Love Story | ‘फॅमिली मॅन’ मनोज बाजपेयीने ‘या’ अभिनेत्रीशी रचला दुसरा विवाह, वाचा या प्रेमकथाबद्दल…

बॉलिवूड अभिनेता मनोज बाजपेयी (Manoj Bajpayee) यांच्या वैयक्तिक जीवनाची फारशी चर्चा होत नाही. अभिनेता नेहमीच त्याच्या कामामुळे अर्थात अभिनयामुळे चर्चेत असतो. पण आज आम्ही तुम्हाला मनोजच्या वैयक्तिक जीवनाची ओळख करून देणार आहोत.

Love Story | ‘फॅमिली मॅन’ मनोज बाजपेयीने ‘या’ अभिनेत्रीशी रचला दुसरा विवाह, वाचा या प्रेमकथाबद्दल...
मनोज बाजपेयी
Follow us
| Updated on: May 28, 2021 | 8:15 AM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता मनोज बाजपेयी (Manoj Bajpayee) यांच्या वैयक्तिक जीवनाची फारशी चर्चा होत नाही. अभिनेता नेहमीच त्याच्या कामामुळे अर्थात अभिनयामुळे चर्चेत असतो. पण आज आम्ही तुम्हाला मनोजच्या वैयक्तिक जीवनाची ओळख करून देणार आहोत. मनोज बाजपेयी आज बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध स्टार्सपैकी एक आहे. ज्याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याने आपल्या उत्कृष्ट अभिनयाने आणि हटके भूमिकांनी इंडस्ट्रीमध्ये एक वेगळे स्थान निर्माण केले आहे (The Family Man 2 fame actor Manoj Bajpayee and his wife neha cute love story).

अभिनेता मनोज बाजपेयी यांचे पहिले लग्न मुंबई येथे येण्यापूर्वीच झाले होते. त्यांचे लग्न दिल्लीतील एका मुलीशी झाले होते. पण, या जोडीचे नाते फार काळ टिकले नाही आणि दोघेही वेगळे झाले. असं म्हणतात की, त्यावेळी मनोज स्ट्रगल करत होता. ज्यामुळे हे संबंध तुटले. यानंतर मनोज दिल्ली सोडून मुंबईत दाखल झाला आणि तिथेच त्याने चित्रपटांमध्ये काम शोधण्यास सुरुवात केली.

अशी झाली ‘पत्नी’शी ओळख

स्ट्रगल करत असताना त्याची भेट अभिनेत्री नेहाशी झाली. मनोज यांच्या पत्नीचे अर्थात नेहाचे खरे नाव शबाना रझा आहे. नेहाने बॉलिवूड कारकिर्दीची सुरूवात तिच्या ‘करीब’ या चित्रपटाद्वारे केली होती. या चित्रपटात ती बॉबी देओल याच्या सोबत दिसली होती. हा चित्रपट 1998मध्ये प्रदर्शित झाला होता. नेहाचे संपूर्ण कुटुंब महाराष्ट्रातील नांदेड येथे वास्तव्यास आहे (The Family Man 2 fame actor Manoj Bajpayee and his wife neha cute love story).

शबानाची झाली नेहा

शबानावरून नेहाचे नाव बदलण्याचे काम दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांनी केले. त्यानंतर लोक तिला नेहा नावाने ओळखू लागले. नेहाचा चित्रपट ‘करीब’ रिलीज झाल्यानंतर मनोज आणि नेहाची जवळीक वाढली होती. दरम्यान, मनोजचा ‘सत्या’ हा चित्रपटही बॉलिवूड बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला आणि या चित्रपटाने मनोजला रातोरात बॉलिवूडचा सुपर स्टार बनवले. त्याचवर्षी दोघांनीही एकमेकांना डेट करण्यास सुरवात केली. बरीच वर्ष डेटिंग सत्रानंतर दोघांनीही एकमेकांशी लग्न करण्याचा विचार केला आणि 2006 मध्ये दोघांनी लग्नगाठ बांधली.

नेहा देखील प्रसिद्ध अभिनेत्री!

लग्नाआधी नेहाने ‘होगी प्यार की जीत’, ‘फिजा’, ‘राहुल’ यासारख्या अनेक बड्या चित्रपटांमध्ये काम केले होते. इतकेच नाही तर, या अभिनेत्रीने तमिळ आणि तेलुगू चित्रपटांतही आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली होती. पण मनोज सोबत लग्नानंतर या अभिनेत्रीने केवळ 1 चित्रपटात काम केले. कारण, लग्नानंतर ती तिच्या संसारात व्यस्त झाली आणि तिने मनोरंजन विश्वास पूर्णपणे निरोप दिला. त्याच वेळी नेहाने एका खास मुलाखतीत सांगितले की, “मला कामासाठी अनेक ऑफर आल्या, पण मी माझ्या कुटुंबात खूप आनंदी आहे, ज्यामुळे मी स्वतःहून काम करण्यास नकार दिला”. मनोज आणि नेहा यांना ‘अवा’ नावाची एक छोटी मुलगी आहे.

(The Family Man 2 fame actor Manoj Bajpayee and his wife neha cute love story)

 हेही वाचा :

VIDEO | जाऊया डबल सीट रं… ‘देवमाणूस’मधील एसीपी दिव्याचा हवालदार शिखरेंसोबत भन्नाट डान्स

PHOTO | वयाच्या अवघ्या 19व्या वर्षी टीव्ही अभिनेत्रीचे 20 मिलिअन फॉलोअर्स, मोठमोठ्या कलाकारांना देतेय तगडी टक्कर!

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.