AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुनिशा शर्माच्या आत्महत्येनंतर अली बाबा: दास्तान-ए-काबुल मालिकेमधून शीजान खान याची सुट्टी

पोलिसांच्या चाैकशीमध्ये शीजान काही धक्कादायक खुलासे करत असल्याचे सांगितले जात आहे.

तुनिशा शर्माच्या आत्महत्येनंतर अली बाबा: दास्तान-ए-काबुल मालिकेमधून शीजान खान याची सुट्टी
| Updated on: Dec 28, 2022 | 3:30 PM
Share

मुंबई : अली बाबा: दास्तान-ए-काबुल या मालिकेमध्ये मुख्य भूमिकेत असलेली टीव्ही अभिनेत्री तुनिशा शर्मा हिने मालिकेच्या सेटवरच आत्महत्या करत जीवनयात्रा संपवली. तुनिशाच्या आत्महत्येनंतर अनेक मोठे खुलासे झाले. याच मालिकेच मुख्य भूमिकेत असलेल्या शीजान खान याच्यावर तुनिशाच्या आईने अत्यंत गंभीर आरोप केले. शीजान खान हा सध्या कोठडीमध्ये असून पोलिस याची चाैकशी करत आहेत. पोलिसांच्या चाैकशीमध्ये शीजान काही धक्कादायक खुलासे करत असल्याचे सांगितले जात आहे. तुनिशा शर्माच्या निधनानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.

दास्तान-ए-काबुल या मालिकेमध्ये तुनिशा शर्मा आणि शीजान खान हे दोघेही मुख्य भूमिकेत होते. तुनिशा हिने आत्महत्या केली आणि शीजान खान हा सध्या कोठडीमध्ये आहे. यामुळे मालिकेचे नेमके पुढे काय होणार याबद्दल महत्वाची अपडेट मिळालीये.

मालिकेचे सध्या जितके भाग तयार आहेत, ते प्रसारित केले जाणार आहेत. तुनिशा ही दास्तान-ए-काबुल या मालिकेमध्ये शहजादीच्या भूमिकेत होती तर शीजान खान हा अली बाबाच्या भूमिकेत होता. दोन्ही मुख्य कलाकार असल्याने लगेचच नवे चेहरे हे मालिकेसाठी शोधणे शक्य नसल्याने मालिका काही दिवस ऑफ एअर होणार आहे.

दास्तान-ए-काबुल मालिकेचा दुसरा भाग थेट प्रेक्षकांच्या भेटीला येईल. म्हणजेच आता तुनिशासोबतच शीजान देखील यानंतर परत मालिकेमध्ये दिसणार नसल्याचे स्पष्ट होत आहे. दास्तान-ए-काबुल ही मालिका अत्यंत बिग बजेटची असल्याचे सांगितले जात आहे.

तुनिशा शर्मा आणि शीजान खान हे दोघे रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, 15 दिवसांपूर्वी यांचे ब्रेकअप झाल्याने तुनिशा ही तणावामध्ये होती आणि यामुळेच तिने आत्महत्या केल्याचा आरोप आहे. तुनिशाच्या आत्महत्येनंतर शीजानवर अनेक आरोप करण्यात आले आहेत.

दास्तान-ए-काबुल या मालिकेमधून शीजान खानची कायमच सुट्टी होणार असल्याचे आता जवळपास नक्कीच आहे. काल मुंबईमध्ये तुनिशा शर्मा हिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आता पोलिस चाैकशीमधून नेमके काय पुढे येते हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.