets UP CM Yogi Adityanath)

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.