AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत अनपेक्षित वळण; एजे लीलाला घराबाहेर काढणार?

Navari Mile Hitlerla Serial Update : झी मराठीवरील 'नवरी मिळे हिटलरला' मालिका आता नव्या वळणावर येऊन ठेेपली आहे. या मालिकेत आता एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. एजे लीलाला घराबाहेर काढणार का? एजे सुनांचं ऐकणार की मनाचं? यासाठी वाचा सविस्तर बातमी...

'नवरी मिळे हिटलरला' मालिकेत अनपेक्षित वळण; एजे लीलाला घराबाहेर काढणार?
'नवरी मिळे हिटलरला' मालिकाImage Credit source: Instagram
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Nov 28, 2024 | 3:14 PM
Share

काही मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करतात. या मालिकांमधील पात्र प्रेक्षकांना आपल्या घरातील वाटायला लागतं. अशी एक मालिका म्हणजे झी मराठीवरील ‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. या मालिकेत काय घडतं? काय बिघडतं? याकडे प्रेक्षकांचं लक्ष असतं. आता या मालिकेत अनपेक्षित वळण आलं आहे. लीलाच्या घर चालवण्याचा अंदाज पाहून एजे प्रभावित होणार आहे. लीलाच्या हातात जहागीरदारांच्या घराच्या किल्ल्या देण्यात आल्या आहेत. आता दुर्गाचा प्रतिक्रिया काय असेल? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेला नवं वळण

‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत लीला आणि रेवतीचा झालेल्या अपघाताने खूप गोष्टींचा उलगडा झाला आहे. लीला ठरवते की यश सापडल्याशिवाय ती घरात परत येणार नाही. एजे आणि लीला एकत्र येऊन यशचा शोध घेतायत, पण आता दुर्गा त्याला विरोध करते. दुर्गा, लीलावर यशच्या आयुष्याशी खेळ केल्याचा आरोप करते. लीला इथे पाहिली तर मी हे घर सोडून जाईन, असं ती ठामपणे सांगते. त्यामुळे आता एजे लीलाला घराबाहेर काढणार? की सुनांना घराबाहेर काढणार? हे पाहावं लागणार आहे.

एजेने दिलेला सल्ला लीला ऐकणार का?

एजे आणि सरोजिनी सोडून सगळेजण दुर्गाच्या बाजूने आहेत. शेवटी, लीला घर सोडून जाते आणि पुन्हा एजे आणि लीलामध्ये दुरावा निर्माण होतो. मात्र, विश्वरूपच्या मदतीने ते दोघं पुन्हा एकत्र येतात. याच दरम्यान किशोर आणि विक्रांत एका योजनेवर काम करतायत ज्यावर त्यांचे मतभेद होतात. एजे लीलाला त्याच्या रेस्टॉरंट पुन्हा जॉईन करण्याचा सल्ला देतो. लीलाला रेस्टॉरंटमधील घोटाळ्याचा संशय आलाय.

प्रमोद आणि विराज हे त्या घोटाळ्याचे मुख्य चेहरे आहेत. पण लीला त्यांना निर्दोष मानते. प्रमोद आणि विराज तिच्या या विश्वासाने प्रभावित होऊन लीलाला पुन्हा घरी आणण्याची मागणी करतात. लीला पुन्हा घरी परातल्याच कळताच, आपलं अस्तित्व घरच्या लोकांना कळावं म्हणून दुर्गा घराबाहेर पडते. सरोजिनी घराच्या किल्ल्या लीलाच्या हातात देते, ज्यामुळे दुर्गाचा जळफळाट होतोय. लीला तिच्या मध्यमवर्गीय कुटुंबाप्रमाणे घर चालवते, ज्यामुळे एजे प्रभावित होतो. पण सुना मात्र तिच्यावर चिडल्यात. त्यामुळे आता एजे काय निर्णय घेणार? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.