AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शुटिंगच्या सेटवर सतत बाथरुममध्ये का बेशुद्ध व्हायच्या Sridevi? अखेर सत्य समोर आलंच

शुटिंगच्या सेटवर सतत बाथरुममध्ये बेशुद्ध व्हायच्या श्रीदेवी, बाथटबमध्येच घेतला अखेरच्या श्वास... अभिनेत्रीबद्दल मोठ सत्य समोर... आजही श्रीदेवी चाहत्यांमध्ये चर्चेत

शुटिंगच्या सेटवर सतत बाथरुममध्ये का बेशुद्ध  व्हायच्या Sridevi? अखेर सत्य समोर आलंच
| Updated on: Apr 15, 2023 | 1:38 PM
Share

मुंबई : बॉलिवूडमध्ये आजपर्यंत अनेक अभिनेत्रींनी आपल्या घायाळ अदांनी आणि अभिनयाने चाहत्यांच्या मनात राज्य केलं. बॉलिवूडमध्ये नव्या अभिनेत्रींचं पदार्पण झालं आणि जुन्या अभिनेत्री मात्र मागे राहिल्या. पण बॉलिवूडमध्ये अभिनेत्री श्रीदेवी यांचं जे स्थान होतं, ते अद्याप कोणी घेवू शकलेलं नाही. आजही श्रीदेवी यांच्याबद्दल अनेक चर्चा चाहत्यांमध्ये रंगलेल्या असतात. श्रीदेवी यांच्या निधनाला आज अनेक वर्ष उलटून गेली आहेत. पण आजही चाहते आणि अनेक सेलिब्रिटी देखील श्रीदेवी यांना विसरु शकलेले नाहीत. श्रीदेवी अशा एकमेव अभिनेत्री होत्या ज्यांना सुपरस्टार अभिनेत्रीचा दर्जा मिळाला. टॉलिवूड, बॉलिवूड एवढंच नाही तर, हॉलिवूडमध्ये देखील श्रीदेवी यांनी आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात घर केलं.

श्रीदेवी यांच्याबद्दल अनेक गोष्टी आजही चाहत्यांमध्ये चर्चेत असतात. त्यांच्याबद्दल एक गोष्ट फार कमी चाहत्यांना माहिती आहे. तर त्यांची एक गोष्ट आज जाणून घेवू. मिळालेल्या माहितीनुसार, श्रीदेवी सेटवर सतत बेशुद्ध व्हायच्या. यामागे अभिनेत्रीला असलेला एक आजार होता. त्या एका आजारामुळे श्रीदेवी प्रचंड त्रस्त होत्या.

लेखक सत्यार्थ नयाक यांनी त्यांच्या एका पुस्तकात श्रीदेवी यांच्या आजाराचा उल्लेख केला आहे. सत्यार्थ नयाक यांच्या पुस्तकात असलेल्या माहितीनुसार, ‘चालबाज’ सिनेमाचे दिग्दर्शक पंकज पाराशर आणि नागार्जुन यांच्या म्हणण्यानुसार, श्रीदेवी यांना ब्लड प्रेशरचा त्रास होता. ज्यामुळे त्या प्रचंड त्रस्त असायच्या. ब्लड प्रेशरचा त्रास असल्यामुळे शुटिंग सुरु असताना त्या अनेकदा बाथरुममध्ये देखील बेशुद्ध झाल्या होत्या.. असं सांगण्यात येत आहे.

श्रीदेवी यांचं निधन देखील बाथटबमध्ये झालं होतं. २०१८ मध्ये दुबईत लग्नात सहभागी झालेल्या श्रीदेवी यांचं हॉटेलच्या रुममधील बाथरूममध्ये असलेल्या बाथटबमध्ये निधन झालं. Queen Of Hearts यांच्याबद्दल लिहिण्यात आलं आहे. श्रीदेवीचा साधा लूक तमिळ प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता आणि हिंदी प्रेक्षकांना श्रीदेवी यांचा ग्लॅमरस अंदाज आवडला होता.

१९८३ ते १९९३ हा काळ श्रीदेवीच्या कारकिर्दीचा सुवर्ण काळ म्हणून ओळखला जातो. याच काळात श्रीदेवी यशाच्या उच्च शिखरावर पोहोचल्या. श्रीदेवी यांनी त्यांच्या कारकिर्दीत चांदनी, सदमा, हिम्मतवाला, लाडला, चालबाज आणि मिस्टर इंडिया यांसारख्या अनेक एकापेक्षा एक सिनेमे बॉलिवूडला दिले. आजही त्यांचे सिनेमे चाहते तितक्याच उत्सुकतेने पाहतात.

श्रीदेवी यांच्यानंतर त्यांची मोठी मुलगी आणि अभिनेत्री जान्हवी कपूर मोठ्या पडद्यावर राज्य करत आहे. जान्हवीने आतापर्यंत अनेक हिट सिनेमांमध्ये काम केलं आहे. तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. जान्हवी हिच्यानंतर श्रीदेवी यांची लहान मुलगी खुशी कपूर देखील अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. खुशी लवकरच दिग्दर्शक झोया अख्तर दिग्दर्शित ‘The Archies’ प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.