AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ मालिकेने पार केला 1000 भागांचा टप्पा

कलर्स मराठी (Colors Marathi) वाहिनीवरील 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं' (Balumama Chya Navan Chang Bhala) ही मालिका गेल्या तीन वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी मालिकेवर भरभरून प्रेम केलं आणि त्यामुळेच मालिकेने तब्बल १००० भागांचा पल्ला यशस्वीरित्या गाठला.

'बाळूमामाच्या नावानं चांगभलं' मालिकेने पार केला 1000 भागांचा टप्पा
Balumama Chya Navan Chang Bhala Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Apr 15, 2022 | 9:27 AM
Share

कलर्स मराठी (Colors Marathi) वाहिनीवरील ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ (Balumama Chya Navan Chang Bhala) ही मालिका गेल्या तीन वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी मालिकेवर भरभरून प्रेम केलं आणि त्यामुळेच मालिकेने तब्बल १००० भागांचा पल्ला यशस्वीरित्या गाठला. याचनिमित्ताने मालिकेच्या सेटवर थोड्या वेगळ्या प्रकारे सेलिब्रेशन करण्यात आलं. कांदिवली इथल्या we will we can foundation या NGO च्या 70 मुलांनी सेटला भेट दिली आणि या मुलांसोबत मालिकेच्या टीमने संवाद साधला. आपल्या आवडत्या कलाकाराला समोर बघून त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. टाळ्यांच्या कडकडाटात त्यांनी (Sumit Pusavale) सुमित पुसावळे (बाळूमामा) आणि संतोष अयाचित यांचं स्वागत केलं.

पहिल्या भागापासून ते आतापर्यंत लोकप्रियतेच्या शिखरावर राहणं सोप नाही. यामागे संपूर्ण टीम म्हणजेच मालिकेतील कलाकार, तंत्रज्ञ, मंडळी यांचा मोलाचा वाटा आहे. या खास प्रसंगी भेटीस आलेल्या मुलांनी त्यांच्या मनातील प्रश्न विचारले. तसेच सुमितनेदेखील त्याचा अविस्मरणीय क्षण सांगितला. सुंदरा म्हणजेच बाळूमामांची आई आणि बाळूमामा यांची मालिकेतील शेवटची भेट ज्यामध्ये बाळूमामा सांगतात आता आपली भेट वैकुंठात तो सीन कधीच विसरणार नाही असं त्याने सांगितलं. असे अजून काही किस्से सांगत ही गप्पांची मैफल रंगत गेली.

इन्स्टा पोस्ट-

जेव्हा बाळूमामा या व्यक्तिरेखेसाठी निवडला गेलो हे मला कळालं तेव्हा आईला ही आनंदाची बातमी सांगताना मला अश्रू अनावर झाले असंदेखील त्याने यावेळेस सांगितलं. यावेळी एका चिमुकलिने सुमितला पुष्प देऊन बाळुमामाच्या नावानं चांगभलं असं म्हटलं तेव्हा सगळ्यांनाच कौतुक वाटलं.

हेही वाचा:

Chirag Patil: सेटवरच्या जेवणाविषयी चिरागने लढवली शक्कल; पाच दिवसांत बदलल्या क्रू मेंबर्सच्या सवयी

Ranbir Alia Wedding: हे असं लग्न लावणं चेष्टा नाय, मंडळी! धाडस लागतं.. धाडस

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.