AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऐश्वर्या रायच्या त्या किसिंग सीनवरून झाला होता गदारोळ, मिळाली होती कायदेशीर नोटीस

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या लग्नाच्या अवघ्या ६ महिन्यांपूर्वी अभिनेत्री ऐश्वर्या रायचा एक चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर बराच गदारोळ झाला होता. खरंतर या चित्रपटात अभिनेत्रीने पहिल्यांदाच किसिंग सीन दिला होता.

ऐश्वर्या रायच्या त्या किसिंग सीनवरून झाला होता गदारोळ, मिळाली होती कायदेशीर नोटीस
shailesh musale
shailesh musale | Updated on: Oct 28, 2024 | 10:34 PM
Share

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हिने करिअरच्या सुरुवातीलाच अभिनयातून आणि आपल्या सौंदर्याने स्वत:ची वेगळी प्रतिमा निर्माण केली होती. ज्या चित्रपटात ऐश्वर्या असेल तर तो चित्रपट हिट होईल असे म्हटले जात होते. पण जेव्हा तिने पहिल्यांदा चित्रपटात किसिंग सीन दिला तेव्हा गदारोळ झाला होता. ऐश्वर्याने तिचा सुपरहिट चित्रपट ‘धूम २’ मध्ये पहिल्यांदा किसिंग सीन दिला होता. हा सीन तिने हृतिक रोशनसोबत चित्रित केला होता. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर ऐश्वर्याला कायदेशीर धमक्या मिळू लागल्या होत्या.

खुद्द ऐश्वर्यानेच हा दावा केला होता की, ऐश्वर्याने डेली मेलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते – “मी ‘धूम’ चित्रपटात फक्त एकदाच हा सीन केला होता आणि तो चर्चेचा विषय बनला होता. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की या सीनमुळे मला काही कायदेशीर नोटिसाही मिळाल्या आहेत.”

ऐश्वर्या पुढे म्हणाली होती की, “लोक म्हणाले- तू प्रतिष्ठित आहेस, आमच्या महिलांसाठी तू एक उदाहरण आहेस, तू तुझे आयुष्य अशा आदर्श पद्धतीने जगले आहेस, तुला ऑनस्क्रीन किस करताना पाहून लोकांना चांगले वाटत नाहीये, मग तू असे का केलेस??”

ऐश्वर्या पुढे म्हणाली, ‘मला धक्का बसला, मी फक्त एक अभिनेत्री आहे, मी माझे काम करत आहे आणि इथे मला दोन-तीन तासांच्या चित्रपटातील काही सेकंदांच्या सीनसाठी स्पष्टीकरण देण्यास सांगितले जात आहे.’

ऐश्वर्याने लग्नाच्या सहा महिने आधी हा सीन चित्रित केला होता आणि या चित्रपटात तिच्यासोबत अभिषेक बच्चनही होता. ‘धूम 2’ हा 26 नोव्हेंबर 2006 रोजी रिलीज झाला होता. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांचे लग्न 20 एप्रिल 2007 रोजी झाले होते.

ऐश्वर्याच्या या सीनमुळे बच्चन कुटुंबही तिच्यावर नाराज झाल्याचे बोलले जाते. मात्र, लग्नानंतर ऐश्वर्याने पुन्हा हृतिकसोबत ‘जोधा अकबर’ आणि ‘गुजारिश’मध्ये काम केले आणि दोघांमध्ये रोमँटिक सीन्सही दिले.

अभिनेत्री ऐश्वर्या राय सध्या घटस्फोटांच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या आता वेगवेगळे राहत असल्याची माहिती आहे. आता ते एकत्र ही दिसत नाहीत. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचा घटस्फोट होणार असल्याची चर्चा आहे. पण दोघांनी ही यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.