AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

News9 Global Summit: न्यूज 9 च्या मंचावर सुनील शेट्टींकडून प्रसिद्ध अभिनेत्याचे कौतुक, म्हणाले मी घाबरतो…

न्यूज 9 ग्लोबल समिटमध्ये अभिनेते सुनील शेट्टी यांनी विनीत कुमार सिंहच्या अभिनयाचं खूप कौतुक केलं. त्यांनी म्हटलं की विनीतच्या अभिनयाने ते नर्व्हस झाले. विनीतने "छावा" चित्रपटातील कविता समिटमध्ये वाचली, जी सुनील शेट्टींना अतिशय प्रभावित करणारी ठरली.

News9 Global Summit: न्यूज 9 च्या मंचावर सुनील शेट्टींकडून प्रसिद्ध अभिनेत्याचे कौतुक, म्हणाले मी घाबरतो...
sunil Shetty
| Updated on: Jun 20, 2025 | 12:07 PM
Share

टीव्ही 9 नेटवर्कतर्फे दुबईमध्ये ‘न्यूज 9 ग्लोबल समिट’ पार पडत आहे. या न्यूज 9 ग्लोबल समिटमध्ये कोट्यावधी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे अभिनेते सुनील शेट्टी यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी एका अभिनेत्याचं नाव घेतलं, ज्याच्या अभिनयाने सुनील शेट्टी स्वत: नर्व्हस झाले. त्या अभिनेत्याचं नाव म्हणजे विनीत कुमार सिंह. विनीतही या समिटमध्ये सहभागी झाले होते. सुनील शेट्टींनी न्यूज 9 ग्लोबल समिटच्या मंचावरुन त्यांचं जोरदार कौतुक केलं.

मी विनीतचा अभिनय बघून थोडा घाबरलो. त्याची अभिनय शैली पाहून मला डायलॉग बोलायलाही भीती वाटत आहे. इतक्या मोठ्या ओळी कशा लक्षात ठेवता. मला वाटलं की अभिनयही सुरू आहे आणि चित्रपट सुरू आहे. खूपच छान, अशा शब्दात सुनील शेट्टींनी विनीत सिंहचे कौतुक केले.

‘छावा’मधील कविता मंचावर वाचली

विनीत कुमार यांनी ‘छावा’ चित्रपटात कवी कलश यांची भूमिका साकारली होती. या चित्रपटात त्यांची एक लांबलचक कविता म्हटली होती. त्यांचा तो सीन पाहून अनेकांनी त्यांचं खूप कौतुक केलं होतं. जेव्हा विनीत न्यूज 9 ग्लोबल समिटमध्ये पोहोचले, तेव्हा त्यांनी ‘छावा’मधील तीच कविता मंचावर वाचली. सुनील शेट्टी त्याच हॉलमध्ये बसले होते, जिथे हा कार्यक्रम सुरू होता.

जेव्हा सुनील शेट्टी यांचा सेगमेंट सुरू झाला. ते स्टेजवर आले, तेव्हा त्यांनी विनीतचं कौतुक करायला सुरुवात केली. मी जेव्हा विनीतला कविता वाचताना पाहिलं, तेव्हा मला वाटलं की पूर्ण चित्रपटच सुरू आहे. पण ती संपूर्ण कविता त्याला आठवत होती. विनीतला ही कविता कशी आठवते, हे पाहून मी आश्चर्यचकित झालो, असेही सुनील शेट्टी म्हणाले.

छावा चित्रपटाची 800 कोटींहून अधिक कमाई

मी स्टेजवर येण्यापूर्वी यांचं हिंदी आणि संवाद ऐकून नर्व्हस झालो होतो. मी काय बोलणार” असेही सुनील शेट्टींनी म्हटले. ‘छावा’मध्ये विनीतच्या भूमिकेचं खूप कौतुक झालं होतं. हा चित्रपट मराठा सम्राट संभाजी महाराज यांच्यावर आधारित होता. विकी कौशल मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाने जगभरात ८०० कोटींहून अधिक कमाई केली. ‘छावा’नंतर विनीत सनी देओलसोबत ‘जाट’ या चित्रपटातही दिसले. त्या चित्रपटातही लोकांना ते खूप आवडले.

Follow Us
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोपांनी खळबळ!
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत... पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
Mayank Lohar | लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट
Shirdi | साईबाबांच्या नगरीत धक्कादायक खुलासा! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट पेढे...
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णय
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा
स्वार्थासाठी गेले, जनता हिशोब चुकता करणार! नाईकांचा खासदारांना इशारा
Vaibhav Naik | स्वार्थासाठी गेले, आता जनता हिशोब चुकता करणार! वैभव नाईकांचा फुटीर खासदारांना इशारा
विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट
Beed | विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट निर्णय घेतला; लवकरच...
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं!
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं! त्या वादाला आता नवं वळण!
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता बड्या नेत्याचं विधान चर्चेत