AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वरुण धवनच्या ‘भेडिया’ चित्रपटाला अभिनेता म्हणाला ‘वाहियात’; रणवीर सिंगवरही साधला निशाणा

वरुणच्या 'भेडिया'ला का म्हणाला 'वाहियात'? प्रेक्षकांच्या निवडीवरही उपस्थित केला प्रश्न

वरुण धवनच्या 'भेडिया' चित्रपटाला अभिनेता म्हणाला 'वाहियात'; रणवीर सिंगवरही साधला निशाणा
BhediyaImage Credit source: Twitter
| Updated on: Nov 27, 2022 | 12:42 PM
Share

मुंबई: अभिनेता वरुण धवनचा ‘भेडिया’ हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षक-समीक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. मात्र या चित्रपटावरही टीका करण्याची संधी स्वयंघोषित चित्रपट समीक्षक कमाल आर. खानने सोडली नाही. बॉलिवूड कलाकार आणि चित्रपटांवर सतत निशाणा साधल्यामुळे केआरके नेहमीच चर्चेत असतो. इंडस्ट्रीतील घराणेशाहीवरही त्याने वेळोवेळी संताप व्यक्त केला आहे. आता दिग्दर्शक डेव्हिड धवनचा मुलगा वरुण याच्या ‘भेडिया’ या चित्रपटावरून केआरकेनं केलेलं ट्विट चर्चेत आलं आहे.

‘भेडिया हा चित्रपट फ्लॉप झाला आहे. मात्र हा मुद्दा नाही. मुद्दा हा आहे की असा ‘वाहियात’ आणि ते सुद्धा वरुण धवनचा चित्रपट पाहण्यासाठी लोक थिएटरमध्ये कसे जात आहेत? म्हणजे लोक चांगल्या चित्रपटाला ब्लॉकबस्टर बनवण्यासाठी तयार आहेत. याचा अर्थ ‘सर्कस’ हा चित्रपटसुद्धा ब्लॉकबस्टर होऊ शकतो’, असं ट्विट केआरकेनं केलं आहे.

वरुण धवनच्या ‘भेडिया’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धीम्या गतीने सुरुवात केली. शुक्रवारी या चित्रपटाने 7.48 कोटी रुपयांची कमाई केली. मात्र शनिवारी कमाईत चांगली वाढ झाल्याचं पहायला मिळालं.

सर्कस हा अभिनेता रणवीर सिंगचा आगामी चित्रपट आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित या चित्रपटाची कलाविश्वात जोरदार चर्चा आहे. यामध्ये रणवीरसोबत जॅकलिन फर्नांडिस, पूजा हेगडे, जॉनी लिव्हर आणि वरुण शर्मा यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट यावर्षी ख्रिसमसच्या मुहूर्तावर 22 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

Follow Us
ज्या भुयारी खोलीत महिलांच्या किंकाळ्या घुमल्या, भोंदूबाबाकडून अत्याचार
ज्या भुयारी खोलीत महिलांच्या किंकाळ्या घुमल्या, भोंदूबाबाकडून अत्याचार.
बोटाला जखम कशी झाली? सुनील तटकरे पहिल्याांदा बोलले, म्हणाले....
बोटाला जखम कशी झाली? सुनील तटकरे पहिल्याांदा बोलले, म्हणाले.....
लोकशाहीचा खून झाला म्हणणाऱ्यांचेच हात रक्ताने माखलेत
लोकशाहीचा खून झाला म्हणणाऱ्यांचेच हात रक्ताने माखलेत.
त्यामागे अदृश्य शक्ती? शंभुराज देसाई हल्ला प्रकरणी सुळेंचा मोठा दावा
त्यामागे अदृश्य शक्ती? शंभुराज देसाई हल्ला प्रकरणी सुळेंचा मोठा दावा.
जागतिक संकटांमध्येही भारत ठरतोय आशेचा किरण – रामू राव जुपल्ली
जागतिक संकटांमध्येही भारत ठरतोय आशेचा किरण – रामू राव जुपल्ली.
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी.
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले.
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने.
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण..
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण...
जागतिक उलथापालथीच्या काळात मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती....
जागतिक उलथापालथीच्या काळात मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती.....