AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उमेश-मुक्ताची ‘अजूनही बरसात आहे’ मालिका लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप

'ही' नवी मालिका घेणार 'अजूनही बरसात आहे'ची (Ajunahi Barsaat Aahe) जागा

उमेश-मुक्ताची 'अजूनही बरसात आहे' मालिका लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप
Ajunahi Barsaat Aahe
| Edited By: | Updated on: Feb 22, 2022 | 1:00 PM
Share

मराठीतील लोकप्रिय कलाकार उमेश कामत (Umesh Kamat) आणि मुक्ता बर्वे (Mukta Barve) हे सोनी मराठी वाहिनीवरील ‘अजूनही बरसात आहे’ (Ajunahi Barsaat Aahe) या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. यामध्ये मुक्ता ही मीरा तर उमेश हा आदिराजची भूमिका साकारत आहे. १२ जुलै २०२१ रोजी ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. वर्षभराच्या आतच ही मालिका प्रेक्षकांच्या निरोप घेणार आहे. या मालिकेमुळे उमेश आणि मुक्ता ही प्रेक्षकांची आवडती जोडी बनली. या जोडीमुळेच मालिकेला सुरुवातीला चांगला प्रतिसाद मिळाला. जवळपास सात महिन्यांपासून ही मालिका प्रसारित होत असून कथानकात अनेक वळणं पहायला मिळाली. मीरा-आदिराजचा भूतकाळ, त्यांचं ब्रेकअप, त्यानंतर पॅचअप, लग्न, लग्नानंतरचं आयुष्य या घडामोडींनी प्रेक्षकांना टीव्ही स्क्रीनवर खिळवून ठेवलं. आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेण्यास सज्ज झाली आहे.

या मालिकेच्या निमित्ताने बऱ्याच वर्षांनी मुक्ता आणि उमेश छोट्या पडद्यावर परत आले. याआधी त्यांनी एका चित्रपटात काम केलं होतं. त्यानंतर तब्बल आठ वर्षांनी दोघांनी एकत्र काम केलं. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, १३ मार्च २०२२ रोजी या मालिकेचा शेवटचा एपिसोड प्रसारित होणार आहे. ‘अजूनही बरसात आहे’ या मालिकेची जागा ‘सुंदर आमचे घर’ ही नवी मालिका घेणार आहे. १४ मार्चपासून त्याच वेळेत ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Mukta Barve (@muktabarve)

‘सुंदर आमचे घर’ या मालिकेत सासू-सुनेची अनोखी कथा दाखवण्यात येणार आहे. यामध्ये उषा नाडकर्णी, सुकन्या मोने आणि संचिता कुलकर्णी यांच्या मुख्य भूमिका आहेत. संचिताने याआधी ‘बंध रेशमाचे’ आणि ‘प्रीत परी तुझ्यावरी’ या मालिकांमध्ये काम केलं आहे. तर सुकन्या मोने यांनी काही दिवसांपूर्वीच ‘शुभमंगल ऑनलाइन’ या मालिकेत काम केलं.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.