Sushant Singh Rajput | ‘केदारनाथ’च्या पुनर्प्रदर्शनावर चाहते नाराज, ‘आणखी किती दिवस सुशांतला विकाल?’ नेटकऱ्यांचा सवाल!

चित्रपटगृहे सुरू झाल्यानंतर काही प्रदर्शित झालेले चित्रपट पुन्हा एकदा प्रदर्शित करण्यात येणार आहेत.

Sushant Singh Rajput | ‘केदारनाथ’च्या पुनर्प्रदर्शनावर चाहते नाराज, ‘आणखी किती दिवस सुशांतला विकाल?’ नेटकऱ्यांचा सवाल!
Follow us
| Updated on: Oct 15, 2020 | 11:42 AM

मुंबई : सध्या देशभरात ‘अनलॉक’चा 5वा टप्पा सुरू झाला आहे. या अंतर्गत 15 ऑक्टोबरपासून चित्रपटगृह सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. चित्रपटगृहे सुरू झाल्यानंतर काही प्रदर्शित झालेले चित्रपट पुन्हा एकदा प्रदर्शित करण्यात येणार आहेत. यामध्ये दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या ‘केदारनाथ’ (Sushant Singh Rajput Kedarnath) या चित्रपटाचादेखील समावेश करण्यात आला आहे. मात्र, या निर्णयावर त्याच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर त्याचा चित्रपट पुन्हा प्रदर्शित करून नफा मिळवण्याच्या प्रयत्न सुरू झाल्याचे म्हणत, नेटकऱ्यांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. (Sushant Singh Rajput Fans Angry on Kedarnath Re-release decision)

चित्रपट समीक्षक तराण आदर्श यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून यासंदर्भात माहिती दिली आहे. चित्रपटगृह पुन्हा उघडल्यानंतर काही जुने चित्रपट पुन्हा प्रदर्शित केले जातील, असे ट्विट करत त्यांनी सांगितले. या चित्रपटांमध्ये सुशांतच्या ‘केदारनाथ’ चित्रपटाचा देखील समावेश करण्यात आला आहे. ‘केदारनाथ’सह ‘तान्हाजी’, ‘शुभमंगल ज्यादा सावधान’, ‘मलंग’ आणि ‘थप्पड’ हे चित्रपट पुन्हा एकदा प्रदर्शित केले जाणार आहेत.

चाहत्यांचा पारा चढला!

तराण आदर्श यांच्या ट्विटवर सुशांतच्या चाहत्यांनी कमेंट करत आपला राग व्यक्त केला आहे. त्यांच्या ट्विटला  उत्तर देताना एका वापरकर्त्याने लिहिले की, सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या निधनानंतर या लोभी निर्मात्यांना एसएसआरच्या नावावर भरपूर पैसे कमवायचे आहेत. नफा मिळवण्याचा हा एक चांगला मार्ग आहे, परंतु प्रेक्षक आता इतके मूर्ख नाहीत. ‘#Kedarnath #ShameOnBollywood’ लिहीत आपला संताप व्यक्त केला आहे. (Sushant Singh Rajput Fans Angry on Kedarnath Re-release decision)

दुसर्‍या एका वापरकर्त्याने लिहिले, ‘जेव्हा सुशांत जिवंत होता तेव्हा त्याच्या ‘केदारनाथ’ चित्रपटाला स्क्रीन मिळत नव्हत्या आणि आता तो नसताना त्याचा चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्यात काहीच अर्थ नाही? सुशांतला याचा फायदा होईल का? बॉलिवूडने त्याच्यासोबत खूप वाईट केले आहे.’

याचबरोबर ‘आणखी किती दिवस सुशांतला विकाल?’, असा प्रश्न करत नेटकऱ्यांनी या पुनर्प्रदर्शनाला आपला विरोध दर्शवला आहे.

संबंधित बातम्या :

Sushant Singh Rajput | सीबीआयवरही विश्वास नाही का?, संजय राऊतांचा सुशांतच्या वकिलांना टोला

सुशांतप्रकरण भाजपकडून हाइप; अमेरिकेच्या विद्यापीठाचा दावा: अनिल देशमुख

(Sushant Singh Rajput Fans Angry on Kedarnath Re-release decision)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.