AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aai Kuthe Kay Karte | मालिकेत पुन्हा एकदा अनघाची एंट्री, अंकिताचा बनाव देशमुख कुटुंबासमोर उघड होणार!

अंकिताने खोटेपणा करून केवळ हा बनाव केल्याची शक्यता घरातील प्रत्येक व्यक्तीच्या मनात येत आहे. तर, आता यशने देखील अभिला अंकिताने हे केवळ नाटक केले असल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे अभिने देखील अंकिताची कानउघडणी करत, जर या सगळ्या गोष्टी खऱ्या निघाल्या तर, त्याक्षणी घरातून बाहेर निघून जा, असे बाजावले आहे.

Aai Kuthe Kay Karte | मालिकेत पुन्हा एकदा अनघाची एंट्री, अंकिताचा बनाव देशमुख कुटुंबासमोर उघड होणार!
आई कुठे काय करते
| Edited By: | Updated on: Jul 02, 2021 | 4:01 PM
Share

मुंबई : छोट्या पडद्यावरची प्रेक्षकांची आवडती मालिका ‘आई कुठे काय करते‘ (Aai Kuthe Kay Karte) सध्या उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. अभिच्या साखरपुड्याच्या निमित्ताने देशमुख कुटुंब गावातील घरी राहायला गेले होते. आधी देशमुखांच्या घरात संजना येऊन धडकली असताना, आता अंकिताच्या रुपाने नवीन वादळ धडकलं आहे. अभि-अनघाचं लग्न मोडत अंकिताने अभिषेकला आपल्याशी लग्न करायला भाग पाडलं आहे. या दरम्यान गायब झालेली अनघा पुन्हा एकदा मालिकेत दिसली आहे (Aai Kuthe Kay Karte serial latest update Anagha re enter in serial).

अभिषेक आणि अनघाच्या साखरपुड्याची बातमी ऐकून संतापलेल्या अंकिताने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, साखरपुडा सुरु असतानाच ही घटना अंकिताच्या आईने अभिषेकला सांगितल्यामुले तो साखरपुडा सोडून थेट अंकिताकडे पोहोचला होता. तर, अभिची वाट बघत असलेल्या अनघाला मात्र तो थेट लग्नच करून आल्याने धक्का बसला. मात्र, अंकिता आत्महत्या करत असल्याने मला नाईलाजास्तव लग्न करावे लागल्याचे म्हटले होते.

अंकिताचा बनाव उघड होणार?

मात्र, आता अंकिताने खोटेपणा करून केवळ हा बनाव केल्याची शक्यता घरातील प्रत्येक व्यक्तीच्या मनात येत आहे. तर, आता यशने देखील अभिला अंकिताने हे केवळ नाटक केले असल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे अभिने देखील अंकिताची कानउघडणी करत, जर या सगळ्या गोष्टी खऱ्या निघाल्या तर, त्याक्षणी घरातून बाहेर निघून जा, असे बाजावले आहे. सध्या यश, अभि आणि शेखर मिळून या प्रकरणाचा मागोवा घेत आहेत.

दरम्यान अंकिता खोटंबोलत असून, ती स्वतः आईसोबत चालत हॉस्पिटलमध्ये गेल्याचे शेखरला कळले आहे. तर, त्याने देखील तातडीने या गोष्टी अरुंधती, यश आणि अभि यांच्या कानावर घातल्या आहेत. दुसरीकडे अंकिताने आपलं बिंग फुटू नये म्हणून सासऱ्याला अर्थात अनिरुद्धला नोकरीची धमकी दिली आहे.

अनघाची एंट्री

अभिशी होणारा साखरपुडा मोडल्याने अनघा तडक गावाहून मुंबईला निघून आली होती. यानंतर ती मालिकेत पुन्हा दिसली नव्हती. यामुळे ती परतणार की नाही याकडे सगळ्याच प्रेक्षकांच्या नजर लागल्या होत्या, अखेर नुकत्याच प्रदर्शित भागात अनघाची एंट्री झाली आहे. अरुंधती अनघाला फोन करून बागेत भेटण्यासाठी बोलावते आणि तिची हात जोडून माफी मागते.

अंकिताचं भविष्य काय?

एकीकडे मालिकेत अनघाची वापसी झाली आहे, तर दुसरीकडे अंकिताचा खोटेपणा देशमुख कुटुंबासमोर उघड होणार आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा अंकिता अभिच्या आयुष्यातून निघून जाऊन अनघा परत येणार का? अर्थात पुढे काय घडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

(Aai Kuthe Kay Karte serial latest update Anagha re enter in serial)

हेही वाचा :

एक दिवस आधीच ढासळली होती राज कौशल यांची तब्येत, पत्नी मंदिराला म्हणाले ‘मला हार्टअटॅक येतोय’

Heennaa Panchaal | ‘ती निर्दोष असल्याने, कोणाचीही भीती नाही’, ड्रग्ज प्रकरणी अटकेत असलेल्या हीना पांचाळला बहिणीचा पाठींबा

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.