AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मधील या महत्वाच्या कलाकाराने मालिकेतून घेतला निरोप

आता शैलेश लोढा यांच्यानंतर मालिकेमध्ये अत्यंत महत्वाची भूमिका साकारणारा कलाकार मालिकेमधून बाहेर पडलाय.

'तारक मेहता का उल्टा चश्मा'मधील या महत्वाच्या कलाकाराने मालिकेतून घेतला निरोप
| Updated on: Dec 06, 2022 | 8:18 PM
Share

मुंबई : तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांचे जबरदस्त असे मनोरंजन करते आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मालिकेमधील अनेक कलाकार हे मालिकेला कायमचा अलविदा करून जात आहेत. आता शैलेश लोढा यांच्यानंतर मालिकेमध्ये अत्यंत महत्वाची भूमिका साकारणारा कलाकार मालिकेमधून बाहेर पडलाय. दया बेन अर्थात दिशा हिची गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षक सातत्याने वाट पाहात आहेत. मात्र, दया बेन मालिकेमध्ये येण्याच्या अगोदरच टप्पूने मालिकेला रामराम ठोकलाय.

गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चा होती की, टप्पू अर्थात राज अनादकट याने मालिका सोडली आहे. परंतू या सर्व अफवा असल्याचे सांगितले जात होते. आता फायनली राज अनादकट याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून चाहत्यांसोबत महत्वाची माहिती शेअर केलीये.

राज याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत जाहिर केले की, तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेसोबत असलेला त्याचा कॉन्ट्रॅक्ट हा संपला असून तो यापुढे तारक मेहतामध्ये दिसणार नाहीये.

राज याने पोस्टमध्ये म्हटले आहे की, तारक मेहतामध्ये मालिकेमध्ये काम करत असताना मला अनेक मित्र भेटले आणि अनेक चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या. हा काळ माझ्या करिअरमध्ये सर्वात बेस्ट होता.

मी सर्व लोकांना धन्यवाद देतो की, या माझ्या प्रवासामध्ये त्यांनी मला सपोर्ट केला. तारक मेहताची पुर्ण टीम, फॅमिली, माझे मित्र यांनी मला कायम सपोर्ट केला. तुम्ही सर्वांनी मला टप्पूच्या भूमिकेमध्ये स्विकारले आणि प्रेम दिले, त्याबद्दल धन्यवाद…

पुढे राज याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, खरोखरच तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळेच मला हे सर्व करण्याची हिम्मत मिळाली. तारक मेहताच्या संपूर्ण टीमला पुढच्या प्रवासासाठी मी शुभेच्छा देतो, असेही राज याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

Follow Us
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू.
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.